विलास पटारे पाटील
671 views
6 months ago
हा अनुभव आपल्याला आला असेल तर नकीच शेअर करा... *कधी कधी आपण ज्या माणसांवर सर्वाधिक विश्वास ठेवतो*, *तेच आपल्या पाठीवर वार करतात... आणि आपण गोंधळून जातो*. *आपणच चुकलो का?" असं वाटायला लागतं* *पण नाही*.. *कारण काही लोक हे बगळ्या सारखे*. *वरून पांढरे शुभ्र, पण आतून काळ्या गोष्टींनी भरलेले* *त्यांचं बोलणं मधुर, चेहरा गोड, वागणं सभ्य* – *पण काळजात मात्र दुसऱ्याला खाली खेचण्याची काळी सुपारी घेतलेली असते*. *ते पांढऱ्या पंखांमध्ये आपले खरे हेतू लपवतात*– *पण ती नजर... ती नेहमी फाडणारीच असते* *या बगळ्यांपेक्षा* *कावळा बरा*! *तो दिसतो तसाच असतो*. *कधी गोंडस दिसत नाही, पण तो* *फसवत नाही*. *त्याच्या कावकावात खोटेपणाचं गोड रूप नसतं* *जे आहे, ते थेट तुमच्या चेहऱ्यावर सांगतो* *कपटी माणसं कधीह समोरासमोर बोलत नाहीत*. *ते तुमच्याशी गोड बोलतील*, *तुमच्या पाठीमागे विखार उधळतील*. *तोंडावर बोलणारे लोक त्रासिक वाटतात, पण फसवत नाहीत कारण ते तोंडात एक आणि पोटात एक असे वागत नाहीत*. *कपटी माणसं गोंजारतात, पण नकळत जखम करतात* *या जगात फसवणं नविन नाही... *विश्वास ठेवावा, पण आंधळेपणाने नाही*. *मनापासून जोडावं, पण स्वतः हरवून नाही* #☺️प्रेरक विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #☘️हर हर महादेव🙏🏼