खरं सांगायचं तर काही लोकांचा राग फक्त घरच्यांसाठीच राखून ठेवलेला असतो.
आई-बाप, बायको, नवरा, भाऊ-बहिण यांच्यावरच राग काढायचा…
आणि बाहेरच्यांशी मात्र साखर टाकल्यासारखं गोड बोलायचं. 😏
बाहेर हसतमुख, नम्र, भारी संस्कारी म्हणून नाव कमवायचं…
पण घरात मात्र आवाज चढवायचा, टोमणे मारायचे, मन दुखवायचं.
असं दोन नंबरचं आयुष्य कशाला रे बाबा?
अशी माणसं मेणबत्तीसारखीच असतात बघा…
घरातच जळत राहतात आणि परक्यांना उजेड देतात.
ज्यांनी आयुष्यभर साथ दिली, त्यांच्याशीच उर्मटपणा…
आणि जे फक्त कामापुरते भेटतात त्यांच्याशी गोडगोड गप्पा!
खरं सांगायचं तर माणसाची ओळख गावात, बाजारात किंवा फेसबुकवर नाही होत…
ती घरात होते!
घरच्यांशी कसं बोलतो, कसं वागतो, त्यातूनच आपलं खरं रूप दिसतं.
जग जिंकलात तरी काय उपयोग,
जर आपल्या माणसांची मनं हरवली तर?
परके चार दिवस टाळ्या वाजवतील,
पण संकटात उभं राहणारं आपलंच रक्त असतं.
म्हणून जरा सांभाळून वागा…
घरच्यांना प्रेम द्या, आदर द्या.
कारण घर सुखाचं असेल तरच बाहेरचा मान खरा वाटतो. 💯🔥
सौ प्रार्थना देशमुख ✍️ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #💐सुंदर विचारधारा #🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार