कोल्हापूरकर MH09💪🌍♥️
1.3K views
*म्हणता म्हणता २०२५ संपत आले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले.* आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. *व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे,* *" आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते.."* शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य... *एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.* वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. पुन्हा व.पु. म्हणतात तसं, *" समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..."* *असो, सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतंच...* *तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या..* गुरू ठाकूर यांच्या या दोन ओळी फारच सुंदर आहेत, *"आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे...* *ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे..."* 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात