मन जुळणं महत्त्वाचं. संभाषण जुळणं महत्त्वाचं. आदर आणि विश्वास महत्त्वाचे. बाकी सगळं दुय्यम आहे. समाज काय म्हणेल हा प्रश्न असतो, पण आयुष्य समाज जगत नाही — आपण जगतो. आणि म्हणूनच आपल्याला आयुष्यात काय हवं इतकंच महत्वाचं असावं.. समाजमान्य रितीच्या बंधनात राहून मनसोक्त जगता येत नाही...नाहीच..!
ती तिच्या पन्नाशी कडे झुकणारी.. हा आता पस्तिशी गाठत होता....लोकलच्या गर्दीत, मॉडर्न समजल्या जाणाऱ्या कुठल्याश्या कॅफेत, थिएटरच्या रांगेत, रिक्षात बसल्या बसल्या..येणारे जाणारे प्रत्येकजण यांच्याकडे कुतूहलाने बघायचे.. कॅफेतल्या पोरी एकमेकींना इशारे करायच्या..
त्याच्या-तिच्या नजरेतून हे सुटलं, त्यांना कळत न्हवत अशातला भाग नाही.. पण या दुनियेची फिकीर त्यांनी कधीच नाकारली होती... दुनियेला फाट्यावर मारत हे खुशाल एकमेकांत मग्न रहायचे. त्यांना स्वतःचा आनंद गवसला होता.. आणि इतकंच पुरेस होत..
#❤️I Love You