Follow
Makrand Mote
@macksir
2,200
Posts
2,136
Followers
Makrand Mote
832 views
7 days ago
२० जून ज्याला प्रपंच नाही करता आला ।त्याचा परमार्थ ढिला पडला ॥ मातापिता यांचे न पाहावे दोष । हे सर्व सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥ माता-पितरांचे समाधान । हेच सुपुत्राचे खरे लक्षण ॥ आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते । आपले दुःखीपणाने ते दुःखी होते । आपली आनंदी वृत्ति आईला आनंदी बनविते । म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात । काहूर न माजू द्यावे चित्तात ॥ शब्दाने करावे त्यांचे समाधान । उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण ॥ नोकरी चाकरी उद्योग धंदा । पोटाकरिता करणे आहे सदा ॥ आपण पैका मिळवावा पुष्कळ । पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये । तसे शब्द बोलू नये ॥ आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥ निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥ अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥ ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥ प्रपंचाची काळजी । हीच परमार्थाला वाळवी ॥ परमात्म्याचा आधार ज्याला । ठाव नसे काळजीला ॥ शेजार असता रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ? ॥ मी कोण हे जाणले ज्याने चित्ती । त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ति ॥ राम त्राता हा भाव ठेवावा चित्ति । निर्भयता होईल याच रीती ॥ ज्याने देह केला रामाला अर्पण । त्याला नाही काळजीचे कारण ॥ कर्ता राम हे आणता चित्ति । पापपुण्याची नाही त्याला भीति ॥ ज्याचा परमात्मा झाला सखा । त्याला नाही कोठे धोका ॥ 'कर्ता मी' म्हणे आपण । हे सर्व दुःख काळजीचे कारण ॥ झाले ते होऊन गेले । होणार ते चुकेना कोणाला भले ॥ म्हणून नाही करू काळजीला । राम साक्षी आहे त्याला ॥ जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥ राम त्यास सांभाळता । काळजीस कारण न उरले आता ॥ मुलाबाळांची न करावी काळजी । रामराय करावा राजी ॥ आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती । काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीति ॥ शक्यतो करावे नामस्मरण । आपली काळजी न करावी आपण ॥ रामाचा म्हणून प्रपंच केला । काळजीचे कारण उरत नाही आपल्याला ॥ भगवंत असता पाठीराखा । काळजीची काय कथा ? ॥ म्हणून, मुखाने नाम, चित्तांत राम । त्याचे मनाला होईल आराम ॥ सतत ठेवावे एक चित्तीं । । न सोडावा रघुपति ॥ सर्व सारांचे सार । एक भजावा रघुवीर ॥ नेमात नेम उत्तम जाण । रामावाचून न राहावे आपण ॥ १७२. सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम ॥ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #✍️आयुष्य बदलणारं विचार🏆 #My Motivational Thoughts ❤️ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status
Makrand Mote
713 views
7 days ago
🌧️ **दाते पंचांगातील पावसाचे अंदाज: सध्या पाऊस का नाही आणि वरुणराजा कधी बरसणार?** 🌾 सध्या पाऊस लांबल्यामुळे शेतकरी बांधव आणि नागरिक चिंतेत आहेत, पण घाबरून जाण्याचे कारण नाही! **दाते पंचांग २०२६** नुसार सध्या सुरू असलेला पावसातला खंड हा निसर्गाच्या चक्रानुसारच आहे. 👇 **सध्या पाऊस का नाही?** पंचांगानुसार सध्या 'मृग नक्षत्र' (७ ते २१ जून) सुरू आहे, ज्याचा अंदाज पंचांगात आधीच 'पावसात खंड' असा दिला होता. 📅 **आता पाऊस कधी स्थिरावणार?** 📍 **१. पावसाची खऱ्या अर्थाने सुरुवात (आर्द्र नक्षत्र):** * **दिनांक:** २२ जून २०२६ (दुपारी १२:२६ वा.) * **वाहन:** गाढव * **अंदाज:** २२ जूनपासून पावसाचे आगमन होईल. २२, २३, २५, २६ आणि २९ जून रोजी चांगल्या पावसाचे योग आहेत. 📍 **२. पाऊस पूर्णपणे स्थिरावणे (पुनर्वसू नक्षत्र):** * **दिनांक:** ६ जुलै २०२६ (दुपारी १२:०३ वा.) * **वाहन:** घोडा * **अंदाज:** ६ जुलैपासून पाऊस वेगाने सर्वदूर पसरेल. १३ ते १९ जुलै दरम्यान जोरदार पाऊस होऊन धरणे भरण्यास मदत होईल. 📍 **३. मुसळधार पाऊस (पुष्य नक्षत्र):** * **दिनांक:** २० जुलै २०२६ (सकाळी ११:२८ वा.) * **वाहन:** उंदीर * **अंदाज:** जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचे संकेत आहेत. 💡 **शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला:** घाईगडबडीत पेरण्या करू नका. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यावरच पेरणी करा. निसर्गाचे चक्र पंचांगानुसार फिरत असून, २२ जूनपासून वरुणराजाची कृपा नक्की सुरू होईल! 👍☔ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #✍️आयुष्य बदलणारं विचार🏆 #My Motivational Thoughts ❤️ #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️