टी 20 विश्वचषक : भारताला सलग दुसऱ्यांदा जगज्जेता बनवणारे टीम इंडियाचे 7 हिरो - BBC News मराठी
क्रिकेट हा टीम गेम आहे असं म्हटलं जातं. त्यात तथ्यही आहे. कारण एखाद्या खेळाडूनं केलेल्या मोठ्या खेळीच्या किंवा चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर संघ जिंकत असला तरी त्यासाठी इतर खेळाडूंची साथही हवीच असते. मग ती फिल्डिंगमध्ये असो वा फलंदाजी आणि गोलंदाजीही.