कुठे गेला तो सुनिल शेट्टी ज्याने टमाट्याच भाव वाढले म्हणून टमाट खाण सोडून दिले होते...भिकमाग्यांनो शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले की बोंबलता..
कुठे गेल्या त्या रील बनवणाऱ्या बायका कांद्याचे भाव वाढले शेजारीन कांदा मागायला आली तर कपाटात कांदे लपवतानाचा व्हिडिओ कीती व्हायरल झाला..
आता लाजा वाटत नाही का या भीकमाग्यांना..
माझ्या शेतकऱ्यांच्या कांदा पन्नास पैसे किलोने विकला जातोय..
त्या पन्नास पैशात लहान लेकराला चॉकलेट येत का..
कीती स्वप्न पाहिले असतील माझ्या शेतकरी बापाने..
आता का व्हिडिओ बनवत नाहीत आता का तोंड शीवले..
शेतकऱ्याच्या कष्टाच फूकट खायला गोड लागते..
लाख रूपये पगार घेणारा असला तरी शेतकरी मेथीची गड्डी दहाला एक बोलला तर दहाच्या दोन मागतो..
तो सुद्धा विसरतो की आपला बाप शेतकरी च आहे त्यानेच आपल्या ला शीकून सर्वीस ला लावले..
शेतकऱ्याच्या व्यथा कोणीच जाणत नाही तो आपल्या पोराला सांगतो तिकडे शाळा झाड दवाखाना झाड शिपाई हो परंतु शेती करू नको..
हा शेतातला माल जास्त दिवस ठेवून जमत नाही सडतो खराब होतो म्हणून नाविलाजाने विकावा लागतो...
शेतकऱ्यांनो कांदा ठिक आहे सडतो म्हणून तुम्ही बेभाव विकता..
परंतु तुम्ही गहू विकण्यासाठी कीती घाई केली..
तुम्ही जो गहू बाविसशे ने विकला
तोच गहू आता व्यापारी छत्तीशेने
विकत आहे..
शेतकऱ्यांनो हे कांदा पिक खुप जीवघेणे आहे..
तशात हे मोदी सरकारची धोरणे काही चुकीचे आहेत.
आपल्या देशात कांदा असताना ते परदेशातला कांदा आयात करून
आपला माल बेभाव करून टाकत आहे..
बाजारात ज्या मालाला मागणी असते तोच माल पिकवा..
त्या कांद्याच्या नादी लागू नका..
कांदा पिक अस आहे शीकार तर शीकार नाही तर भिकार...
शेतकरी सध्या खूप दयनीय अवस्थेत आहे...
अत्यंत कष्टाने जीवाच रान करून माल पिकवतो आणि व्यापारी मातीमोल भावाने मागतो..
सध्या तरी बळीराजा ला वाली उरला नाही..
कस होईल या कृषीप्रधान देशात
बळीराजा च... #🎭Whatsapp status