फॉलो करा
Trainer - Vijay Balu Raskar
@4254285984
73
पोस्ट
56
फॉलोअर्स
Trainer - Vijay Balu Raskar
2.6K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
आजच्या समाजातील परिस्थिती पाहता विवाहापूर्वी दोन्ही कुटुंबांनी आवश्यक पडताळणी करणे महत्त्वाचे आहे. एबॉर्शन किंवा गंबीर आजार आहे का? आरोग्यविषयक माहिती, गंभीर आजारांचा इतिहास, आर्थिक स्थिती, व्यसनांची सवय (दारू, तंबाखू इ.), तसेच कुटुंबातील वातावरण आणि मूल्ये याबाबत दोन्ही बाजूंनी पारदर्शकता असणे गरजेचे आहे. विवाह हा विश्वास, प्रामाणिकपणा आणि परस्पर समजुतीवर आधारित असावा. योग्य माहिती आणि पडताळणीमुळे भविष्यातील अनेक समस्या टाळता येऊ शकतात. सध्या इंडिपेंडेंट विचाराचा काळ सुरू आहे. वापरा सोडा आणि दुसरा पकडा. सावधान रहा आणि शांत रहा. #ट्रेनर - विजय बाळू रासकर #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
Trainer - Vijay Balu Raskar
525 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
लग्नापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी १. दोघांनीही आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबी प्रामाणिकपणे एकमेकांना सांगाव्यात. उदाहरणार्थ: एबॉर्शन, आजार वैगरे २. भूतकाळातील नातेसंबंध आणि भविष्यातील अपेक्षांबद्दल स्पष्ट चर्चा करावी. उदाहरणार्थ: अफेर ३. मित्रपरिवार, त्यांचा प्रभाव आणि सामाजिक वर्तणूक समजून घ्यावी, कारण त्याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. इंडिपेंडेंट किंवा वेगळी राहणारे जोडपे मित्र परिवार, व्यसनी वैगरे ४. मद्यपान, तंबाखू, आर्थिक सवयी आणि जीवनशैली याबद्दल खुलेपणाने चर्चा करावी. घरातील वातावरण पहा. ५. दोन्ही कुटुंबांचे संस्कार, शिक्षण, सामाजिक वर्तन आणि मूल्ये जाणून घ्यावीत. फक्त जोडीदाराच्या शिक्षणावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. ६. कुटुंबातील सदस्यांचा स्वभाव, विचारसरणी आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घ्यावा. ७. करिअर, आर्थिक नियोजन, मुलांबाबतची अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांवर चर्चा करावी. ८. फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका; व्यक्तीचे वर्तन आणि कृती काळानुसार निरीक्षण करा. संदेश: “लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नाते नसून दोन कुटुंबे, संस्कार, मूल्ये, सवयी आणि जबाबदाऱ्या यांचे मिलन असते. लग्नापूर्वी योग्य समज आणि पारदर्शकता असेल तर वैवाहिक जीवन अधिक सुखी, स्थिर आणि विश्वासपूर्ण होऊ शकते.” — Trainer Vijay Balu Raskar #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
Trainer - Vijay Balu Raskar
628 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
काही लोकांकडे मऊ आणि आरामदायी बेड असतो, पण त्यांना शांत झोप लागत नाही. तर काही लोकांकडे बेडही नसतो, तरी ते समाधानाने झोपतात. काही लोकांकडे भरपूर अन्न असते, पण भूक नसते. तर काही जण साधे अन्नही आनंदाने खातात. काही लोकांना चांगला जीवनसाथी मिळतो, पण त्याची किंमत कळत नाही. तर काही जण अशा साथीदाराची अपेक्षा करत राहतात. काही लोकांना प्रेमळ आई-वडील, कुटुंब आणि नातेवाईक मिळतात, पण त्यांचा आदर केला जात नाही. तर काही लोकांना अशा नात्यांची उणीव आयुष्यभर जाणवत राहते. जीवन आपल्याला शिकवते की आनंद हा आपण काय मिळवले आहे यावर नाही, तर जे मिळाले आहे त्याची किंमत आणि कृतज्ञता ठेवण्यावर अवलंबून असतो. जे आहे त्यात समाधान आणि कृतज्ञता ठेवली, तर साधे आयुष्यही सुंदर बनते. – Trainer Vijay Balu Raskar #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
Trainer - Vijay Balu Raskar
630 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
Trainer - Vijay Balu Raskar
548 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
आयुष्यभर इंडिपेंडेंट स्त्री वर विश्वास अभिमान बाळगत समाजात मुलगा म्हणून हैप्पी वुमन पासून ते महिलांना जागा मिळवून देण्यासाठी वागलो. महिलांचा सन्मान करत नेहमी मदतीला तसेच आदराने पहिले. लग्न करताना देखील शिक्षण पाहून लग्न केले. ना हुंडा घेतला ना काही लालच ठेवून सन्मानासाठी ती म्हणेल तसे वागलो पण आयुष्यात लग्न झाल्यावर एक बाळ लगेच झाले आणि नंतर पुरुष म्हणून कमी पगार म्हणून मूर्खात काढले गेले आणि बायको घर सोडून गेली. आता माझ्यावर तसेच घरातल्यांवर अत्याचार केल, मानसिक त्रास दिला, बलात्कार केला, शक घेतो वैगरे आरोप लावून अलुन्मोनी नावाने पैसे मिळावे म्हणून कोर्टात केस टाकत आहे. त्यामुळे नोकरी सुद्धा गेली आणि मानसिक ताण वाढला. असा प्रामाणिक पुरुष जगेल कसा? मग तो आत्महत्या नाही करणार मग जगणार कसा? कायदे फक्त महिलांच्याच बाजूने का? सत्याच्या बाजूने असावेत. सरकारने तसेच समाजाने पुढे आलेच पाहिजे नाहीतर कालांतराने लग्न करायला नको बोलून परत इतिहासामध्ये समाज वागत होता तसेच होवू लागेल? बलात्कार वाढतील. वापरा सोडा मानसिकता आणखीन वाढेल वैगरे. परिवार वाचवा समाज वाचवा. संस्कृती संस्कार सभ्यता वाचवा. #ट्रेनर - विजय बाळू रासकर #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