Follow
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
@1580718413
86,572
Posts
27,989
Followers
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
261 views
1 hours ago
मी शेवटचं एकदाच स्पष्ट सांगतोय... माझं प्रेम खोटं नाही , माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. कोणताही माणूस तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, तर मला नक्कीच त्रास होईल. पण त्याहून जास्त वेदना तेव्हा होतील, जेव्हा तू त्याला महत्त्व देशील, आणि त्याच्याशी जवळीक वाढवशील. तू फक्त माझी आहेस… हो, मी जलस होतो कारण मला तुला कुणासोबतही share करायचं नाही. तू फक्त माझी होतीस, आहेस आणि कायमची राहशील #🌹फक्त तुझ्यासाठी.. #📝कविता / शायरी/ चारोळी #💭माझे विचार #😍Love रिलेशन #🌹प्रेमरंग
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
233 views
1 hours ago
जेव्हा आपल्यासोबतचं कोणीतरी आपलं वाईट वागणं, गैरसमज, राग, किंवा त्रासदायक वागणूक सुद्धा शांतपणे सहन करतं, आपल्या प्रेमावर, आपल्यावर विश्वास ठेवत राहतं... तेव्हा त्या व्यक्तीचं प्रेम, तिचा विश्वास खरा आणि खोल असतो. कारण सहज परिस्थितीत प्रेम करायला सगळ्यांना जमतं, पण अडचणीच्या काळात, रागाच्या क्षणी, दुःखाच्या वेळी सुद्धा कोणीतरी तसंच प्रेम करत राहिलं, प्रश्न न विचारता फक्त आपल्यावर विश्वास ठेवला, तरच ते प्रेम "खरं" असतं. आणि जर अशा परिस्थितीत प्रेम, विश्वास डगमगलं, तर समजावं की अजून प्रेम पक्कं #🌹प्रेमरंग #😍Love रिलेशन #💭माझे विचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🌹फक्त तुझ्यासाठी..
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
292 views
1 hours ago
जर कोणी केवळ चांगल्या वागण्यावर प्रेम करत असेल, तर ते सोपं असतं... पण जो माणूस आपल्या रागात, त्रासात, गोंधळात सुद्धा आपल्यावर प्रेम करतो, तोच खरा असतो, त्याचं प्रेम खूप मूल्यवान असतं... माझ्या चुकीच्या वागण्यात तू जर फक्त चूक शोधलीस, किंवा शंका घेतलीस, तर प्रेम कुठं राहिलं आपलं? विश्वास कुठं राहिला? म्हणून मी सांगतो, मी कधी चुकतो, कधी रागावतो, पण माझं प्रेम तसंच आहे, कमी झालेलं नाही... #🌹फक्त तुझ्यासाठी.. #📝कविता / शायरी/ चारोळी #💭माझे विचार #😍Love रिलेशन #🌹प्रेमरंग
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
175 views
1 hours ago
“नात्यांची खरी किंमत” प्रत्येक गोष्ट पैशांनी मोजता येत नाही… काही नात्यांना किंमत नसते, ती फक्त मनाने जपावी लागतात… पैशांनी विकत मिळतात वस्तू, पण प्रेम नाही मिळत, हास्य मिळतं चेहऱ्यावर, पण मनाचं समाधान नाही मिळत… खरा श्रीमंत तोच असतो, ज्याच्याकडे माणसं असतात, कारण पैशांनी नाही… तर नात्यांनीच जीवन सुंदर बनतं… 💫 #🌹प्रेमरंग #😍Love रिलेशन #💭माझे विचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🌹फक्त तुझ्यासाठी..
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
272 views
1 hours ago
नातं नवरा-बायकोचं असतं... पण त्यात फक्त प्रेम नसतं, त्यात काळजी असते, सवय असते... आणि एकमेकांशिवाय अपूर्णता असते... सकाळी उठल्यावर "चहा घेतलास का?" हा साधा प्रश्नही प्रेमाचाच असतो, आणि "औषध घेतलं का?" ही विचारपूसच नात्याची खरी ओळख असते... तो कामावर जाताना तिची काळजी घेतो, ती घर सांभाळताना त्याच्या थकव्याची जाणीव ठेवते... हात दुखतो म्हणालं की अलगद मालिश करणारे हात, डोकं दुखतं म्हणालं की शांतपणे जवळ बसणारी साथ... पाण्याचा ग्लास देणं, औषध हातात ठेवणं, या छोट्या छोट्या गोष्टीतच मोठं प्रेम दडलं असतं... नातं टिकतं ते मोठ्या वचनांनी नाही, तर रोजच्या या छोट्या काळजीतून, समजुतीतून... आदर्श जोडपं तेच... जे एकमेकांसाठी जगत नाहीत फक्त, तर एकमेकांशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाहीत... शेवटी "मी आहे तुझ्यासाठी" ही भावना, संपूर्ण आयुष्य जगण्याची ताकद देऊन जाते... #😍Love रिलेशन #🌹प्रेमरंग #😘Love U Hubby #😘Love U बायको #💏नवरा-बायको
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
6K views
1 hours ago
