सहजच
आमच्या लहानपनी महाशिवरात्री म्हणजे वर्षातून एकदा येणारा मोठा सण असायचा घरात लहानपासून मोठ्यांचे सर्वांचे उपास असायचे गोड रताळी गोड खिचडी वर्षातून एकदाच मिळणार आंबटगोड कवठ खजूर ताट पूर्ण भरलेलं असायच दिवसभर शेजारी आमंत्रण मिळायचे कुणाच्या इथं वऱ्याचा भात शेंगदाण्याची आमटी तर कुणाकडे साबुदाणे वडे आमची चंगळ असे लहान होतो त्यामुळं त्यावेळी अटीट्युड वगैरे काही नव्हतं बिन्दास्त सगळीकडे फिरायचो आणि कोणीही आग्रह केला तरी न संकोच करता बसायचो त्यावेळी आमचे शेजारची माणसे मायाळू असायची त्यामुळं कधीच आम्हाला कमीपणा नाही वाटला वाडाच होता घर लहान होती पण माणसं मनाने खूप श्रीमंत होती पण आता ते बालपण ही नाही आणि ती मायाही नाही आता आपले फ्लॅट झाले आज घरात सगळे पदार्थ करून त्याचा फोटो आपण स्टेटस म्हणून ठेवतो कोणी घरी येत नाही कि आपण कोणाकडे जात नाही आपणच बनवलेलं आपणच खायचं पण आपल्या दृष्टीने तो सुवर्णंकाळ होता तो पुढच्या पिढीला माहित ही नसेल पण त्या काळाने आपल्याला खूप काही शिकवलं आता तुम्हाला नक्कीच तो काळ आठवत असेल लेख आवडल्यास नक्कीच सांगा
सौं सुरेखा दिगंबर शिळीमकर 🙏🏻🙏🏻🙏🏻 #🎭Whatsapp status