सातत्य म्हणजे रोज स्वतःवर विजय मिळवणं…
कालपेक्षा आज एक पाऊल पुढे टाकणं…
आणि अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा उभं राहणं..
प्रतिभा असो, भाग्य-नशीब असो,
गुरुकृपा असो आणि देवकृपाही असो
या सगळ्यांना अर्थ येतो तो फक्त सातत्यामुळे.
सातत्य नसेल, तर सामर्थ्य असूनही यश हातातून निसटतं.
म्हणून लक्षात ठेवल पाहिजे की
ज्यात प्राविण्य मिळवायचं आहे,
त्यात रोज हजर राहणं आणि सातत्य ठेवणं
हेच यशाचं सर्वात अचूक आणि शक्तिशाली रहस्य आहे..
अध्यात्मिक परिभाषेत सातत्यालाच साधना म्हणतात.
रोज केलेला छोटासा प्रयत्न,
मनाची पुन्हा पुन्हा केलेली उभारणी,
आणि मार्गावर टिकून राहण्याची तयारी
यातूनच साधना घडत जाते
!! अवधूत चिंतन राजाधिराज योगीराज श्रीमंत सद्गुरू श्रीशंकरबाबा महाराज की जय !!
#☀️गुड मॉर्निंग☀️