अगदी बरोबर बोललात दादा शेतकऱ्यांसाठी ना कुठली सुरक्षा हमी ना कायमस्वरूपी भाव ...वर्षभर पोटच्या मुलांपेक्षा जास्त काळजी ,दिवसरात्र कष्ट करून पीक जोपासना करायची आणि परत,काय तर कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी लाॅकडाऊन अशी अनेक संकट त्यातुन ही मार्ग काढुन शेतकरी पीक जोमात आणतो तर भाव कवडीमोल दिला जातो यावर्षी अतिवृष्टी झाली तरी काळजी घेऊन पीक आणल भाव चागंले त्यात ट्रम्प काकाने युद्ध पुकारा त्याचच भांडवल केल आणि रेट पाडले फळपीकाचे..ते देश सोडुन आणि आपल्या देशात खात नाहीत का फळ..वर्षभर कष्ट करायच शेतकऱ्याने वेळ, पैसा ,मेहनत सर्व करायचे शेतकऱ्याने आणि पिकाचा भाव ठरवणार व्यापारी ...चुकीच वाटत नाय का भावानो..फक्त नावाला जगाचा पोशिंदा म्हणायच...
#😎आपला स्टेट्स #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ 😒😔
#🎭Whatsapp status