श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
427 views
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती वरील मर रोगाला व उपाय* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बिजलागवडी नंतर दुसर्‍या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत आढळून येतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि कोमेजतात रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व मारतात. उपाय मिरची बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्‍या आठवड्यात व तिसर्‍या आठवड्यात १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी.