🌹🌹Share chat user🌹🌹
523 views
कधी कधी प्रेम म्हणजे मोठमोठ्या शब्दांचं प्रदर्शन नसतं. प्रेम म्हणजे शांत समजूत. मनात वादळ असताना कुणीतरी फक्त जवळ येऊन बसणं. प्रश्न विचारायची घाई न करता, उत्तरांची अपेक्षा न ठेवता, फक्त सोबत देणं हाच खरा प्रेमाचा अर्थ असतो. जी व्यक्ती आपल्याला सतत समजावण्याऐवजी आपली शांतता समजते, ती फार खास असते. कारण प्रत्येक वेळी कारण विचारणं गरजेचं नसतं. कधी मन थकलं असतं, कधी शब्द संपलेले असतात, आणि अशा वेळी फक्त एक मिठी सगळं काही ठीक करू शकते. प्रेमात सल्ले कमी आणि आधार जास्त असावा. कारण आयुष्याच्या लढाया प्रत्येकाने स्वतः लढायच्या असतात; प्रेम करणाऱ्याचं काम फक्त हात घट्ट धरून ठेवायचं असतं. “मी तुझ्यासाठी आहे” हे वाक्य मोठ्यानं बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवणं जास्त महत्त्वाचं असतं. कधी मन भरून आलं की रडू द्यावं, कधी हसायचं असेल तर हसू द्यावं कोणतीही अपेक्षा न ठेवता. प्रेम म्हणजे समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न नव्हे, तर तो जसा आहे तसा स्वीकारणं. खरं प्रेम शांत असतं, स्थिर असतं. ते गोंगाट करत नाही, जाहिरात करत नाही. ते फक्त हळूच कानात सांगतं “मी नेहमी तुझ्यासाठी आहे.” आणि अशा प्रेमातच माणूस स्वतःला सुरक्षित वाटतो… कारण तिथे प्रश्न नसतात, शंका नसतात फक्त विश्वास असतो, आणि दोन हृदयांची न बोलता झालेली समजूत असते. ✍️ संजय बरळ ( पुणेकर ) #❤️I Love You