फॉलो करा
Mrs.Manjusha ....
@manjusha148
7,179
पोस्ट
27,601
फॉलोअर्स
Mrs.Manjusha ....
533 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
MIT या अमेरिकन शिक्षण संस्थेच्या मिडिया लॅबने कृत्रिम बुध्दीमतेचा म्हणजे 'AI चा सहज आणि सतत वापर करण्याचा मेंदूवर होणारा परिणाम' या विषयावर काही अभ्यास केला.यासाठी त्यांनी कन्टेन्ट लिहिणार्‍या तीन वेगवेगळ्या टीम बनवल्या.त्यानंतर AI मुळे त्यांच्या कामात झालेल्या बदलांचा अभ्यास केल्यावर जे फरक लक्षात आले ते असे आहेत. १.स्मरणशक्तीचा र्‍हास: ChatGPT वापरणार्‍या ८३% लोकांना काही मिनिटांपूर्वी जे लिहिलं त्यातलं एकही वाक्य आठवत नव्हतं. ज्यांनी AI वापर केला नव्हता त्यांची स्मरणशक्ती पूर्ववत होती. २. एखाद्या विषयावर आपण लिहायला सुरुवात केली की मेंदूची विविध वेगवेगळी केंद्र स्वतःच एकमेकांना जोडतात आणि कन्टेन्ट तयार करतात.थोडक्यात संपूर्ण मेंदू सजग राहतो.सतत ChatGPT वापरणार्‍यांना ४७ % लोकांमध्ये ही मेंदूची कार्यक्षमता कमी होत गेली. ChatGPT वापरणं थांबवल्यावरही हा परिणाम आहे तसाच राहिला. ३. शिकण्याची इच्छा कमी होत जाणे : एखादे काम हातात घेतल्यावर मेंदू त्यावर विचार करतो,अनेक पर्याय वापरतो, नव्या कल्पना पुढे आणतो. अर्थातच कामाला लागणारा वेळ वाढतो.ChatGPT वापरणार्‍या ३३% लोकांची कामं वेगाने झाली पण त्यांच्या मेंदूने शिकण्याचे प्रयत्न थांबवले **** आता काही सकारात्मक प्रयत्न बघा : AI चा वापर बंद करणे हा उपाय नाही.आवश्यक असेल तेव्हाच ChatGPT वापर केला तर स्मरणशक्ती आहे तशीच कायम राहते .मेंदू आधीसारखाच कार्यरत राहतो आणि AI जोड मिळाल्याने आणखी जोरात कामाला लागतो. **** आता नक्की काय करायचे ते बघा. १ कामाची सुरुवात AI वापरून करू नका.तुमच्या मेंदूला नेहेमीप्रमाणेच काम करू द्या. ते झाले की संपादन करणे - अधिक माहितीचा योग्य वापर करून विस्तार करणे - अनावश्यक भाग गाळून टाकणे यासाठी AI चा वापर करा. AI चा वापर मदतनीस म्हणून करा.आपल्याऐवजी काम करणारी व्यक्ती म्हणून AIचा वापर करू नका. २ आतापर्यंत अशा AI सारख्या साधनांचा वापर कोणत्याही मानवी मेंदूने केला नव्हता.त्यामुळे जुनी कौशल्ये विसरण्याचा धोका वाढतो. उदाहरणार्थ: आपण की बोर्डचा वापर करून टायपाला सुरुवात केली आणि हातानी लिहिण्याची क्षमता कमी होत गेली. तुमचेच काही वर्षांपूर्वीचे हस्ताक्षर आणि आताचे हस्ताक्षर या दोन्हींची तुलना करून बघा.फरक तुमच्या लक्षात येईल.फोटोचा वापर वाढल्यावर निरिक्षण करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती कमी झाली.आधी एखादा पत्ता लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणजे आपला मेंदू वेगवेगळ्या खूणा आपोआप लक्षात ठेवायचा.GPS वापरायची सवय झाल्यावर खूणांसकट रस्ता लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली. सांगायचा मुद्दा असा आहे की कामासाठी फक्त AI चाच वापर केला तर मेंदू त्याच्याच आधीन जाण्याची शक्यता आहे. ३ थोडक्यात कामाची सुरुवात AI ने करू नका- मेंदूला त्याचे काम करू द्या. AI चा उपयोग जाणिवपूर्वकच करा.केलेल्या कामावर शेवटचा हात फिरवण्याची जबाबदारी AI ला द्या. थोडक्यात आवश्यकता नसेल तेव्हा केवळ वेळ वाचावा म्हणून AI चा वापर केला तर नैसर्गिकरित्या काम करण्याची क्षमता घटत जाण्याची शक्यता आहे. **** आता बोभाटाचे मुख्य काम कन्टेन्ट तयार करण्याचेच आहे म्हणून आम्हीही काही उपक्रम सुरु केले आहेत ते असे : १ मराठी - इंग्रजी- हिंदी या भाषा वगळता इतर भाषेतला काही मजकूर असेल तर फक्त भाषांतरासाठी AI चा वापर करतो. २ बोभाटाच्या संग्रहात असलेल्या ३०००+ पुस्तकांतून संदर्भ शोधून काढण्यावर भर देतो. ३ स्मरणशक्तीचा र्‍हास होऊ नये म्हणून रोज एखादी कविता -गाणे पाठ करून बघतो. ४ मिटिंग सुरु असताना पेन- कागद वापरून नोट्स लिहून घेतो. ५ दिवसभरात कधीही एखादी रँडम गोष्ट- घटना -शब्द आठवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही असे काही प्रयोग करता का ? आम्हाला नक्की सांगा #🎭Whatsapp status
Mrs.Manjusha ....
409 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
आज खुप कंटाळा आला.. प्रोजेक्ट पण नुकताच संपला होता.. म्हणून मग आज लवकर घरी निघालो.. तेवढंच घरच्यांना सरप्राइज.. घरी जाताना पिल्लांसाठी भेळ आणी spdp घेउन गेलो.. बायको यायची होती.. जरा निवांत बसुन टीवी बघितला तेवढ्यात मुलं आली.. " काय वडिल, आज लवकर?" माझ्या 12 वर्षांच्या अनय ने विचारलं.. खुषीत असला की तो अशीच हाक मारायचा.. धाकटा 6 वर्षाचा निर्मय मात्र फुरंगटलेला वाटला.. गोबरे गाल लाल झाले होते..रडल्याच्या खुणा होत्या डोळ्यात.. मी काही विचारणार एवढ्यात अनयने " डोंट वरि , मी बघतो " अशा अर्थाची खुण केली आणी दोघं त्यांच्या रुम मधे गेले त्या दोघांसाठी डिश मधे भेळ घेउन गेलो तर धाकट्याच्या मुसमुसण्याचा आवाज आला.. मी आत जाणार तेवढ्यात मला त्यांचं बोलणं कानावर पडलं.. अनय : काय झाल निरु? का रडतो आहेस? काय झाल school मधे? निर्मय: ( खुप चिडून) एकदा सांगितलं ना तुला मी, माझ्या मित्रांनी चिडवलं मला.. अनय : अरे पण का चिडवलं? निर्मय:मी नाही सांगणार तुला.. अनय: अरे तु सांगितल नाहिस तर मी ओरडणार कसं त्या मुलांना उद्या? निर्मय: त्यांना कशाला ओरडायचं, ते बरोबर बोलतात.. अनय: अरे पण काय बोलतात ते तर सांग निर्मय: आधी तु प्रॉमिस कर, तु आई बाबाना सांगणार नाहिस? ( इथे माझी उत्सुकता वाढली आणी मी अधिकच seriously ऐकू लागलो) अनय : प्रॉमिस.. निर्मय: ते म्हणतात, तुझी मम्मा तुझ्यावर प्यार नाही करत.. त्यांच्या मम्मा सारखं ती घ्यायला येत नाही, Teacher ला येउन विचारत पण नाही की निर्मय कसा आहे studies मधे .. सगळ्यांच्या मम्मा येतात.. अनय: हात्तिच्या एवढच ना, आता मला सांग , तुला कोण व्ह्यायचय मोठा झाल्यावर? निर्मय: मला..उम्म्म्म्ं...Pilot.. अनय: ओके, मग सांग तु airoplane चालवायला शिकलास आणी मग तुला घरी च रहायला सांगितल तर तुला चालेल का? (छोटा फुल्ल confused..) निर्मय: अजिबात नाही.. अनय: मग आपली आई एवढी शिकल्ये छान, तीच स्वतःच क्लिनिक आहे.. मग तिला तुझ्यापाशी सारखं घरी राहू देत का? (निर्मय आता विचार करु लागला..) अनय: आणी आपली आई कशाला सारखं टीचर ला जाऊन विचारेल,तो studies मधे कसा आहे, तिच तर आपला अभ्यास घेते ना? तुझ्या friends सारखी tution थोडीच आहे आपल्याला.. (निर्मयला आता हळूहळू पटायला लागलं) अनय: आणी ती आपल्याला प्रोजेक्ट मधे किती हैल्प करते, केवढे printouts काढून आणते क्लिनिक मधून, म्हणून तर तुझा प्रोजेक्ट नेहमी छान होतो ना? निर्मय: हो दादू.. मग हे सगळं मी माझ्या friends ना सान्गू का? अनय: बिनधास्त... मला बघुन आता निर्मय ने साद घातली " काय वडिल, भेळ आणलीत वाट्त?" माझे डोळे मात्र , नकळत शहाण्या समजूदार आणी खरोखरीच मोठ्या झालेल्या माझ्या लेकराला नजरेनेच धन्यवाद देण्यात गुंतले होते सायली साठे ™️©️ #🎭Whatsapp status
Mrs.Manjusha ....
1.2K जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
रात्री स्वयंपाकघरात येऊन सासूबाईंनी सुनेला विचारलं, “अग ऐक ना, मी राहुलला जिलेबीं आणायला सांगितलं होतं… आणली का त्यानं?” सुन म्हणाली, “नाही हो आईसाहेब… ते विसरले बहुतेक.” सासूबाईंचा चेहरा उतरला… कालपासून दिवसभर जिलेबीची तल्लफ लागली होती. मुलाला फोन केला होता… पण तो विसरूनच गेला. सुन मग खोलीत जाऊन नवऱ्याला म्हणाली, “तुमच्या आईनं तुम्हाला जिलेबीं आणायला सांगितलं होतं… मग का नाही आणली?” राहुल म्हणाला, “अगं, खरंच विसरलो यार… आईला सांग ना, उद्या टुरला जातोय, परत आलो की घेऊन येतो.” बायको म्हणाली, “तुम्हीच बोला ना… आईसाहेब रागात आहेत, जेवणसुद्धा नाही घेतलं.” राहुल आईच्या खोलीत गेला… पाहतो तर आई झोपलेली… त्याने हलकेच ‘सॉरी’ म्हटलं, जेवून घे म्हणून खूप विनंती केली… पण आईनं एक शब्दही बोलला नाही. सकाळी चार वाजता राहुल टूरसाठी उठला, तर स्वयंपाकघरातून जेवणाचा सुगंध यायला लागला… आत जाऊन पाहतो तर आई त्याच्यासाठी नाष्टा बनवत होती! त्याला पाहताच म्हणाली, “नाष्टा करून जा हो… आणि बाहेरचं काही खाऊ नकोस. टिफिन बनवलंय, घेऊन जा आठवणीने.” राहुल बाथरूममध्ये जाऊन रडला… आईनं पहिल्यांदाच त्याला काही मागितलं होतं… आणि तो विसरला. आई मात्र कधीच विसरत नाही… मुलगा बाहेर जायचा म्हटलं की अर्ध्या रात्री उठूनही त्याच्यासाठी जेवण करते. त्याने मनोमन ठरवलं— आईला पुन्हा कधीही राग येऊ देणार नाही. मोरल :- ती आई आहे… आई कधीच विसरत नाही ❤️ तिच्या मुलांच्या आनंदासाठी रात्र-दिवस एक करते. आईचा नेहमी मान ठेवा, काळजी घ्या. आईवर प्रेम असेल तर शेअर करा… लव्ह यू आई ❤️🙏 #आई
Mrs.Manjusha ....
669 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
#श्री स्वामी समर्थ 🙏 दि 27/11/25 गुरुवारचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन 🙏🏻
See other profiles for amazing content