डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी साधन मानले. याच विचारातून त्यांनी स्थापन केलेल्या people's Education Society ( PES)मार्फत औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.मराठवाडा प्रदेशात त्या काळी उच्च शिक्षणाच्या सुविधा अंत्यत मर्यादित होत्या. त्यामुळे ग्रामीण, वंचित आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी हा या संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता मिलिंद महाविद्यालयाचे नाव इंडो-ग्रीक राजा 'मिलिंद'( Menander)यांच्या नावावरून ठेवण्यात आले. बाबासाहेबांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समता स्वाभिमान आणि बौद्धिक प्रगती घडवून आणायची होती या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आणि परिसरात शैक्षणिक जागृतीची नवी चळवळ सुरू झाली.
#जयभीम 🙏🙇♀️📘✍️