#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 वाचाल तर वाचाल
*सदगुरुभेट*:
सद्गुरू भेटणे हा कधीच योगायोग नसतो… तो पूर्वजन्मी केलेल्या सत्कर्मांचा, प्रार्थनांचा आणि अंतःकरणातून उमटलेल्या प्रांजळ हाकेचा परिणाम असतो.
कित्येक जन्मांची पुण्याई एकत्र आली की , सदगुरू सोबत अशी दिव्य भेट घडते. म्हणूनच गुरू भेटले की मनात एक वेगळीच ओळख निर्माण होते… जणू आपण त्यांना आधीपासूनच कुठेतरी ओळखत होतो. किती भावस्पर्शी आहेत या निर्मळ भावना..
मनातील चलबिचल, वाढणारा गोंधळ हे सगळं माझ्या सोबत नेहमीच घडतं हे जाणणारे आपण सर्वच ; पण एकदा का गुरूंच्या सान्निध्यात आलो की मनातले वादळ शांत होतं . मनाच्या कोपऱ्यात दडलेले गुंते आपण कुणालाच सांगू शकत नाही, ते , ते क्षणात ओळखतात. आपण कधीच न बोललेल्या वेदना ते नजरेतूनच वाचतात आणि कधी कधी एका शब्दाने, किंवा अगदी शांततेनेही हृदयाला दिलासा देतात. खरं सांगू का, त्यांच्या नुसत्या उपस्थितीत एक सुरक्षितता जाणवते . जणू काही आपण योग्य हातात आहोत.
अनेकजण आयुष्यात खूप शोध घेतात, पण सद्गुरू सापडत नाहीत. होत कां असं कधी? बहुदा तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल ना?..
कारण गुरूंची भेट ही प्रयत्नाने नाही, तर पात्रतेने मिळते. ही पात्रता एखाद्या जन्माची नसते तर ती अनेक जन्मांच्या जपातून, आवडीने केलेल्या भक्तीतून तयार होते. म्हणूनच गुरू मिळणे म्हणजे “भाग्य”, “कृपा”, आणि “पुण्याई” या तिन्हीचा एकत्रित आशीर्वाद.
आणि एकदा का सद्गुरू लाभले, तर जीवन खरंच बदलतं. रस्ता पूर्वीचाच असतो, पण चालायची शक्ती वेगळी असते.अडचणी पूर्वीच्याच असतात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वेगळ्या रूपात असते.
आणि "जे काही होईल… माझे गुरू माझ्यासोबत आहेत."हे मात्र आपण मनाशी घट्ट करून ठेवतो. बरोबर ना !
खरं तर गुरू भेटतात तेव्हा कळतं की नियतीने आपल्याला योग्य ठिकाण शोधून दिलय आणि देवाने आपल्या जीवनात सत्कार्य करण्यासाठी सद्गुरूंचा हात ठेवला आहे.
🙏आपले सदगुरु त्यांनी दिलेल्या नामात आहेत. ( जेथे नाम , तेथे माझे प्राण-सांगे सकळांना सांभाळावी खूण.. आर्त हाक देता आज ये प्रचीती
ऊध्दरीले लोक कोट्यानुकोटी) 👏🏻
........................................
संकलन :- डॉ . डी. डी . देशमुख कामठेकर , पुणे .
धन्यवाद . श्रीराम जय राम जय जय राम . श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय .
........................................