Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
612 views
*१९२५ च्या नंतर बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती जरी सुधारत चालली होती तरी पती-पत्नीला आपला संसार आनंदाचा आहे असे वाटत नव्हते. दोन्ही जीव मनात झुरत असत. रमाबाई मनात कुढत रहात त्यामुळे त्यांना आजारपणात महिनेच्या महिने अंथरूणाला खिळून रहावे लागे. साहेबांनी कुटुंबाशी असलेला संबंध हळूहळू तोडला. दोन तीन महिन्यांनी एखाद्या रविवारी ते घरी जात. सर्वांन डोळ्याखाली घालत व अर्ध्यापाऊण तासात परत ऑफिसात येत. त्यांचे जेवण घरून येई, कधी ते जेवण खात किंवा परत करीत.* *साहेब ज्या दिवशी जेवण घरी परत पाठवीत, त्या दिवशी रमाबाई जेवत नसत काही दिवसांनी हे साहेबांना समजले. तेव्हा जेवणाचा डबा परत न करण्याचे त्यांनी ठरविले. ते जेवण घेत व नको असेल तेव्हा जवळच्या एखाद्या माणसाला ते जेवण खावयास भाग पाडीत व रिकामा डबा घरी पाठवून देत. साहेबांचा हा उप‌नाम रमाबाईंना कळला. त्या फार दुःखी झाल्या.* *एकदा ते मलेरियाने आजारी पडले. अंगात ताप असतानाही ते अंथरूणाल पडून वाचन करू लागले. भेटीस आलेल्या माणसाशी ते गप्पा मारू लागले. दररोजच्या बैठकीतील लोक त्यांना विनवीत की, तुम्ही औषध घ्या. पण ते ऐकेनात. शेवटी त्या रात्री त्यांचा ताप वाढला. ते अंथरुणावरच पडून राहिले. रमाबाईन है समजले. साहेबांना घरी घेऊन या म्हणून त्यांनी शंकरला त्यांच्या ऑफिसात पाठविले. परंतु साहेब घरी गेले नाहीत. तेव्हा रमाबाई स्वतः ऑफिसात आल्या.* *त्या आलेल्या पहाताच साहेबांच्या आसपास बसलेले लोक उठून उभे राहिले व त्यांनी रमाबाईंना बसायला खुर्ची दिली. पण त्या उभ्याच राहिल्या व घरी चला म्हणून विनवू लागल्या. परंतु साहेब मोठ्याने ओरडले, 'तू घरी जा.' रमाबाई अश्रू पुशीत ऑफिसच्या बाहेर पडल्या व घरी आल्यावर ढसाढसा रडू लागल्या. त्या दोन दिवस जेवल्या नाहीत. त्यांनी साहेबांसाठी दोन तासांनी मुसंबीचा रस व ताक पाठवून दिले. तिसऱ्या दिवशी साहेबांचा ताप उतरला व त्यांनी ताकभात खाल्ला.* *पत्नीकडे, संसाराकडे आणि वैयक्तिक सुख दुःखाकडे अशा रीतीने पाठ फिरविल्यानंतर साहेबांनी वाचन, लेखन, प्रॅक्टिस व सामाजिक चळवळ या गोष्टींकडे सारे लक्ष केंद्रित केले व आपल्या नवीन संसारास सुरुवात केली...* *लेखक हरिभाऊ पगारे (मुक्तीदाता विशेषांक)* *संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कौटुंबिक जीवन आठवणी* #भीमसैनिक #👑🔥💯💙कट्टर भीमसैनिक💙💯🔥👑 #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर