adityakumar.
521 views
स्वाती चाळिशीतली, दोन मुलांची आई. नवरा बँकेत नोकरीला. संसार वाईट नव्हता. भांडणंही फार नव्हती. पण काहीतरी कमी होत ते म्हणजे संवाद. नवरा घरी यायचा, जेवायचा, टीव्हीसमोर बसायचा आणि झोपायचा. स्वाती दिवसभर घर, मुलं, सासू-सासरे, आणि अधूनमधून स्वतःशी बोलणं. एक दिवस तिने फेसबुकवर जुना कॉलेज ग्रुप जॉइन केला. सुरुवातीला फक्त फोटो, शुभेच्छा, आठवणी. तिथेच संदेश आला. “ओळखलंस का?” नाव पाहिलं आदित्य. कॉलेजमध्ये तिच्या मागे फिरणारा, पण तिने कधी गंभीरपणे न घेतलेला. “अरे वा! किती वर्षांनी!” तिने उत्तर दिलं. पहिले दोन-तीन दिवस साध्या गप्पा. मग रोजच. सकाळचा “गुड मॉर्निंग” आणि रात्रीचा “झोपलीस का?” असा क्रम सुरू झाला. आदित्य ऐकायचा. ती बोलायची. घरात कोणी विचारलं नव्हतं इतक्या वर्षांत, “तुला काय आवडतं?” तो विचारायचा. स्वातीला जाणवू लागलं ती पुन्हा हसते आहे. फोन हातात घेताना चेहरा उजळतो आहे. तिच्या नवऱ्याने लक्षात घेतलं. “खूप फोनवर असतेस हल्ली.” “असं काही नाही,” ती म्हणाली. पण तिलाही कळत होतं काहीतरी आहे. एक दिवस आदित्य म्हणाला, “आपण भेटू का? फक्त कॉफीसाठी.” तिचं मन धडधडलं. चुकीचं आहे हे तिला ठाऊक होतं. पण ती गेली. कॉफी शॉपमध्ये बसताना तिला अपराधी वाटत होतं. पण त्याच्याशी बोलताना सगळं विसरायला झालं. तो तिच्या डोळ्यांत पाहून म्हणाला, “तू अजूनही तशीच आहेस.” ती वाक्य तिने वर्षानुवर्षं ऐकली नव्हती. त्या भेटीनंतर मेसेज वाढले. फोटो. आठवणी. मग हळूहळू तक्रारी. “तुझा नवरा तुला समजत नाही.” “तू यापेक्षा जास्त deserve करतेस.” प्रेमाचा गोडवा हळूहळू वेगळ्या दिशेने वळू लागला. ती त्याच्याशी भांडायची, रुसायची, वाट पाहायची. एक दिवस आदित्य दोन दिवस गायब राहिला. मेसेज नाही, फोन नाही. ती बेचैन झाली. मनात राग, भीती, शंका. तिसऱ्या दिवशी त्याचा मेसेज आला “सॉरी, बिझी होतो.” ती तेव्हा प्रथम थांबली. तिने स्वतःला विचारलं मी काय करते आहे? हे प्रेम आहे? की लक्ष मिळाल्याची सवय? त्या रात्री तिच्या नवऱ्याने सहज विचारलं, “उद्या सुट्टी आहे. आपण सगळे बाहेर जाऊया का?” खूप वर्षांनी तो स्वतःहून काही सुचवत होता. स्वातीला जाणवलं तिचं घर मोडलेलं नव्हतं. फक्त धुळीने झाकलेलं होतं. तिने आदित्यला मेसेज केला. “आपण इथेच थांबूया. हे योग्य नाही.” तो लगेच उत्तरला नाही. आणि यावेळी तिला वाट पाहण्याची गरजही वाटली नाही. प्रेमाचं जाळं असंच असतं. सुरुवातीला उबदार. मग घट्ट. आणि कळत नकळत गुंतवणारं. स्वातीने फोन बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी ती कुटुंबासोबत बाहेर गेली. सर्व समस्या सुटल्या नाहीत. संवाद अजूनही थोडा कमी होता. पण ती पळत नव्हती आता. तिला समजलं प्रेमाची भूक खरी असते. पण प्रत्येक गोड शब्द प्रेम नसतो. कधी कधी जाळ्यातून बाहेर पडणं म्हणजे प्रेमाला नाकारणं नाही, तर स्वतःला वाचवणं असतं. जर ही कथा वाचताना कुठे स्वतःचा प्रतिबिंब दिसलं असेल, तर लक्षात ठेवा भावना चुकीच्या नसतात, निर्णय चुकू शकतात. आणि प्रत्येक जाळं तोडायला उशीर झालेला नसतो. उशीर होण्याआधी च ते जाळ तोडा कारण याचे परीणाम फार वाईट होतात.. #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🙂Motivation #🎑जीवन प्रवास