Krishnasutarofficial
909 views
16 days ago
आजचा दिवस इतिहासात कायम काळ्या अक्षरांनी लिहिला गेला… ३ एप्रिल १६८०… तो दिवस जेव्हा सह्याद्रीचं हृदय थांबल्यासारखं झालं. स्वराज्याचा शिल्पकार, लाखो मावळ्यांचा आधार, प्रजेचा खरा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी रायगडावरून अनंतात विलीन झाले. ज्या राजाने आयुष्यभर स्वराज्यासाठी संघर्ष केला… ज्याने अन्यायाविरुद्ध तलवार उचलली… ज्याने स्त्रियांचा सन्मान आणि प्रजेचा स्वाभिमान जपला… असा राजा इतिहासात हजारो वर्षांत एकदाच जन्माला येतो. राजे गेले त्या दिवशी फक्त एक राजा गेला नव्हता… तर लाखो लोकांचा आधार हरपला होता. मावळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, कारण त्यांच्यासाठी तो फक्त राजा नव्हता… तो त्यांचा बाप होता, त्यांचा स्वाभिमान होता. आजही जेव्हा आपण रायगड किल्ला वर त्यांच्या समाधीपाशी उभे राहतो, तेव्हा छाती अभिमानाने भरून येते आणि डोळे नकळत पाणावतात. राजे शरीराने गेले… पण त्यांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत आजही प्रत्येक मराठी माणसाच्या छातीत जिवंत आहे. 🚩🔥 “जोपर्यंत सह्याद्री उभा आहे, तोपर्यंत शिवबा प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे…” 🚩 जय शिवराय 🚩 #shivaji #शिवाजी