वैष्णवी पाटील
3.2K views
#🌓भारतातील पहिले चंद्रग्रहण सुरु😱 *पश्चिम महाराष्ट्रामध्ये खग्रास चंद्रग्रहणाचे वेध कसे पाळावेत?* मंगळवारी तीन मार्च 2026 च्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून 48 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. लहान मुले वयस्कर मंडळी आजारी व अशक्त व्यक्तींनी गर्भवतीने मंगळवारी सकाळी 11 पासून ते संध्याकाळी सहा वाजून 48 मिनिटापर्यंत वेध पाळायचे आहेत. या काळामध्ये देवपूजा, नित्य कर्म इत्यादी करता येते. वेधा मध्ये भोजन करू नये. म्हणून कोणतेही अन्नपदार्थ खाऊ नयेत. वेध काळामध्ये आवश्यक असे पाणी पिणे , मलमूत्र विसर्जन करू शकता. झोपू शकता. नामस्मरण करू शकता. परंतु ग्रहण पर्व काळामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या सूर्यास्तानंतर म्हणजे सहा वाजून 32 मिनिटांमध्ये कोल्हापूरमध्ये सूर्यास्त होत आहे. त्यापासून ते संध्याकाळी सहा वाजून 48 मिनिट या काळामध्ये पाणी पिणे मलमूत्र विसर्जन अशा गोष्टी करू नयेत. संध्याकाळी सहा वाजून 48 मिनिटानंतर स्नान करावे. पूर्वी घेतलेल्या अनुग्रहाचे मंत्राचे जपाचे नामस्मरण या काळामध्ये करता येते. त्यामुळे जरूर या चंद्रग्रहणामध्ये नामस्मरण करावे. मिथुन तुळ वृश्चिक व मीन राशींना हे ग्रहण शुभ फलदायी आहे तसेच मेष कर्क धनु कुंभ या राशींना मिश्र फल मिळणार आहे परंतु वृषभ सिंह कन्या मकर या राशींना हे ग्रहण अनिष्ट असे फळ देणार आहे. याचा अर्थ ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्यांनी अशा व्यक्तींनी व गर्भवतीने ग्रहण पाहू नये. *गुरु ज्ञान ज्योतिष मार्गदर्शन, श्री स्वप्नील विजय

More like this