फॉलो करा
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
83,561
पोस्ट
31,617
फॉलोअर्स
विजय जयसिंग पाटील
126 जणांनी पाहिले
_*आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊ नका ! कारण... तसं केल्याने त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच महत्व उरत नाही !*_ _*योग्य व्यक्ती बरोबर तडजोड, आणि चुकीच्या व्यक्ती बरोबर वाद, जो टाळतो तोच समाधानी जीवन व्यतीत करू शकतो.*_ _*आत्मविश्वासाचा अभाव... हेच अपयशाचे खरे कारण !*_ _*कानावर आलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा सगळ्यांना चांगले समजणं सोडून द्या कारण लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात.*_ _*माणसानं कसं नसावं, हे ही माणसंच दाखवून देतात कर्तव्य पुर्ण करणारालाच हक्क गाजवण्याचा अधिकार असतो.*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞* •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☕good morning Friends🌞
विजय जयसिंग पाटील
134 जणांनी पाहिले
🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹 🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻 *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* *बुधवार दिनांक २८.०१.२०२६* *🎶सुमन गीताची🎶* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️ *🩹पद्मभूषण🩹* *💐सुमनताईंचा वाढदिवस💐* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️ 🌸🥀🔆🌺🎶🌺🔆🥀🌸 *जगात एकाच वेळी सात जणांचे चेहरे एकसारखे असू शकतात असा (गैर) समज दृढ आहे. अनेकदा विलक्षण साम्य दिसून येत असले तरीही विज्ञान सांगते की प्रत्येकाची शारीरिक रचना, नाक, डोळे, ओठ, कानाचे आकार, चेहऱ्याचा पोत, त्वचेचा रंग आणि हाडांची रचना हे सर्व वेगवेगळं असतं.* *हे वैज्ञानिक सत्य मानलं तरीही दोन गायिकांच्या आवाजात एवढे तंतोतंत साम्य याला काय म्हणावे.. की दैवी कृपा.. याचे साक्षीदार आहेत करोडो देशवासी. या दोन जगविख्यात गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर.* *'जिथे सागरा धरणी मिळते..", "नाविका रे..", "केतकीच्या बनी..", "अरे संसार संसार.." अशी अनेक गाणी, अगदी हिन्दीतील पण सुमनताईनी अशी गायलीत की दर्दी श्रोतेही ही गाणी लतादीदींची म्हणून फसतात.* *सुमन.. अर्थातच चांगले मन. असे नावाप्रमाणेच चांगले मन लाभलेल्या जेष्ठ गायिका पद्मभूषण सुमन हेमाडी.. सुमन कल्याणपुर यांचा आज जन्मदिवस (१९३७), जन्म ढाका. त्यांची अनेक गाणी ही माहेरच्या 'हेमाडी' नावानेही प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडिल हेमाडी हे बँकेत मोठे अधिकारी होते.* *या पाच बहिणी, एक भाऊ असे हे हेमाडी कुटुंब. त्यांनी शिक्षणासाठी मुंबई गाठले. खरं म्हणजे सुमन यांचा कल होता तो चित्रकला आणि संगीताकडे. त्यांनी जे. जे. मध्येही शिक्षण घेतले. पण वडिलांच्या मित्राने गळ्यातील गोडवा ओळखून त्यांना गाणे शिकण्याचा सल्ला दिला.* *आणि १९५३ मधील 'शुक्राची चांदणी' च्या गाण्याने या चांदणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांना मग हिंदीतही 'मंगू' चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. पूढे नौशाद यांनी 'दरवाजा' उघडला. मंगेशकर भगिनींचे संगीत जगतात राज्य असतांनाच्या काळात त्यांनी स्वतःचे असे वेगळे अस्तित्व सिद्ध केले. त्यांनी रफींसोबत चक्क १४० युगलगीते गायली. तत्कालीन हिंदीतील सर्वच नामवंतासोबत.. अगदी मुकेश सह गाणी गायलीत.* *आज जवळपास ७५० पेक्षा जास्त चित्रपट तसेच मराठी.. हिंदी.. असामी, गुजराथी, कन्नड.. मैथिली.. भोजपुरी.. राजस्थानी इ. भाषांत इतरही गाणी त्यांनी गायलीत. रसिकांना तृप्त केलेय.* *कृष्णाच्या भक्तीत भक्त एवढे लीन होतात की त्यांचे संपूर्ण जीवनच कृष्णमय होवून जाते. 'अत्र तत्र सर्वत्र' कृष्णच दिसतो. हे जीवनच कृष्णमय होवून जाते. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको असते. हेच भाव व्यक्त करणारे कृष्णलळेचे हे सुरेल गीत.* *जेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. निरामय आरोग्य कामना.* 🌹⚜️🌸🥀🎶🥀🌸⚜️🌹 *कृष्ण गाथा एक गाणे* *जाणते ही वैखरी* *एक तारी सूर जाणी* *श्री हरी जय श्री हरी ॥धृ॥* *तू सखा, तू पाठिराखा,* *तूच माझा ईश्वर* *राहिलासी व्यापूनीया* *तूच माझे अंतर* *आळवीते नाम ज्याला* *अमृताची माधुरी ॥१॥* *पाहते मी सर्व ते ते* *कृष्ण रूपी भासते* *आणि स्वप्नी माधवाच्या* *संगरी मी नाचते* *ध्यान रंगी रंगताना* *ऐकते मी बासरी ॥२॥* *तारिलेसी तू कन्हैया* *दीनवाणे, बापुडे* *हीन मीरा त्याहूनीही,* *भाव भोळे भाबडे* *दे सहारा, दे निवारा* *या भवाच्या संगरी ॥३॥* 🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 *गीत : यशोदकुमार गवळणकर* ✍ *संगीत : दशरथ पुजारी* *स्वर : सुमन कल्याणपूर* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *!!सर्वांना राम कृष्ण हरी!!* *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *श्री स्वामी समर्थ* *समाजातील प्रामाणिक, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन सावध व दूर रहा, कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.* 🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻 #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
