नीलकंठ
508 views
26 days ago
*भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी उपदेश केला .* तो असा कि..... भिक्षु हो प्रवज्जिताने या दोन अंताचे सेवन करु नये. ते दोन अंत कोणते? चैनीचा उपभोग घेत पडणे हा एक अंत. हा हिन आहे. हा ग्राम्य आहे, अज्ञजनसेवीत आहे, अनर्थावह आहे. अनार्य आहे. देहदंडन करणे हा दुसरा अंत. हाही दुःखकारक आहे म्हणून या दोन्ही अंतांना न जाता तथागतांनी मध्यममार्ग शोधुन काढला. हा मार्ग ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा आहे. ज्ञानोदय करणारा आहे. यानेच उपशम अभिज्ञा, प्रज्ञा व निर्वाण यांची प्राप्ती होते. भिक्षुहो हा मार्ग कोणता तर तो आर्य अष्टांग मार्ग - त्याची हि आठ अंगे👇- १)सम्यक दृष्टी, २)सम्यक संकल्प, ३)सम्यक वाचा,सम्यक , ४)सम्यक कर्मांत, ५)सम्यक आजीव, ६)सम्यक आजीव, ७)सम्यक स्मृती, ८)सम्यक समाधी. हाच तो तथागताने शोधून काढलेला मार्ग ज्याने... उपशम, अभिज्ञा, प्रज्ञा, निर्वाण . यांची प्राप्ती होते. ( 📄 21, पुस्तकाचे नाव - बुद्ध धर्म आणि संघ, लेखक- धर्मानंद कोसंबी) #💪बुद्धांची तत्वे📜 #☺️उच्च विचार