Mrs.Manjusha ....
1.2K views
एकदा एक शिष्य व्याकुळ मनाने गुरूंच्या चरणी येऊन नम्रतेने म्हणाला “गुरुदेव, एक गोष्ट मला समजत नाही. मी पूजेला बसतो तेव्हा चिडचिड होते. नामजप सुरू केला की मन गोंधळून जातं. दर्शनाला जातो तेव्हा घाई लागते. हे असं का होतं? माझ्यात श्रद्धा कमी आहे का?” गुरू शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. मग म्हणाले, तू जेव्हा पूजेला बसतोस, तेव्हा देवाजवळ बसतोस की स्वतःच्या अपेक्षांजवळ? शिष्य थोडा थबकला. गुरू पुढे म्हणाले, मनाला वर्षानुवर्षे बाहेर धावायची सवय असते. अचानक तू त्याला जर ‘शांत बस!’ अस म्हणालास तर ते ऐकेल का लगेच? जस एखाद खोडकर मूल अचानक वर्गात बसवल, तर ते अस्वस्थ होत; तस तुझ मन आहे. दुसऱ्या दिवशी गुरूंनी त्याला एक मडकं दिलं आणि म्हणाले, यात पाणी भर. शिष्याने विहिरीतून पाणी आणल. पण पाणी गढूळ होत. तो म्हणाला, गुरुदेव, हे स्वच्छ नाही. गुरू म्हणाले, मडकं हलवलस म्हणून तळाशी बसलेली माती वर आली. थोडा वेळ शांत ठेव, मग पाणी आपोआप स्वच्छ होईल. गुरू पुढे म्हणाले, तुझ मनही तसच आहे. पूजेला बसलास की आत दडलेली अस्वस्थता वर येते. तुला वाटत ती पूजा करताना निर्माण झाली.. पण ती आधीपासूनच होती. नामजपात गोंधळ होतो, कारण मनाला स्थिर राहायची सवय नाही. दर्शनाला घाई होते, कारण तू देवाला भेटायला जात नाहीस..तू काम पूर्ण करायला जातोस... शिष्याचे डोळे ओलावले. तो म्हणाला, मग उपाय काय? गुरू हसले, देवाला भेटताना घाई नको, अपेक्षा नको. पूजेला बसताना परिपूर्ण व्हायचं ठरवू नकोस..फक्त उपस्थित राहा. मन चिडल, तर त्यालाही प्रेमाने बघ. नामजपात गोंधळ झाला, तरी नाम सोडू नकोस. जस गढूळ पाणी शांततेने स्वच्छ होत, तस मनही वेळेन निवळत. गुरू शेवटी म्हणाले, साधना म्हणजे मनाशी युद्ध नाही.. ती मनाशी मैत्री आहे. घाई, चिडचिड, गोंधळ हे शत्रू नाहीत; ते तुझ्या अंतर्मनाचे संकेत आहेत. त्यांना समजून घे, त्यांच्यावर प्रेम कर, आणि देवाकडे निर्मळ भावाने जा. मग पूजा वेळतेच होईल का याच ओझ वाटणार नाही... || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll श्री © दत्तरुप ll --------------------------------------------------- #shridattarup #dattatreya #dattaguru #gurucharitra #shriswamisamarth #spirituality #श्री गुरुदेव दत्त