Shree Krishna
355 views
पूर्ण वाचावे 🙏🏼 निदान कोल्हापूर करांनी, भक्तांनी तरी जागरूक राहून *करवीर निवासिनी श्री. अंबाबाई* असेंच म्हणावे, रोजचे फोटो स्टेटस ला ठेवताना, नेसेज पुढे पाठवताना, बोलताना पण कृपया शब्दात दुरुस्ती करावी... भान ठेवावे.. *जी मुळ ओळख श्री अंबाबाई आहे तीच ठेवा..* ही विनंती 🙏🏼 नाहीतर आला मेसेज,कर फॉरवर्ड, दुसरे म्हणतात म्हणून आपण असा🙏🏼 मूर्खपणा करू नये ही विनंती.. .... एक करवीर प्रेमी 🙏🏼 जय अंबे....🚩 उद ग अंबे उदे... 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩 करा फॉरवर्ड 😊 *महालक्ष्मी नव्हे कोल्हापूरची अंबाबाईच..!* *कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिर आहे याची नोंद इतिहासात आहे.. अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे ..शंकराची पत्नी आहे.. या नात्याने कोल्हापुरातील मंदिर हे शैव मंदिर आहे.* पण अचानक 1980 सालापासून बालाजी वरून साडी चुडी अंबाबाईला पाठवू लागले यावरून असा प्रसार सुरू झाला की बालाजी आपल्या पत्नीला म्हणजे महालक्ष्मीला साडी चोळी पाठवतो.. नंतर अशी प्रथा रूढ झाली की बालाजीला दर्शनासाठी गेलेले कोल्हापूर महालक्ष्मी करूनच परत यावे.. कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी कशी झाली यावर संशोधन होणे गरजेचे आहे.. हे एकच मंदिर नाही *भारतात असे बहुतांश मंदिर आहेत जे शैव मंदिर असून सुद्धा त्यांना वैष्णव मंदिर बनवण्याचा प्रयत्न होत आहे..!* आणि असे प्रयत्न का होत आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहे गेल्या काही काळापासून अंबाबाईचे पार्वती हे मूळ रूप बदलून तिचे लक्ष्मीकरण करण्याचा घाट घातला जात आहे . करवीर निवासिनी अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून अंबाबाई ही लक्ष्मीचे रूप असल्याचे सांगून काही लोकांकडून चुकीचा इतिहास रचला जात असल्याच्या तक्रारी अंबाबाईसंदर्भात मूर्ती व प्राचीन इतिहास संशोधकामार्फत केल्या जात होत्या. अंबाबाई ही तिरूपती बालाजीची पत्नी असून ती रूसून करवीरात आली आहे आणि आपल्या पत्नीसाठी दरवर्षी बालाजी महावस्त्र पाठवतो अशी आख्यायिकाही जोडली जात होती. मात्र *तिरूपती बालाजीची पत्नी ही अंबाबाई नसून पद्मावती असल्याचे अभ्यासकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.* *अंबाबाई मूर्तीची झीज झाल्यामुळे काही महिन्यांपूर्वी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मूर्तीची अंबाबाई असल्याची ओळख दाखवणारी मस्तकावरील नागमुद्रा घडवलीच नसल्याचे उघड झाले. नागमुद्रा हे प्रतीक पार्वती अर्थात अंबा असल्याची खूण असताना नागमुद्रा न घडवल्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले.* त्यामुळे अंबाबाई की महालक्ष्मी असा मतप्रवाहदेखील चर्चेत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी दोन महिने आधीच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ स्वरूपाबाबत चर्चेला उधाण आल्यामुळे नवरात्रोत्सवात बालाजी देवस्थानकडून येणारा मानाचा शालू कोणत्या नात्याने स्वीकारला जाणार याबाबतही उत्सुकता होती, या पार्श्वभूमीवर हा मानाचा शालू *‘विष्णूमाता’* या नात्याने स्वीकारला जात असल्याचे देवस्थान समितीतर्फे सदस्या संगीता खाडे यांनी जाहीर केले. *अंबाबाई ही शक्तिरूप असून तिच्या मूर्तीमध्ये घडवण्यात आलेली आयुधे, नाग, सिंह, म्हाळुंग यामध्येच ती पार्वतीचे रूप असल्याचे दाखले असल्याचे डॉ. कुंभार यांनी स्पष्ट केले होते.