#💭माझे विचार #🙂सत्य वचन #😎आपला स्टेट्स #☀️गुड मॉर्निंग☀️ #RCM Business उपाख्य बापूराव चापेकरांनी फाशीच्या आदल्या दिवशी उपास केला व प्रार्थनेत शांतपणे दिवस व्यतीत केला. सकाळी निघताना त्यांनीसुद्धा हाती गीता घेतली. भजन म्हणत तख्ताजवळ आले. अधिपत्र वाचून दाखवल्यावर काही सांगणे नाकारले. 'जय शंकर' चा घोष करत ते तख्तावर चढले. तोंडावर काळी टोपी चढ़वताच पुन्हा 'जय शंकर' चा घोष केला. फास गळ्यात पड़ताच छाती भरून श्वास घेतला. खटका ओढताच सहा फूट गर्तेत त्यांचे शरीर लोम्बकळू लागले....! या बलिदानामुळे एक पर्व संपले..!!
८,१० आणि १२ मे १८९९...एक दिवसाआड़ दोन चापेकर व एक रानडे फासावर चढले. खरेतर रँडशाहीतील अत्याचारांचा त्यांना व्यक्तिगत त्रास झाला नव्हता पण देशबंधुना होणाऱ्या त्रासामुळे ते खवळून उठले.
या साहसात घरातील तीन कर्ते पुरुष संपले. मागे केवळ तीन विधवा,लहान मुले आणि वृद्ध वडील उरले.
क्रांतीवेदीवरील हे बलिदान दिव्य होते. पुढे अनेक तरुणांना यापासून प्रेरणा मिळाली.
तीन सख्खे भाऊ देशकार्यार्थ फासावर जाण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण होय.. त्यांना शत शत नमन..!!
- ©डॉ. सच्चिदानंद शेवडे