विजय जयसिंग पाटील
93 जणांनी पाहिले
*‼️हे आयुष्य आहे; इथं झालेल्या चूका विसरून, परत नव्याने कामाला लागायचे असते ! कारण... भूतकाळ हा सतत डोक्यात ठेवला तर, आपला वर्तमानकाळ सुद्धा बिघडतो.*‼️🙏🌹❇️🌺💐🌻 *देवापेक्षा कर्माची भीती आपण अधिक बाळगावी, कारण देव एक वेळ आपल्याला माफ करेल पण कर्म कधीच माफ करत नसतं.* *वेळ आली तर तडजोड परिस्थितीशी करावी तत्वाशी नाही.* *मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलेच नाही, कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत असते, मग ते विचार असो, द्वेष असो की प्रेम चांगले आहे ते पेराल याची निश्चित काळजी घ्याल.* *स्वतःच्या नजरेत परिपूर्ण असलं की जगाने आपल्याकडे कोणत्याही नजरेने बघू द्या काहीही फरक पडत नाही. आपण स्वतःकडे कशा नजरेने पाहतो, यावरच आपल्या आयुष्याची दिशा ठरते. जेव्हा माणूस स्वतःच्या नजरेत परिपूर्ण असतो, तेव्हा जगाने त्याच्याकडे कोणत्याही नजरेने पाहिलं तरी त्याला फरक पडत नाही. कारण त्याची मोजणी बाहेरून मिळणाऱ्या कौतुकाने किंवा टीकेने होत नसते, तर आतल्या समाधानाने होत असते.* *आपला रिकामा वेळ स्वतःला घडविण्यासाठी खर्च करा म्हणजे इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही.* *जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलतात.* *देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात.* *३६ आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.* *त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात.* *आता ६३ आकडा पहा. या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं. एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी, जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो.* *६३ च्या या आकड्या प्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.* *वयाने कोणी कितीही लहान-मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा.* *अनोळखी, अनोखी म्हणत असताना, अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजे मैत्री,* *!!सर्वांना राम कृष्ण हरी!!* *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *श्री स्वामी समर्थ* *समाजातील प्रामाणिक, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन सावध व दूर रहा, कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.* ‼️🌹🙏‼️🌹🙏‼️🌹🙏 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
विजय जयसिंग पाटील
1 जणाने पाहिले
*प्रवीण दवणे यांचा लेख* आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली. अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.' त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे. तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...' संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं. "हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.' "अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?' तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.' श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!' चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं! ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...' फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली! श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...' दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!' दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!' आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत! *घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी!* आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. *अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!* कुणी म्हणेल; सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? *आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे.* या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं. जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. *एखाद्‌ वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील!* त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल. आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट! *आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही.* पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; *नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.* आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत. श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं! दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता! लेखक - श्री प्रवीण दवणे. #सुप्रभात #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
See other profiles for amazing content