🌹🌹🌹
553 views
#🎭Whatsapp status मंथन एक तक्रार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोकण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी व ताणतणावावर बंगळुरू येथील (SPIF )suicid prevention india foundation (टास्क फोर्स )ही संस्था काम करीत आहे.चांगली गोष्ट आहे. सर्वात आधी या संस्थेचे मनापासून अभिनंदन आणि आभार.जे भारताच्या भविष्यासाठी चांगले काम करीत आहेत. यातून ही संस्था उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना होणारा त्रास व त्यास कारणीभूत घटक कोणते व कारणे काय यांचे सर्वेक्षण करीत आहे. पण मला वाटते या मुलांना घडविणारे जे शिक्षक आहेत,त्यांच्यासाठीही असे सर्वेक्षण केले तर?शिक्षकांचे मानसिक आरोग्य घरी कसे असते? आणि शाळेत गेल्यानंतर बदलते का? का बदलते?कारण काय आहे त्या बदलास कारणीभूत कोण??त्यांना त्यांच्या वरिष्ठां कडून कशी वागणूक दिली जाते, सहकारी वर्ग कसे वागतात?भेदभाव करतात का? पुरुष -पुरूष ,स्री-पुरूष, स्रि -स्रि शिक्षिका मधे गट पडलेत का?पडलेत तर कोणी पाडले?का पाडले? कोणी होतकरू शिक्षकांचे खेकड्या सारखे पाय खेचते का? आपल्यात नसलेल्या पण आपल्या सहकारी शिक्षक शिक्षिकेची असलेल्या सुप्त गुणांवर जळतात का? त्यावरून त्यांना पाठिंबा तर नाही पण टोमणे मारले जातात का? असे दर्शविले जाते का की ते सुप्त गुण नसून दोष आहेत?कमी उंची जास्त उंची वरून टिंगल टवाळी वेळ प्रसंगी सहकारी शिक्षक शिक्षिकांचा अपमान केला जातो का?यातून त्या शिक्षक शिक्षिकेची मानसिक अवस्था काय होते?ते आत्महत्येचे विचार करतात का?की त्यांनी आत्महत्या करावी म्हणून त्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते या गोष्टीचे सर्वेक्षण व्हावे. कारण जर विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे सांभाळणार्या शिक्षकांचेच मानसिक आरोग्य स्वस्थ नसेल तर ते कोणत्या मानसिकतेत ते विद्यार्थ्यांना शिकवितील? म्हणून भेदभावाची वागणूक देणार्यांना ,दोषींना शिक्षा व्हावी जेणेकरून ती लोक माणसाशी माणसासारखे वागतील. सुवार्ता सुधाकर धिवरे