ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आहे. हा महाराष्ट्र महापुरुषांचा आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. महाराष्ट्र गांधींच्या अहिंसेला मानतो.
अशी वाक्य तुम्हाला सकाळ-दुपार- संध्याकाळ टीव्हीवर ऐकायला येतील.
ही सर्व वाक्य म्हणजे सर्वात मोठे थोतांड आहे. पुरोगामी- सेक्युलर- मानवतावादी- पर्यावरणवादी- अहिंसावादी- पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या भुरट्यांनी हे थोतांड सर्वात जास्त पसरवले आहे.
ह्या थोतांडाला व त्याच्या पाठीराख्यांना ह्या महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोणी फाट्यावर मारले असेल. ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी. ह्या थोतांडाच्या पाठीराख्यांनी आयुष्यभर बाळासाहेबांचा द्वेष- तिरस्कार केला. 2019 ला उद्धव ठाकरेंनी मविआ सरकार स्थापन करेपर्यंत ह्यांनी शिवसेनेचा द्वेष-तिरस्कार केला आहे.
2014 पासून देशाचे राजकारण मोदी केंद्रित झाल्यावर जो मोदीला साथ देईल. समर्थन करील तो ह्यांच्यासाठी वर्ज्य आहे. आणि जो मोदीला शिव्या घालील त्याला हे आपला बाप बनवायला तयार असतात.
म्हणूनच 2014 पासून 2019 पर्यंत शिवसेना भाजप युतीत वाद झाल्यावर उद्धव ठाकरे सरकार मध्ये असून पण भाजप वर टीका करत असतानाही ह्यातील एकानेही उद्धव ठाकरें बद्दल चार शब्द चांगले बोलले नव्हते.
पण, 2019 ला उद्धव ठाकरेंनी मविआ सरकार स्थापन केल्यावर ह्या सर्व थोतांड पसरवणाऱ्यांना अचानक शिवसेना- बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या बद्दल आदर वाटायला लागला. त्यांच्यासाठी हे लोक आपली बुद्धी खर्च करायला लागले. कारण, स्पष्ट होते की, उद्धव हे मोदींचे कडवे विरोधक झाले होते.
2014 पासून राज ठाकरे मोदींचे कडवे विरोधक झाले. 2019 ला तर त्यांनी स्वतःचा पक्ष वाऱ्यावर टाकून मोदींना विरोध म्हणून थेट कॉंग्रेस-राष्ट्रवादी साठी सभा घेत फिरत असताना ह्या थोतांडांना राज ही गोड वाटू लागले. पण जसे 2022 ला राज ह्यांनी पक्षध्वज बदलून भोंगे विरुद्ध भूमिका घेऊन हिंदुत्वाचा पुरस्कार करायला सुरुवात केल्यावर राज पुन्हा एकदा ह्यांच्या टीकेचे धनी झाले.
पण ह्यांनी जे थोतांड पसरवले आहे. त्यात सर्वाधिक ट्रॅप कोण झाले असेल ते महाराष्ट्र भाजप नेतृत्व.
2019 ला ह्याच थोतांड पायी देवेंद्र फडणवीसांनी सत्ता गमावली. आणि एकनाथ शिंदेंनी हातात सत्ता आणून दिल्यावर ही फडणवीसांचे डोळे उघडलेले नाहीत.
भाजप च्या कार्यकर्त्यांचा सर्वात मोठा दोष हा आहे. की, ते नेतृत्वाला जाब विचारत नाहीत. आणि त्याचा सर्वात मोठा गैरफायदा भाजप नेतृत्वाने घेतला आहे.
2019 ला मविआ काळात ज्या प्रकारे भाजप कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे जे हाल झाले त्यातील किती लोकांचा सूड फडणवीसांनी घेतला?
2019 च्या मविआ सत्ता काळात पोलिसांना हाताशी धरून जे सूड घेतले. तसे किती भाजप वाल्यांनी 2022 पासून घेतले?
त्याचे एकमेव कारण हे वरचे थोतांड.
पवार मुख्यमंत्री होण्यासाठी वसंतदादांचे आमदार फोडून सरकार पाडतात. तेव्हा हे थोतांडवादी काही बोलत नाहीत.
पवार 1991 ला शिवसेना फोडून भुजबळांसह आमदार फोडतात. त्यांना वरील थोतांड पाठीराखे कोणी काही म्हणत नाहीत.
2019 ला जनतेने सेना- भाजप युतीला स्पष्टपणे सत्ता स्थापनेचा आदेश दिलेला असतानाही पवार मविआ सरकार बनवतात. तेव्हा हे थोतांड वादी काही म्हणत नाहीत.
पण, 2022 ला शिंदे शिवसेना फोडून आमदार घेऊन भाजप सोबत आल्यावर ह्या थोतांडवाद्यांना महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आठवते.
2020 ला कोरोना काळात राज्यातील एक मंत्री हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करतो. तेव्हा हे थोतांड वादी आणखी यादी द्यायची भाषा करतात.
पण, त्याच व्यक्तीला हिंदुत्ववादी कार्यकर्त्याकडून काही झाल्यास पुन्हा एकदा हे थोतांड वादी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सांगतात.
भाजपने ह्या थोतांडाला बळी न पडता कार्यकर्त्यांच्या भावना जाणून भूमिका घ्यायला हवी....
- दुर्गेश कदम #😎आपला स्टेट्स #राजकारण #राजकारण