विजय जयसिंग पाटील
524 views
. *🌹विचार सुमने🌹* २४.०२.२०२६* *जिथे कधी काळी दुखावले गेलेले होतो किंवा उध्वस्त झालेलो होतो, त्याच जागेवर पुन्हा उभं राहून पुन्हा स्वतःला सावरायचं धैर्य फार कमी लोकांमध्ये असतं. पण आयुष्य हे थांबत नाही. काल जिथे अश्रू होते, तिथे आज आशेची किरणं उमलताना दिसतात. वेदना संपल्या की माणूस मजबूत होतो, आणि प्रत्येक जखम एक नवा धडा शिकवून जाते.* *कधी कधी पुन्हा एकदा त्याच आठवणींमध्ये थोडा वेळ जावं असं वाटतं, पण फक्त मन हलकं करण्यासाठी. काही गोष्टी मनातच बोलून मोकळं व्हायचं असतं. कारण काही भावना व्यक्त करण्यासाठी समोर कुणी असायलाच हवं असं नाही. आपलं मन स्वतःशीही संवाद साधू शकतं.* #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