पूर्वी कपाळावर कुंकू तेजानं झळकत असे गळ्यात मंगळसूत्र अभिमानानं सांगत असे… हातातल्या हिरव्या चुऱ्यांची खणखण, तिच्या आयुष्याची गोड ओळख सांगत असे… पण आता सगळं साधं, शांत आणि मोकळं झालं ना कुंकूची अट ना दागिन्यांची गरज राहिली… तरीही परंपरेचा एक नाजूक धागा अजूनही आहे अगदी हलक्या स्वरात स्वतःची कहाणी सांगणारा… पायातलं जोडवं… पावलांसोबत हळूच नाद करणारं जाणिवांच्या पलीकडचं काहीतरी जपणारं… नजरेत न भरता मनाला भिडणारं आणि नकळत सांगून जाणारं ती कोणाच्या तरी प्रेमाची कोणाच्या तरी संसाराची साथी आहे…💯 #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍Love रिलेशन #💭माझे विचार #🙋‍♀️स्त्री अभिमान
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
268 views
1 hours ago
कधी कधी माणूस चुकीच्या नात्यात अडकतो, पण त्या नात्यात राहून आयुष्य बरबाद करणं शहाणपण नसतं… तिथून बाहेर येणं हे स्वतःवरचं प्रेम असतं. पण समाज काय करतो? नातं टिकलं नाही म्हणून दोष देतो… Divorcee म्हणून ओळख देतो… कुणी विचारत नाही की त्या नात्यात तिचं आयुष्य किती हरवलं होतं, तिचं मन किती तुटलं होतं… चुकणं हा गुन्हा नाही... पण स्वतःसाठी चुकलेल्या गोष्टींपासून दूर जाणं, हे लोकांना नेहमी गुन्हाच वाटतं #💭माझे विचार #😍Love रिलेशन #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग #💔जख्मी दिल
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
281 views
1 hours ago
💙वांझ .... वंदनाने रागात दरवाजा उघडला रडून लाल झालेले डोळे. दरवाजा जोरात आपटला , हातातील पर्स सोफ्यावर फेकली .. बेडरूममध्ये जावून बेड वर पडून परत रडू लागली. माझीच चूक .सगळ खापर माझ्यावरच फोडतात . मागच्या जन्मी काय पाप केलेलं ? मीच का ? मीच का ? स्वत:शीच बडबडत तिथेच रडत रडत झोपून गेली. बऱ्याच वेळान खडबडून जागी झाली सगळीकडे अंधार पडला होता गडबडीत उठून लाईट लावले संध्याकाळचे सात वाजले .इतका वेळ कसे झोपलो , किती बेजबाबदार वागलो !!!!! सासुबाई !!!!! त्यांनी हाक नाही मारली ... ती पळत त्यांच्या रुमकडे गेली लाईट लावली . Sorry आई !!! खरचं sorry . थोडं पडले बेडवर आणि तिथेच डोळा लागला तुम्हाला खूप वेळ अंधारात बसावं लागलं. सहाचा चहा .... मी चहा घेऊन येते. ती पटकन किचन मध्ये आली चहा बनवून घेऊन आली. आई !!! चहा . एक मिनिट मी उठवून बसवते .तिने सासूबाईंच्या मानेखाली एक हात घालून दुसऱ्या हाताने पाठी मागे उशी लावून त्यांना बेडला टेकून बसवलं. त्यांच्या अंगातला गाऊन सरळ केला बशीत चहा ओतून फुंकर घालून थंड झाल्यावर त्यांच्या ओठाला बशी लावली . आई रागावलात का ओ ?? सासूबाई - गोड हसून वंदना !!! नाही ग होत असं कधी कधी. मुद्दाम नाहीस करणार माहित आहे मला !!! वंदनाने चहा झाल्यावर पाण्याचा हात तोंडावरून फिरवून रुमालाने त्यांचे तोंड पुसले तितक्यात दारावरची बेल वाजली.आई मी बघते हं ! आलेच . वंदना - आई माने काकू आहेत . काकू बसा मी पाणी घेऊन आले. माने काकू - सासूबाईंना वहिनी तुम्हालाच भेटायला आले !!! कशा आहात ? सासूबाई - मी मस्त मजेत. तुम्ही बोला !! कशा आहात ? माने काकू - एकदम छान तिन्ही पोरांची लग्न झाली .तिघांनाही मुलंबाळं आहेत . खूप आनंदात. माने काकू अडखळत .. वहिनी !!! एक विचारू ?रागावणार तर नाही ना ? सासूबाई - संकोच कसला विचारा ! माने काकू - ते .... वंदना ला काही औषध पाणी कुठं घेतलं का नाही ? सासूबाई - कशासाठी ? ती तर एकदम ठणठणीत आहे . माने काकू - अहो असं काय करता लग्नाला तेरा चौदा वर्षे तरी झाली असतील अजून ते .... मुलंबाळं...... वंदना पाणी घेऊन येत होती .शेवटचा शब्द ऐकून पावलं तिथंच थबकली .आत जायची हिंमतच नाही झाली . तिचे डोळे पाण्याने डबडबले. दुपारी पूजेसाठी गेले तिथंही साऱ्यांचा हाच प्रश्न ,त्या बायकांच्या नजरा , ती कुजबूज . असंख्य प्रश्न .... शिक्का... वांझपणाचा ..... तेवढ्यात तिला सासूबाईंचे शब्द कानावर पडले.पण तिला तर मुलं आहे की ,ती आई आहे एका मुलीची आठ वर्षाच्या .माने काकू गोंधळल्या .आणी म्हणाल्या काहीही काय बोलता वहिनी ? आम्हाला कसं माहित नाही. वंदना ही बाहेर दचकली , हडबडली . स्वतःशीच - आई अशा का बडबडतायत . वयोमानानुसार मनावर काही परिणाम.... वंदनाला भीतीच वाटली ... तेवढ्यात परत सासूबाईंचा आवाज आला ही काय तुमच्या समोर ठणठणीत बसलेय तिची मुलगी !!! माने काकू आश्चर्यानं मला काही कळलं नाही ! वंदनाही आई काय बोलतायत ते काळजीने पण लक्षपूर्वक ऐकू लागली. सासूबाई - माने काकू वंदना माझी सून नाहीच. आठ वर्ष झाली ह्या मुलीचा जन्म झाला ! त्यावेळी ती आई झाली जेव्हा मोठ्या अपघातातून मी वाचले पण दोन्ही पाय गमावून ... साडे सात महिने कोमात होते फक्त जिवंत आयसीयू त पडलेली. लेकानं कसलाच विचार न करता हॉस्पिटल मध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला .जीव वाचला पाय गमावले कायमचे .त्या डोळे मिटून क्षणभर मागे पडल्या. तुम्हाला सांगू माने काकू मृत्यूची वाट बघत होते पण माझी आई - वंदना जिने साडे सात महिने वाट बघितली डोळ्यात प्राण आणून आणी जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तिच्या चेऱ्यावरचा आनंद आई झाल्यावर पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर होतो न तितकाच अवर्णनीय होता , ओसंडून वाहत होता अगदी . हे बाळ तिनं स्विकारले जसं आहे तसं . माने काकूंचे डोळे भरून आले . सासूबाई पुढे सांगू लागल्या . ही आई गेली आठ वर्ष सकाळी लवकर उठून आपल्या बाळाला स्वतःच्या हातानं न्हावू माखू घालून छान स्वच्छ कपडे घालून सगळ्या आंगाला सुगंधी पावडर लावते ,छान तेल लावून वेणी फणी करते. ओला झालेला बिछाना दिवसातन तीन तीन वेळा बदलते आणी कधी शरीरात वेदना झाल्या तर मी रात्र रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागी राहते . उशाशी बसून असते न कंटाळता .आणी खायला दोन तीन तासांनी गरम गरम हवं ते तांदळाची खीर , पेज , नाचणीची खीर , कधी फळांचा ज्यूस चमच्याने थोड थोड तासभर भरवत बसते . इकडच्या तिकडच्या गप्पा मारत . कधी अंगावर सांडल तर त्रागा न करता कपडे बदलते . रुमालाने तोंड पुसते . कोण करत हे सगळं फक्त एक आईच ....एवढा संयम , सहनशीलता कोणात असते .....फक्त एका आईत .... लहानग्यान कितीही दमवावं आईन प्रेमानं सारं सहन करावं .सारे नखरे रूसवे फुगवे झेलावेत . गुणाच ते बाळ माझं म्हणत मन जपावं , लाड करावेत . बघा हं खुट आवाज जरी झाला तरी आई जागी होते रात्रीची कितीदा तरी उठून बाळाला बघते शांत झोपलय का तशी ही माझी आई रात्रीची चारदा मला बघून जाते. अंगावरच पांघरून नीट करते....... आईला नाही शिकवावं लागत बाळाला कस सांभाळायचं ! एका स्त्रीत ते सारं उपजतच असत नाही का ? माझ्या आईने आठ वर्ष झाली कसलीच हेळसांड नाही केली ह्या जीवाची . डोळ्यात किती वात्सल्य , माया . माझ्या वेदना देणाऱ्या मनावर मायेची हळूवार फुंकर घातली . प्रेमाचं अत्तर शिंपडल त्याच्या शिडकाव्याने आयुष्य परत सुगंधीत झालं . किती नाजुकतेने सांभाळलं हे नातं .आईच मन असतंच निर्मळ . ना कसला स्वार्थ ना परतफेडीची अपेक्षा . फक्त आनंद द्यायचा . दुःख सारं खोल अंतरंगात लपवून ठेवायचं . फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं ? इतकं सोपं का आई होणं ? तिने साडे सात महिने वाट बघितली माझी कोमातून बाहेर येण्याची नवीन दिवस नवीन त्रास तरी ही आशेवर जगत आली . तिला ओढ होती मला कधी एकदा डोळे भरून पाहते याची . मी शुद्धीवर आले तो दिवस तिच्यासाठी प्रसववेदना सहन केल्यानंतर बाळाला बघितल्यावर होणाऱ्या आनंदा इतकाच श्रेष्ठ अच्युतम होता ......ती वांझ नाही... नक्कीच नाही.. !!! माने काकू. "आपण विचारांनी वांझ आहोत " नवीन विचारांना , नविन बघण्याच्या दृष्टीला आपण जन्मच नाही देत . मला सांगा समाजात जे म्हाताऱ्या आई-वडिलांना सांभाळत नाहीत , त्यांच्याकडे आजारपणात , त्यांच्या दुःखाच्या काळात ढुंकूनही बघत नाहीत ती वांझ नाहीत. वर्षानुवर्षे आई वडील , भाऊ - बहीण एकमेकांशी बोलत नाहीत ती नात्यांनी वांझ नाहीत . संवेदनाहीन , दुसऱ्याच्या दुःखात आनंद माणनारी ती खरी वांझ.......... वांझपण मुलाला जन्म दिला का यावर ठरवावं ?? वांझपणाचा शिक्का मारून आपण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अपमान करतो . आपण तिचं अस्तित्व नाही नाकारत आपल्यातल्या माणूसपणा वर प्रश्न निर्माण करतो . एखादी स्त्री वांझ हे ठरवणारे आपण कोण ?? मुलगी झाली तर मुलगा हवा , दोन मुलगे असतील तर एक तरी मुलगी पाहिजेच बाई , आणि काहीच नसण्यापेक्षा मुलगी तर मुलगी . असले विवेकशून्य तकलादू , मतलबी, विचार आणि स्वतःच्या सोयीनुसार वाटा शोधणारे आपण तिचं मोजमाप नाही करू शकत !! तिला वांझ आपण ठरवणार ? समाज तिचं मातृत्व शोधतो ना तेव्हा स्व:तचं पोकळपण उघडं करतो . स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच पण माझ्या सारख्याची आई होण त्यासाठी आत्म्याची किती अथांगता , गहनता , मनाची शुद्धता हवी विचार करा. माझी वंदना सोडून कोण आलं ? ह्या अपंग लेकराला झिडकारल नाही तिन हे सामर्थ्य ताकद फक्त एका आईची .. माझ्याही पोटच्या मुली आल्या तर तासभर भेटून गप्पा मारतात , आपुलकीने चौकशी करून निघून जातात. त्यांचा संसार , मुलंबाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे ? मग मी मुलांना जन्म देवून ही वांझच ठरले का हा प्रश्न माझा मलाच पडतो तो पडायला हवा . माने काकू तुमची स्वतःची मुलगी गेली सात वर्षे तुमच्याशी बोलत नाही मानपानावरून भांडण झाले म्हणून.तुम्ही म्हणता पोटच्याचा जीव कळकळतो त्यालाच शेवटी आपली माया येते असं असतं तर मागच्या वर्षी तुमचा पाय मोडला दोन महिने जागेवर होता लेक आईला बघायला ही नाही ना आली . अशावेळी आपण वांझ का हा प्रश्न पडू द्यावा मनाला . दुसऱ्यांच्या लेकरावर शिक्का मारताना आपल्यातल्या उणीवा दोष पडक्या बाजू सोयीने लपवायच्या हा तिच्यावर अन्याय नाही ! एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन माझी वंदना घराची आई झाली माझ्या लेकाची आई झाली. माझ्या मुलींना मायेने जपते. साऱ्यांचे हेवेदावे , टोमणे , रागलोभ सारं पोटात घालते देते ते फक्त प्रेम आईसारखं .निर्मळ ,निखळ . नात्यांची आई होण सोपं नाही ! प्रत्येकाचं पोट भरल्याशिवाय ह्या अन्नपूर्णाच्या घशाखाली घास नाही उतरत , ती ह्या घराची लक्ष्मी जिच्या बांगड्यांच्या किणकिणाटाने आणी पैजनाच्या आवाजाने साऱ्या घरात चैतन्याचा ,उत्साहाचा जन्म होतो. जिच्या घरातील अस्तित्वाने देवघरातील देवही आनंदी दिसतात आणि मनापासून आशिर्वाद देतात , जिच्या असण्याने बागेतली फुलं आनंदाने डुलतात , जी बागेतील प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेते , जिच्या सुंदर हातातून तुळशीपुढे रोज नविन रांगोळी जन्म घेते . ह्या घराला जिने घरपण दिलं , ह्या म्हाताऱ्या लेकीला जिने नविन आयुष्य दिलं ,जग दाखवलं ,भरभरून जगणं शिकवलं ती वांझ कशी असेल......... माने काकूंच्या डोळ्यांतून वाहणारं पाणीच त्यांच्या मनाची अवस्था सांगत होतं....... हे सारं एकून वंदनाच्या चेहऱ्यावर तृप्ती , भारावलेपण ! काय नव्हतं . आईपणाची नविन जवाबदारी सांभाळण्यासाठी आनंद , आत्मविश्वास , उर्जा घेऊन परत एकदा नव्याने सज्ज झाली . मनावरचं ओझं, मळभ , जळमटं सारं काही दूर झालं ...... वेगळ्याच आनंदाने चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं ... #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💗प्रेम #😍Love रिलेशन #💭माझे विचार
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
230 views
1 hours ago
💙अगम्य योगायोग .... पायल माझी पत्नी खूप हळवी व भावुक आहे.दोन वर्षे होत आली आमच्या लग्नाला पण अजूनही मी कुठं बाहेरगावी जाणार म्हटले की, तिला धास्ती वाटते. एक सारख्या सूचनांचा भडीमार माझ्यावर करत राहाते. आता धंदा करायचा म्हटलं की कामा निमित्ताने बाहेरगावी जावे लागणार, अधून मधून बाहेरगावी मुक्काम पण करावा लागणारच. माँ व बाबूजीनी तिला कितीही समजावलं तरी तिच्यात फरक होत नाही. अलीकडे बाबूजींनी धंद्यांची थोडी जबाबदारी माझ्यावर द्यायला सुरवात केली आहे आणि ते योग्यही आहे. वयाची तिशी आली आहे आता माझ्या, या वयात मला धंद्यात लक्ष घालणे अगदी जरुरीचे आहे. बाबूजींनी खूप मेहनतीने उभा केलेला हा धंदा तितकीच मेहनत घेऊन मला सांभाळायला हवा. शहरातील बाजारपेठेत आमची दोन मोठी रेडिमेड कपड्यांची दुकानें आहेत . मोठया प्रमाणात होलसेल कपडे वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवून शहरापासून थोडं दूर असलेल्या गावाजवळ एका मोठ्या गोडाऊन मध्ये सर्व माल ठेवला जात असे. तिथून लागेल तसा दुकानात आणला जातो.आज पण असेच माल भरून ट्रक आलेले होते.तो माल उतरवून गोडाऊन मध्ये ठेवायचं कामं सुरु होते.ट्रकचे ड्रायवर एका बाजूला थांबून काम कधी संपतंय याची वाट पाहात होते. रात्र झाली तशी त्यांना परत जायची घाई झाली होती. आज आमचे मुनीमजी दुकानात आले नव्हते त्यामुळे बाबुजींनी हे काम माझ्यावर सोपवलं होते. आलेला माल दिलेल्या ऑर्डर प्रमाणे बरोबर आहे का ते चेक करायची जबाबदारी माझी होती. त्याची गुणवत्ता चांगली आहे का ते पण तपासायचं होते. रजिस्टर मध्ये त्याप्रमाणे नोंदणी करायची होती. मगच पेमेंट ऑनलाईन करायच होत. कितीही घाई केली तरी सर्व आवरायला रात्रीचे नऊ वाजून गेले. ट्रक ड्रायव्हर निघून गेले तरी गोडाऊन मधलं माझं काम संपायला वेळ लागला.आता घरी परत जायचं म्हणजे आणखी दोनअडीच तास तरी सहज लागणार होते. घरी हे कळवले तर माँ, बाबूजी, माझी पत्नी पायल हे सर्वजण आता काळजी करणार.त्यामुळे फोन न करता मी गाडी सुरु करुन मार्गस्थ झालो. रस्ता गावाकडचा असल्याने हायवेच्या मानाने अरुंद होता. मला स्वतः ड्रायविंग करायची आवड असल्याने मी आज ड्राइवर आणला नव्हता. त्यामुळे माझ्या सोबत कुणीच नव्हतं.मी या बाजूला फार कमी वेळा आलो असल्याने रस्ता फारसा माहितीचा नव्हता. जेवणाची वेळ होऊन गेली होती. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. या रस्त्यावर तर अंधारा शिवाय काही दिसत नव्हते. फक्त गाडीच्या हेड लाईटचा उजेड होता. पोटात भूक आणि जवळचे पाणी पण संपले त्यामुळे कुठे लहानसे हॉटेल जरी मिळाले तर पोटापाण्याचा प्रश्न मिटेल असे मनात विचार येत होते. पण दोन्ही बाजूला किर्रर्र झाडी आणि गडद अंधार काही संपत नव्हता. अशातच पुढे गेल्यावर गाडी एका आडव्या रस्त्याजवळ आली. त्या रस्त्यावरून डावीकडे जावे का उजवीकडे जावे हे अंधार असल्यामुळे समजत नव्हते.कुणाला विचारावं तर रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हते.तिथे एक पाटी लावली होती. पण अक्षरे अगदी पुसट होती. त्यामुळे काही कळत नव्हते. मी गाडी थोडा वेळ थांबवली. कुणी आलं तर विचारावं म्हणून. पंधरा मिनिटं होऊन गेली तिथे थांबून पण कुणीच आलेलं दिसेना. मनात नको ते विचार येऊ लागले. गोडाऊनवर परत जावे का असा विचार आला. कारण तिथं जवळपास आणखी काही जणांची गोडाऊन होती. प्रत्येकाच्या गोडाऊनला वाचमन होते. तिथून गाव पण जवळ होते. तिथं जाऊन काही तरी खाता आले असते. तितक्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. पायल फोनवर विचारत होती घरी कधी येणार म्हणून. तिच्या आवाजातील काळजी जाणवत होती. "अग, मी आता निघालोय, पोहोचेन थोडया वेळात. " पुढं काही बोलणार तोच बॅटरी पूर्ण संपली. कार मध्ये चार्जर होता त्यावर फोन चार्जिंगला लावला.अंगावर थोडे फार सोनं होते ते काढून रुमालात बांधून सीट खाली ठेवून दिले.न जाणो कुणाला ते पाहून चोरायचा मोह व्हायचा आणि त्यासाठी मला इजा व्हायचाहि धोका होता. आणखी दहापंधरा मिनिटं तिथं थांबलो तरी कुणी येईना. घड्याळात आता अकरा वाजायला आले होते व मी अजून कुठे आहे हे ही मला समजेना.रात्रीच्या अंधारामुळं मनावर दडपण येऊन घाबरायला झालं. आतापर्यंत आवडीने वाचलेल्या गूढकथा, भूतकथा मनात फेर धरू लागल्या. यावेळी माँ नं मला देवीचे स्तोत्र शिकवताना सांगितलेले आठवले. अडचण आली किंवा संकट आले असता देवीवर भरवसा ठेवून हे स्तोत्र म्हणत जा.तुला नक्की मार्ग मिळेल. असे सांगून तिने मी लहान असतांना माझ्याकडून हे स्तोत्र पाठ करून घेतले होते. मी लहानपणापासून खूप खोडकर होतो. माझ्या भावंडांबरोबर दंगामस्ती करायला मला खूप आवडायचे. देवीचे स्तोत्र म्हणायला मला आवडत नसे. पण माँ दररोज आम्हा सर्वं भावंडांना संध्याकाळी बरोबर घेऊन देवापुढे बसून हे स्तोत्र म्हणायला लावायची. मी फार श्रद्धाळू नाही. तरीही अजून मी तो नियम पाळतो. आता ही मी डोळे बंद करुन देवीचे स्मरण केले आणि ते स्तोत्र एकाग्र चित्त करून म्हटले. मोबाईलच्या जीपीएसवरून रस्ता माहिती होतो. हे अँप इंटरनेट वर चालते. मघाशी गोडाऊन मध्ये असतांना मी व्हाट्सअप सुरु करून पाहत होतो पण रेंज नव्हती. आता आली आहे का बघावी, कदाचित आली असेल तर जीपीएस सुरु करता येईल. म्हणून मोबाईल चार्जर मधून काढून पाहिला तर इंटरनेटची रेंज नव्हतीच.आता आपणच आपला मार्ग शोधला पाहिजे हा विचार करून मी गाडी स्टार्ट केली. कुठली बाजू निश्चित करावी यावर थोडा विचार करून दोन्ही बाजूपैकी एक निवडली आणि मार्गस्थ झालो. हा रस्ता पण सुनसान होता. बाहेर खूप थंडी पडली होती. माझ्याजवळ गरम कपडे नव्हते त्यामुळे गाडी चालवताना आतमध्ये चांगलीच थंडी जाणवत होती. कदाचित थंडीमुळे बाहेर रस्त्यावरून जाणारे येणारे कुणी दिसत नसावेत. इतक्या थंडीत तशी निकडीची गरज नसेल तर कोण बाहेर पडणार म्हना !! मी मनात विचार करत होतो. अर्धा पाऊण तास झाला तरी हायवे येत नव्हता. आपण नक्की कुठे चाललोय तेही समजत नव्हते. इतक्यात रस्त्याच्या बाजूला थोडया अंतरावर एक घर दिसले. आत मध्ये अंधुक उजेड दिसत होता.गाडी थांबवून तिकडे जाऊन जेवण मिळते का पाहावे असा विचार मनात आला. पण आतून मी घाबरलो होतो. त्या सुनसान रस्त्यावर हे एकटेच घर कसे काय? हा भूताटकीचा तर प्रकार नाही ना असा मनात विचार आला. मी गाडी न थांबवता पुढे निघालो. पण दुर्दैव माझ्या आड आले आणि गाडी अचानक बंद झाली. गाडी सुरु करायचा खूप वेळ प्रयत्न केला . गाडीचे बोनेट उघडून काही फॉल्ट सापडतो का ते टॉर्च लावून पाहिले.पण सर्वच व्यर्थ झाले. शेवटी मी गाडीत आतच काचा बंद करून थांबायचे ठरवलं. सकाळ होईतो असेच बसून राहावे.नंतर काय ते पाहता येईल.असा विचार करून मी गाडीत मागच्या सीटवर आडवा पडलो. पण इतकी थंडी वाजू लागली की आपण आता या गारठ्याने मरून जाऊ असं वाटू लागले.गाडीत थांबणे अशक्य वाटल्या नंतर त्या घराकडे जाण्या शिवाय मला दुसरा मार्ग दिसेना.मी पुन्हा एकदा देवीचे स्तोत्र म्हटले. मनात तिचं स्मरण करुन प्रणाम केला आणि खाली उतरून गाडी व्यवस्थित बंद करून त्या घराच्या दिशेने चालू लागलो. मी अतिशय घाबरून थंडीमुळे अक्षरशः थरथर कापत होतो. आपल्याला कुठल्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार हे समजेना. आपल पुढे काय होणार आहे याची मनात भीती वाटू लागली . माँ, बाबूजी व पायल यांची आठवण येऊन वाईट वाटले. तरीही मनात मी देवीचे नामस्मरण करीत होतो. शेवटी काय व्हायचे ते होउंदे घाबरायचे कशाला असा निर्धार करून मी घराजवळ पोहचलो. दरवाजा थोडासा उघडा दिसला. मी आवाज दिला आणि विचारले कुणी आहे का. आतून कुणीच उत्तर दिले नाही पुन्हा आवाज दिला तर दार थोडं उघडले. 'या आत 'आतून स्त्रीचा आवाज आला. आतमध्ये गेलो तर तिथे थोडया मंद प्रकाशात आतील बाजूला एक स्त्रीची आकृती दिसली. मी तिला नमस्कार करून म्हणालो " "माझी गाडी बंद पडली आहे मला एक रात्र इथे झोपायला दिले आणि खूप भूक लागलीय तर काही खायला मिळाले तर ठीक होईल." " सर्व व्यवस्था केली आहे त्या बाजूला." असेच म्हणून त्या आकृतीने हाताने दाखवले तर खरंच तिथे झोपायची व्यवस्था केलेली दिसली. थोडी फळे आणि दूध व पाण्याचे भांडे ठेवलेले दिसले. मनातून खूप आश्चर्य वाटले पण भूक इतकी लागली होती की जास्त वेळ न थांबता फलाहार केला, दुध पण प्यालो व आता तिथल्या अंथरुणात झोपताना नित्यनेम म्हणून देवाला नमस्कार करून डोळे मिटून पुन्हा देवीचे स्तोत्र मनातच म्हणलो. मन शांत करावे म्हणून थोडा वेळ नामस्मरण केले.नंतर झोपावे म्हणून चादर अंगावर घेतली. त्यावेळी खरंच आपण भुताटकीच्या घरात आहोत काय? हे सर्व आपल्या साठी कोण करत आहे? अशी अनेक प्रश्नचिन्हे मनात फेर धरत होती. पण डोळयांवर इतकी झोप होती की जास्त विचार करणे अशक्य होते. पाणी प्यायलो आणि गाढ झोपी गेलो. कधीतरी मी जागा झालो, मोबाईल वर वेळ पहावी तर तो जवळ नव्हता. तसाच उठलो. अंथरुण गुंडाळून ठेवले आणि जाताना आवाज दिला पण आतून काही उत्तर आले नाही. घरातून बाहेरआलो तर थोडा अंधुक उजेड होता.बहुतेक पहाटेची वेळ असावी. गाडी उघडून चार्जरला लावलेला मोबाईल काढला. सकाळचे सहा वाजले होते. पायलचे खूप मिसकॉल आलेले बघून तिला मी फोन करून सांगितले "मी अगदी ठीक आहे, गाडी नादुरुस्त झाली होती त्यामुळे रात्री येऊ शकलो नाही. फोनची बॅटरी संपल्यामुळे फोन करू शकलो नाही. आता थोडया वेळात निघेन." नंतर बाहेर येऊन गाडी उघडून काय बिघाड आहे ते पाहू लागलो. आता चांगले उजाडलं होतं. जरा वेळाने तिथून मोटारसायकलवरुन जाणारी दोन माणसे गाडी जवळ थांबली. त्यातील एकजण म्हणाला, "मी कार मेकॅनिकच काम करतो. मी बघू का काय बिघाड आहे ते? "मी होकार दिल्यावर त्याने रिपेरिंग करायला सुरवात केली. विशेष जास्त दुरुस्ती नसल्याने अर्ध्या तासात गाडी दुरुस्त झाली. इथून मागे वळा व सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर हायवे लागेल असं तो सांगून गेला. परत जाताना त्या घरच्या माणसं उठली असतील तर त्यांचे आभार मानून निरोप घ्यावा म्हणून मी तिकडे गेलो तर एक वृद्ध स्त्री तिथं बाहेर दिसली. तिला मी म्हणालो.... "काल इतकी रात्र झाली असतानाही माझी इथे झोपण्याची सोय केलीत . खायला दिलेत त्याबद्दल मी तुमचा व तुमच्या घरातील सर्वांचा खूप आभारी आहे. "असे म्हणून तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला. ती म्हणाली..... "बेटा, मी काल रात्री इथे एकटी होते. आमचे एक नातेवाईक माझ्या सोबतीला रात्री येतात पण त्यांना यायला उशीर लागणार होता म्हणून मी हा बाहेरचा दरवाजा थोडासा उघडा ठेवला होता. ते रात्रीचं जेवत नाहीत म्हणून थोडी फळे, दूध व पाणी ठेवले होते. अंथरुण घालून ठेवले होते. तसेच रात्रीसाठी लावायचा नाईट बल्ब लावला होता. आमच्या घरातील सर्वजण दोन दिवसापूर्वी तीर्थयात्रेला गेलेत.मला रात्रीचे जास्त दिसत नाही, ऐकायला कमी येत.वयोमानाने स्मरणशक्ती पण आता कमी झाली आहे. त्यामुळे कदाचित मी तुला रात्री आमचा नातेवाईक समजले असेन. तु म्हणतोस की, आम्ही तुला रात्री खायला दिले, पाणी दिले. झोपण्याची व्यवस्था केलीत. नक्कीच तुझ्यावर देवाची कृपा आहे.म्हणून इतक्या रात्री योगायोगाने तु आमच्या घरात आश्रयाला आल्यावर इथे तुझी सर्व सोय झाली. देव तुझा पाठीराखा आहे. ईश्वर तुझे भले करो. " त्या वृद्ध स्त्रीला मी पुन्हा एकदा नमस्कार केला. तिचा निरोप घेऊन घरी आलो. घरी परत आल्यानंतर मी माँबाबूजी व पायल यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना खूप आश्चर्य वाटले.माझ्यावर अशी वेळ आलेली ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.देवावरचा आमचा विश्वास आणखी दृढ झाला. देवीचा जागर घरी घालवायचा असं सर्वानुमते ठरलं. त्याआधी पायल व माझे माँबाबूजी यांनी त्या वृद्ध स्त्रीला भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मी एक दिवस त्या सर्वांना घेऊन तिकडे गेलो. बरोबर आमचे मुनीमजी पण होते. त्यावेळी आम्ही पुष्कळ शोधले, खूप जणांना विचारून पाहिले. पण आम्हाला ते घर काही सापडले नाही. काही योगायोग खरंच अगम्य असतात....... #💭माझे विचार #😍Love रिलेशन #💗प्रेम #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग
꧁𓊈𒆜🆂🅳🅺2🅶🅴🆃🅷🅴🆁𒆜𓊉꧂
352 views
1 hours ago
💫"आरती आत ये जरा".... "हा आले" बोलुन आरती आपल्या कामाला लागली... रात्रीचे साडे दहा वाजून गेले होते. घरात सगळ्यांची जेवणं आटपून आता भांडी आणि इतर कामं आटपायची राहिली होती. आरती किचनमध्ये सगळं आवरत होती. नवऱ्याने आत ये सांगितल्यावर तिचा चेहरा उतरालाच... तो पुढे काय सांगणार आहे याचा तिला अंदाज होताच... भांडी तशीच ठेऊन ती आधी बेडरूममध्ये गेली. "हा बोला... काय झालं? मला का बोलावलंय तुम्ही?" "कामं आटपून लवकर ये. सचिन झोपला ना? त्याला आईजवळ झोपवून ये. उगाच वेळ काढत बसू नकोस" त्याचा हा धमकीवजा स्वर आरतीला नवीन नव्हता. ती हो म्हणून किचनमधे कामं आटपायला गेली. खरंतर आज तिला सकाळपासूनच जरा दमल्यासारखं वाटत होतं. पाळी जवळ आल्यामुळे होतं कदाचित. त्यात आता कामं आटपून यायला सांगितलं आहे म्हणजे आजपण काय होणार या विचाराने तिला अंगात शिरशिरी आली.... " नाही... मी नाही येणार.... नाही आहे माझी आज इच्छा... मनाची आणि शरीराची तयारी तर मुळीच नाही आहे. थकले आहे मी... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामं करून करून... आणि आता रात्री तुमची इच्छा पूर्ण करायला नाही येणार मी..." मनातल्या मनात हा हुंदका फुटत होता तिच्या... हे सगळं ओठांवर येतं होतं पण आवाज साथ देत नव्हता... सासूच्या आणि नवऱ्याच्या धाकाने पुरती घाबरून होती ती. कितीही काही वाटलं तरी कुठल्याच गोष्टीत ती काहीच बोलू शकत नव्हती..... आरती ,तिचा नवरा विशाल, त्यांचा मुलगा सचिन आणि सासू सासरे असा परिवार होता तिचा. माहेरी आई वडील, एक भाऊ आणि एक बहिण अशा कुटुंबात लहानाची मोठी झालेली आरती... पण लहानपणापासूनच आधी वडिलांच्या आणि नंतर मोठ्या भावाच्या धाकात वाढलेली ती... तिची दुसरी बहीण तिच्यापेक्षा लहान असली तरी स्वभावाने जरा खमकीच होती. दोघींनाही मुलगा आणि मुलगी यातला फरक समजावतच लहानाचं मोठं केलं गेलं होतं... त्यात आईचा स्वभाव गरीब असल्याने आणि वडील हेकेखोर असल्याने घरात वडीलांचाच शब्द प्रमाण मानला जायचा. त्यांच्यापुढे बोलायची कुणाचीही हिम्मत नव्हती. त्यामुळे मुलांविषयी एकप्रकारचा राग होता आरतीच्या मनात... वडिलांनी आरतीचे लग्न तिच्यापेक्षा साधारण नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या विशालशी लावून दिलं ते फक्त त्याचं घर आणि पैसा बघून. त्यावेळी सुद्धा मनात नसताना वयाच्या एकविसाव्या वर्षी आरती लग्नाला उभी राहिली होती...... मनात एकच आशा होती तेव्हा की होणारा नवरा आपल्याला समजून घेईल.... सुरुवातीला सहा महिने बरे गेले पण नंतर तो तिच्यावर पुरुषी अधिकार गाजवू लागला... लग्नानंतर सहा महिन्यातच ती गरोदर राहिली होती. इथे सासूबाई कजाग होत्या आणि सासरे मवाळ. आईच्या तालमीत आणि लाडात मोठा झालेल्या विशालला "मी" पणाची बाधा झाली होती. सासूबाईंचा रोजच्या प्रत्येक गोष्टीत केलेला हस्तक्षेप, मुलाचे सतत बायकोविरुद्ध कान भरणे, मुलासाठी तगादा लावणे, टोमणे मारणे या आणि अशा अनेक गोष्टींमुळे आरती कंटाळली होती.... नवरा तर फक्त ऑफिसला न्यायचा डबा, रात्रीचं जेवण यापुरताच वाट्याला येत होता. गरोदरपणातही त्याने कधीच नवरा या नात्याने तिला समजून घेतलं नव्हतं... स्वभावाने साध्या आणि भावनाशील आरतीला हे सगळं पचवायला खूप जड गेलं... पहिलाच मुलगा झाला... सासूबाई आणि नवरा खूप खुश झाले. मुलगा झाला म्हणून आरतीशी काही दिवस जरा चांगले वागले. मुलगा जसा मोठा होऊ लागला तसं पुन्हा गाडी मूळ पदावर आली. आता तर सचिनचे नको तितके लाड केले जाऊ लागले त्याच्या बाबा आणि आजीकडून. तो एक मुलगा आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हे जन्मापासूनच त्याच्या मनावर बिंबवले जाऊ लागले.... आरतीला खूप वाटत होतं की आपल्या मुलाला हे शिकवावं, ते सांगावं. आपल्या पद्धतीने मोठं करावं पण सासू आणि नवऱ्यापुढे तिचं काहीच चालत नव्हतं... आता सचिन दोन वर्षांचा झाला होता. अति लाडामुळे खूप हट्टी आणि चिडखोर स्वभाव झाला त्याचा. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाविरुध्दच होत आहेत हे आरतीला आतून सतत पोखरून काढत होतं.... मुलगा झाल्यावर त्याच्यात आपलं विश्व शोधायचं ही एक आशा पण मावळली होती तिची.... आता सचिन आजी आजोबांकडे झोपायला लागला होता त्यामुळे विशालच्या अपेक्षा पुन्हा सुरू झाल्या होत्या... अशातच लॉकडाऊन लागला आणि प्रायव्हेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारा विशाल एकाएकी work from home च्या नावाखाली घरात राहू लागला. मार्च, एप्रिल, मे... एकामागोमाग एक महिने उलटत चालले होते... घरात राहून सुद्धा विशाल फक्त कामापुरताच आरतीशी बोलत होता. आरती सकाळी उठल्यापासून सगळ्यांचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, परत संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि सचिनच सगळं करणं यातच गढून गेलेली होती... हे कमी की काय म्हणून आजकाल विशाल नको ते व्हिडिओ बघून रोज रात्री आरतीला कामापुरता जवळ घेऊ लागला. दिवसभर थकलेल्या आरतीला त्याचा हा स्पर्श नकोसा वाटत होता.... शरीर आणि मन दोन्ही साथ देत नसताना ती बळजबरीने त्याच्यासोबत रात्र घालवत होती... जवळ जवळ हीसुद्धा एक प्रकारे जबरदस्तीच होती पण नवरा आहे त्यामुळे या गोष्टीबद्दल कुणाला आणि कशी सांगणार होती ती.... तिला हे सगळं नकोसं झालं होतं.... घरात असलेल्या नवऱ्याने फक्त त्याचा मूड असेल तेव्हा एखाद्या वास्तूप्रमाणे तिचा वापर करावा हे तिला अजिबात आवडत नव्हतं..... ती मनातून पुरती कोलमडून गेली होती.... नवऱ्याने आपलं मन जपावं, आपल्याशी प्रेमाने बोलावं, आपल्याला समजून घ्यावं या अगदी माफक अपेक्षा होत्या तिच्या नवऱ्याकडून पण घडत मात्र उलटच होतं... माहेरी आईला काही सांगायला जावं तर आई कायम "बाईचा जन्म आहे... सांभाळून घे... होईल सर्व ठीक.. देवावर विश्वास ठेव...." असच सांगत राहायची.... आईशी बोलताना सुद्धा सगळं मोकळेपणाने नाही बोलता यायचं तिला.... बिचारी एकटी पडली होती... आरती सारख्याच अशा अनेक मुली असतील की ज्यांना त्याचा नवरा समजून घेत नसेल.... आपली बायको म्हणजे आपला मालकी हक्क असलेली वस्तू नसून भावना असलेली एक माणूस आहे हे त्यांना समजतच नाही... ते फक्त स्वतःचा विचार करतात आणि तिच्या मनाला दुखवत राहतात.... नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर आधारलेलं असतं पण विशाल सारखे पुरुष बायकोची किंमतच करत नाहीत... आणि मग आरती सारख्या अनेक मुली मनाविरुध्द असं जगत राहतात.... लॉकडाऊन मध्ये घरी रहावं लागलेल्या पुरुषांनी आपल्या बायकोला मदत करायचं सोडून तिला असा त्रास दिला.... मानसिक आणि शारीरिक तर कसं चालेल??? तिने कुठपर्यंत सहन करायचं???? आजही आपल्या समाजात असे काही पुरुष आहेत जे आपल्या बायकोला गुलाम समजतात... अशा पुरुषांना उद्देशून हा लेख आहे. सगळेच असे नसतात पण हो काही नक्की असतात... बायकांना अशाही समस्यांना सामोरं जावं लागतं आणि सगळ्यात दुःख म्हणजे यात तिच्या सासूनेही तिला त्रास देणं हे म्हणजे एका बाईनेच बाईला समजून न घेण्यासारखं आहे.. #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💗प्रेम #😍Love रिलेशन #💭माझे विचार