#✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून वाचाल तर वाचाल
समस्त साळी बांधव
विनम्र अभिवादन !
ही पोस्ट जरूर वाचावी.
✍️पुण्यातल्या 'कल्याणी नगर' या उच्चभ्रू भागात *'सखाराम'* नावाची व्यक्ती महानगरपालिकेची कचरा गाडी (Garbage Truck) चालवायची. सखारामचं वय ५० च्या आसपास होतं. अंगावर निळा गणवेश, हातात ग्लोव्हज आणि चेहऱ्यावर मास्क.
सखारामचं एक वैशिष्ट्य होतं. जेव्हा तो सोसायट्यांतून कचरा गोळा करायचा, तेव्हा तो ओला आणि सुका कचरा तर वेगळा करायचाच, पण जर त्याला कचऱ्यात एखादं 'जुने पुस्तक' किंवा 'अर्धवट लिहिलेली वही' सापडली, तर तो ती बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवायचा.
एका मोठ्या बंगल्यासमोर गाडी उभी होती. त्या बंगल्यातला 'चिन्मय' नावाचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आपल्या जुन्या सेमिस्टर ची पुस्तकं रद्दीत टाकायला आला होता. त्याने ती पुस्तकं कचऱ्याच्या डब्यात फेकली.
सखाराम ने ती पुस्तकं उचलली, आपल्या शर्टाने पुसून पिशवीत ठेवली.
चिन्मयने हे पाहिलं, हसून म्हणाला, "काय काका ? तुम्हाला वाचता येतं का ? कशाला कचरा गोळा करताय ? ती इंजिनिअरिंगची पुस्तकं आहेत, तुमच्या डोक्या वरून जातील. त्यापेक्षा भंगारात विका, दोन पैसे मिळतील चहा प्यायला."
सखारामने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने फक्त मान डोलावली आणि ती पुस्तकं जपून ठेवली.
चिन्मयने पुन्हा टोमणा मारला, "अहो, जागा भरली की काय गाडीची? कचरा आणि ज्ञान एकाच पिशवीत? भारीच शौक आहे तुमचा."
सखाराम शांतपणे म्हणाला, "साहेब, ज्याला पोटाची भूक असते त्याला अन्नाची किंमत कळते आणि ज्याला ज्ञानाची भूक असते त्याला अक्षराची किंमत कळते. ही तुमच्या साठी रद्दी असेल, पण कोणा साठी तरी हे भविष्य आहे."
चिन्मयला ते कळलं नाही. तो हसून निघून गेला.
...६ महिने उलटले.
चिन्मय च्या कॉलेजची 'एनएसएस' (NSS - राष्ट्रीय सेवा योजना) ची टीम एका ग्रामीण भागात शिबिरासाठी (Camp) गेली होती.
ते गाव खूप मागासलेलं होतं. तिथे शाळा नव्हती, लाईट नव्हती.
पण गावकऱ्यांनी सांगितलं की, "आमच्या गावात एक 'मोफत वाचनालय' (Free Library) आहे, जिथे आमची पोरं संध्याकाळी शिकायला जातात."
चिन्मय आणि त्याचे मित्र कुतूहलाने त्या वाचनालयात गेले. ते वाचनालय एका पत्र्याच्या शेड मध्ये होतं.
पण आतलं दृश्य बघून चिन्मय थक्क झाला.
तिथे लाकडी कपाटां मध्ये हजारो पुस्तकं अतिशय नीटसपणे लावली होती.
त्यात कादंबऱ्या होत्या, विज्ञानाची पुस्तकं होती, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं होती आणि... इंजिनिअरिंगची पुस्तकं सुद्धा होती.
तिथे ५०-६० गरीब मुलं, ज्यांच्या अंगावर धड कपडे नव्हते, ती मुलं त्या पुस्तकां मध्ये डोकं घालून अभ्यास करत होती.
चिन्मयने एका मुलाला विचारलं, "हे वाचनालय कोणाचं आहे ? सरकारचं आहे का ?"
तो मुलगा म्हणाला, "नाही दादा. हे आमचे 'सखाराम बाबा' आहेत ना, त्यांनी बनवलंय. ते शहरात कचरा गाडीवर काम करतात. दर रविवारी ते गावी येतात आणि पोत्यात भरून पुस्तकं आणतात. ते म्हणतात, 'माझ्याकडे पैसे नाहीत शाळा बांधायला, पण रद्दीतून वाचनालय तर बनवू शकतो ना'."
चिन्मयच्या पायाखालची जमीन सरकली.