* ही व्याख्यानमालिका कोल्हापुरात अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबाईला जाणीवपूर्वक महालक्ष्मी असे नामकरण करण्याचा डाव काही लोकांनी मांडला आहे. अंबाबाईचा इतिहास वाचला तर ही गोष्ट चुकीची आहे हे लक्षात येते. अंबाबाईला महालक्ष्मी बनवून तिरूपती बालाजीशी पत्नीचा संबंध लावत श्रीपूजकांनी आपली झोळी भरून घेतली आहे. आजपर्यंत देवीची नेमकी ओळख पुराव्यांमधून उजेडात न आल्यामुळे बालाजीची पत्नी म्हणून शालू स्वीकारला जात होता. मात्र, अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यानुसार अंबाबाई ही पार्वतीचे रूप असल्याची भूमिका देवस्थानने घेतली असून *मुलाकडून आईसाठी* महावस्त्र भेट म्हणून हा शालू यापुढे स्वीकारला जाणार आहे *🌸अंबाबाईच का*🌸 #कोल्हापूरची देवी महालक्ष्मी नसून '#अंबाबाई' आहे. १) कोल्हापूरची देवीचे नाव हे 'अंबाबाई' आहे. तिचे महालक्ष्मी नाव कधीच नव्हते. भारतामध्ये देवी आदिशक्ती सतीची ५२ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे ३ शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. तुळजापुरची भवानी माता, माहुरगडाची रेणुका माता, कोल्हापूर ची अंबाबाई, आणि अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी. जर कोल्हापूरची अंबाबाई शक्तीपीठ म्हटलं तर ती कधीच विष्णू पत्नी होणार नाही. कारण सतीची कलेची ५२ तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ५२ शक्तीपीठ तयार झाले. अंबाबाई ही शिवपत्नी आहे. २) अंबाबाई च्या देवळात अंबाबाई च्या गाभाऱ्यावर पहिल्या मजल्यावर शिवमंदिर आहे. तिने शिवाची मातृका पिंड धारण केली आहे. अंबाबाई च्या मूर्तीचा अभ्यास केल्यास तिने कोणत्याही प्रकारे विष्णू चिन्ह परिधान केलं नाही आहे. उलट अंबाबाई मूर्ती जवळ वाहन सिंह आहे. सगळी शिवचिन्ह आहेत. ३) आता मुद्दा तिरुपती- अंबाबाई ह्या गैरसमज बद्दल. काही वर्षपूर्वी काही तिरुपती भक्त आई अंबाबाई च्या ट्रस्ट च्या अधिकार कक्षेत आल्यामुळे त्यांनी ह्या चुकीच्या प्रथा पाडण्यास सुरवात केली. आपण डोळसपणे पाहिल्यास असे लक्षात येईल की तिरुपती देवस्थान कडून शालू भेट देण्याची प्रथा सुरू केली. ही मागील २० वर्षातच चालू आहे (या अगोदर अशी कोणतीही प्रथा नव्हती), हे कमी की काय, तिरुपती देवस्थान सारखे लाडू चा प्रसाद देण्याची सुरवात केली, ( या आधी लाह्या आणि बत्तासे चा प्रसाद मिळत असे). अंबाबाई नाव बदलून महालक्ष्मी नाव पुढे केलं गेलं (२००० सालाच्या अगोदर एकही सरकारी कागदपत्रात महालक्ष्मी म्हणून कुठेही उल्लेख नाही. अगदी इंग्रजांच्या काळातली सुद्धा कागद पत्रात 'अंबाबाई' च उल्लेख आहे. ४) सर्वात महत्वाचे कोणत्याही दानव, राक्षस अधर्मी वृत्ती यांचा संहार माता पार्वती करते कारण ती आदिमाया जगदंबा आहे. तिने शस्त्र धारण केले आहेत. अंबाबाई ने या कारणास्तव कोल्हासुरचा वध केला आहे. लक्ष्मी माता ही संहारक नाही. ती धन पूरक देवता आहे. ती कोणाचा वध करत नाही. ५) शेवटचा मुद्दा श्रीविष्णू (तिरुपती) यांची पत्नी लक्ष्मी (पद्मावती) यांचे मंदिर तिरुपती पासून ५ किलोमीटर वर च आहे. सारांश- *काही लोक माता पार्वतीच्या शक्तीपीठ ला उगाच विष्णुपत्नीचे रूप देत आहेत.* 🙏🙏🙏🚩 रत्नासुराला मारण्यासाठी अंबाबाईने केदारनाथ जोतिबाला मदतीसाठी बोलावले होते . विष्णुला नाही . केदारनाथ शिवाला युद्धानंतर इथेच थांबण्याची विनंती केली .. ती मान्य केले . जोतिबा हे शिवाचेच रूप आहे . #वरिष्ठनागरिक #मनमौजी #श्रीगुरुदेवदत्त