आजचा दिवस जगा...
एक संतवचन आहे की, कोण काळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, जैसी पक्षी उडून जाती, दाहीदिशा....
मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि "अजून मिळवायचं आहे" या विचारात आजचा क्षण निसटून जातो. आजूबाजूला घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते.
अशा वेळी लक्षात येतं की, पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण.
म्हणूनच नात्यांकडे दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी बोलूया,
मित्र मैत्रिणीशी मन मोकळं बोलू. मनात राग, मत्सर, अहंकार साठवू न ठेवता एकमेकाला माफ करायला शिकू या, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणिक आहेत, सगळी मोहमाया आहे. पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे. उद्या काय होईल माहित नाही, पण आज आपल्या हातात आहे. म्हणून आजचा दिवस जगूया, मनापासून जगूया, प्रामाणिकपणे सात्विक भूमिकेतून जगूया, इतरांना जितका आनंद आपल्या मुळे देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करूया.
आज दिनांक 28 जाने. 2025 रोजी अजित दादा पवार यांनी अकाली निरोप घेतला, त्यांना आदरांजली !!! आणि जे आज आपल्या सोबत आहेत त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा....
भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा !!!