'सखाराम ?' तोच कचरा वेचणारा माणूस ?
तेवढ्यात सखाराम तिथे आला. त्याने डोक्यावर एक पुस्तकांचा गठ्ठा घेतला होता.
त्याच्या अंगावर तोच निळा, मळका गणवेश होता.
चिन्मयला बघून सखाराम हसला.
"अरे साहेब ? तुम्ही इथे ? ओळखलं का मला ? मी तोच... तुमच्या बंगल्या समोर चा कचरावाला."
चिन्मयला काय बोलू सुचेना. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
त्याने सखारामच्या हातातलं ते पुस्तक पाहिलं.
ते पुस्तक दुसरं तिसरं काही नसून, ६ महिन्यांपूर्वी चिन्मयने जे पुस्तक 'कचरा' म्हणून फेकून दिलं होतं आणि सखारामला 'अडाणी' म्हणून हिणवलं होतं, तेच पुस्तक आज सखारामच्या हातात होतं.
चिन्मय धावत गेला आणि त्याने सखारामचे पाय धरले.
"काका, मला माफ करा ! मी तुम्हाला अडाणी समजलो, पण तुम्ही तर खऱ्या अर्थाने 'सुशिक्षित' आहात.
मी इंजिनिअर झालो, पण पुस्तकाची किंमत मला नाही कळली. तुम्ही कचऱ्यातून 'सोनं' शोधून या मुलांचं भविष्य घडवलंय.
आज मला कळलं की, शाळा इमारती मुळे नाही, तर माणसां मुळे मोठी होते."
सखारामने चिन्मयला उठवलं. "रडू नकोस, फक्त एक विनंती आहे... पुढच्या वेळी रद्दी विकताना विचार कर. ती रद्दी कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते.
मी शाळेत गेलो नाही, गरिबी मुळे शिकलो नाही. म्हणून मला वाटतं की या पोरांनी तरी शिकावं. माझा हात कचऱ्यात असतो, पण या पोरांच डोकं आकाशात असावं, हेच स्वप्न आहे.
" त्या दिवशी चिन्मयने शपथ घेतली.
तो परत पुण्यात आला आणि त्याने आपल्या कॉलेजमध्ये 'डोनेट अ बुक' (Donate a Book) मोहीम सुरू केली.
आज सखारामच्या त्या छोट्याशा वाचनालयात १० हजारांहून अधिक पुस्तकं आहेत. आणि ती सांभाळणारा तो 'कचरा गाडीचा चालक' आज त्या गावकऱ्यां साठी *'कुलगुरू'* पेक्षा कमी नाही.
कोणाच्याही कामावरून त्याची बुद्धिमत्ता आणि दानत ठरवू नका. एक कचरा वेचणारा माणूस सुद्धा समाजा साठी *'विद्यापीठ'* उभा करू शकतो. *ज्ञान* हे *पुस्तकात* असतं, पण *शहाणपण* हे *संस्कारात* असतं.
*जुनी पुस्तकं फेकून देण्या पेक्षा ती गरजूं पर्यंत पोहोचवा. काळाची आणि समाजाची गरज आहे* 🙏
आपण सर्व सुशिक्षित, *सखाराम* नाही होऊ शकत, परंतु त्या अशिक्षिता कडून खूप काही शिकू शकतो.
आपण सर्वांनी काय करायचे ?
आपल्या कडील पुस्तके, कपडे, जुनी सायकल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर , बेड, फर्निचर इत्यादी ... जे काही आपल्या उपयोगाचे नाही, वर्षानुवर्ष अडगळीत न ठेवता, खराब होण्यापूर्वी वेळेत दुसऱ्याला देणे. आपला वापर झालेला असल्याने त्याचे मोल आपल्याला नसते, ज्याला हवे आहे, त्याच्या साठी अनमोल असेल.... !
माझ्या मित्रांपैकी एका मित्राने आपला जुना सुस्थितीतील लॅपटॉप माझ्या कडे पाठवला, तो लॅपटॉप एका खेड्यातील शाळेत दिला जाईल, ज्याने तो दिला आहे, त्याच्याच शुभ हस्ते.
अनेक शाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना अशा वस्तूंची खूप गरज असते, त्यांना देता येतात.
अनेक खेड्यात, शाळेत जाण्या साठी बस ची व्यवस्था नसते, पायी जावे लागते. आपल्या कडील अडगळीत पडलेल्या जुन्या सायकली त्यांच्या साठी खूप मोठी मदत असेल.