श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
494 views
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती मनीषा मुणगेकर *होलिका कथा* हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने( हिरण्यकशिपूची बहीण ) एक युक्ती शोधली, होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. पण या वराचा तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल. सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला, तर त्याला दिसले की आपली प्रिय बहीण होलिका आगीत भस्म होऊन गेली आहे, आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला. अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय आपण होळी म्हणून साजरा करतो .