विजय जयसिंग पाटील
522 views
13 hours ago
*किती खरं आहे* तुटलेलं जोडता येतं तोडलेलं नाही मन असो वा भांडं फरक कुठेच नाही ...!! पसरलेलं आवरता येतं पसवरलेलं नाही घर असो वा दार फरक कुठेच नाही ...!! कमावलेलं मिळवता येतं गमावलेलं नाही धन असो वा मान फरक कुठेच नाही ....!! सोडलेलं धरता येतं पकडलेलं नाही प्राणी असो वा माणुस फरक कुठेच नाही ...!! उपाशीपोटी जेवता येतं भरल्या पोटी नाही भुक असो वा वासना फरक कुठेच नाही ....!! हरवलेल्याला शोधता येतं निघुन गेलेल्याला नाही आपला असो वा परका फरक कुठेच नाही ...!! अडाण्याला शिकवता येतं दिड शहाण्याला नाही पाठ असो वा धडा फरक कुठेच नाही ...!! घेणा-याला देता येतं देणा-याला नाही ज्ञान असो वा सन्मान फरक कुठेच नाही...!! *सुभाष उमरकर सामनगांव नाशिक* *९०२२६२२८५६* #☕good morning Friends🌞