देश चालवायला आलेले लोक
शिक्षणात नापास, चारित्र्यात संशयास्पद
आणि गुन्ह्यांत पटाईत!
पोलीस व्हायला 12वी पास लागते,
शिपाई व्हायला चारित्र्य तपासणी लागते,
पण नगरसेवक,आमदार–मंत्री व्हायला
नालायकपणाच पुरेसा ठरतो!
ज्यांनी आयुष्यात स्वतःचं घर नीट चालवलं नाही
ते देश चालवणार म्हणे!
ज्यांच्या नावावर गुन्हे दाखल आहेत
ते कायदे बनवणार म्हणे!
ही लोकशाही नाही,
ही अयोग्य लोकांची मक्तेदारी आहे!
निवडणूक आयोग डोळे बंद करून बसलाय,
आणि जनता भावनांच्या अफूवर जगतेय.
8वी नापास नालायक गुन्हेगार सरकार चालवतो
आणि शिकलेला बेरोजगार फिरतो —
हा अपमान आहे
प्रामाणिक नागरिकांचा!
म्हणून मी अंधपणे नाही
NOTA दाबून मतदान केलं,
कारण सगळेच पर्याय
नालायक असतील
तर नकार हाच माझा अधिकार!
हा राग नाही,
ही चीड आहे
या कुजलेल्या व्यवस्थेची!
जागा हो रे नागरिकांनो,
नाहीतर उद्या
हेच नालायक
तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवतील!
ताडीवाला रोड.. येथील सगळ्या उमेदवार ला NOTA चे बटण दाबून चपराक.
🚩जय शंभो नारायण 🚩
आतिश बाबा
#विद्रोही #विद्रोही