पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाचा सूर्योदय ! आजचा हा विजय केवळ एका पक्षाचा विजय नसून, बंगालच्या मातीतील त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे ज्याने 'सोनार बांगला'चे स्वप्न उराशी बाळगून टोकाचा संघर्ष केला. हा विजय समर्पित आहे त्या वीर बलिदानींना ! बंगालमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान दिले. घरादारावर नांगर फिरवला गेला, हल्ले झाले, खोट्या केसेस अंगावर घेतल्या, पण "भारत माता की जय" म्हणणारी ही जिद्द कधीही डगमगली नाही. संघर्षातून मिळालेले यशः गेल्या अनेक वर्षांपासून बंगालच्या गल्लीबोळात भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जो संघर्ष केला, तो आज फळाला आला आहे. हा विजय त्या प्रत्येक आईला समर्पित आहे जिने आपला मुलगा या राजकीय लढाईत गमावला. हा विजय त्या संघर्षाचा सन्मान आहे जो दहशतीच्या छायेतही निधड्या छातीने लढला गेला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा विजय... खऱ्या लोकशाहीचा विजय... बंगालच्या अस्मितेचा विजय ! आता खऱ्या अर्थाने बंगालमध्ये 'विकास पर्व' सुरू होईल. सर्व विजयी उमेदवारांचे आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक
अभिनंदन ! #WestBengalElection #BJPVictory #SonarBangla #KaryakartaShakti #Tribute ToMartyrs #NarendraModi #AmitShah #JP_Nadda
#सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेविरोधात भाजप आक्रमक