फॉलो करा
राष्ट्रभक्ती न्यूज .
@sagarmudake05
4,025
पोस्ट
4,258
फॉलोअर्स
राष्ट्रभक्ती न्यूज .
583 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा नवी दिल्ली, दि. 27: साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत आज झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्ली येथे आज महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात श्री. शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हेही या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, खा. धनंजय महाडिक, आ. दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, डॉ राहुल आहेर, विनय कोरे, राहुल कुल, अभिमन्यु पवार, विनय कोरे, राजेश टोपे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर महासंघाचे जयप्रकाश दांडेगावकर, रणजितसिंह निंबाळकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, सुहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे , साखर आयुक्त संजय कोलते आधी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेतील मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. साखरेच्या प्रश्नांवर केंद्रीय सहकार मंत्र्यांसोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे श्री. शाह यांनी मान्य केले आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य सरकारसोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासह व्याज सवलतीचे (इंटरेस्ट सबव्हेंशन ) पैसे तात्काळ देण्याचे मान्य करण्यात आले करण्यात आले आहे. 'क्वेल प्राइजिंग' ( किंमत नियंत्रण) संदर्भात केंद्राने एक प्रस्ताव मागवला असून, राज्य सरकारकडून तो तयार केला आहे व लवकरच सादर केला जाईल. या प्रकल्पामुळे साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक निर्णय झाले असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, नाफेड आणि एनसीसीएफने सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता, थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. २ लाख टनांऐवजी १० लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफने करावी, यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सध्या कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशांतर्गत कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही. यासाठी कांदा बियाण्यावर मोठ्या प्रमाणात 'एक्सपोर्ट सरचार्ज' लावला पाहिजे, ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. तसेच कांद्याचा खरेदी भाव नुकताच वाढवून १५ रुपये ८० पैसे करण्यात आला आहे. तो आणखी कसा वाढवता येईल यावर चर्चा झाली. कांद्याच्या बियाणांवर निर्बंध असले, तरी कांद्याच्या निर्यातीवर (कांदा पाठवण्यावर) कोणतीही बंदी नाही, असे या चर्चेत स्पष्ट करण्यात आले. नाफेड किंवा एनसीसीएफमध्ये ग्रेडिंगच्या नावाखाली माल निकृष्ट दर्जाचा दाखवून खरेदी नाकारली जाते, अशी शेतकऱ्यांची तक्रार असते. यावर उपाय म्हणून आता यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळणार असल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, आंबा आणि हापूस आंब्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले. विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटींमध्ये बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.यावर केंद्रीय मंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. #भाजपासरकार #एकनाथशिंदे #DevendraFadnavis #MaharashtraNews #devendrafadnavisformaharashtra #rashtrabhaktinews #viralreelsfacebook #भाजपाई #भाजपापरिवार #agriculture #🎭Whatsapp status
राष्ट्रभक्ती न्यूज .
9.3K जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
बाणेगावचे सुपुत्र महादेव चव्हाण यांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती उत्तर सोलापूर (प्रतिनिधी) :- बाणेगाव येथील सुपुत्र व जालना जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महादेव बाबुराव चव्हाण यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीसोबतच त्यांची नियुक्ती पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात (सी.आय.डी.) एक टप्पा पदोन्नतीने पोलीस उपअधीक्षक या अत्यंत जबाबदारीच्या पदावर करण्यात नियुक्ती आली आहे. बार्शी ते मुंबईचा यशस्वी प्रवास महादेव चव्हाण यांनी आपल्या सेवाकाळात विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.वडील बाबूराव चव्हाण यांची परिस्थिती बेताचीच.बाणेगावचे कोतवाल म्हणून पूर्वीच्या काळी ते नोकरीला होते. मात्र मुलाने शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी करावी,हे त्यांचे स्वप्न.महादेव चव्हाण यांचे शालेय शिक्षण बाळे येथील जडावबाई चंडक प्रशालेत तर महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात झाले.वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दोन वर्षे सिध्देश्वर साखर कारखान्यात नोकरी केली.1995 साली ते पोलिस खात्यात काॅन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यांनी सोलापूर ग्रामीण अंतर्गत बार्शी, नातेपुते आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तसेच, मुंबई सारख्या महानगरात जे. जे. मार्ग, ओशिवरा, कफ परेड आणि गावदेवी यांसारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. जालना जिल्ह्यातील कामगिरी जालना जिल्ह्यात त्यांनी कदिम जालना पोलीस ठाणे आणि जिल्हा विशेष शाखेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आपली सेवा दिली. सन २०२५ मध्ये चव्हाण यांनी जाफराबाद पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला होता. अल्पशा कार्यकाळात त्यांनी वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई करत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले. माहोरा परिसरातील जनतेशी सुसंवाद साधून त्यांनी पोलिसांबद्दलचा विश्वास वाढवला आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश संपादन केले. त्यांच्या एकूणच प्रशासकीय कौशल्य आणि गुन्हेगारी तपासण्यातील अनुभवाची दखल घेत शासनाने त्यांची वर्णी आता गुन्हे अन्वेषण विभाग (सी.आय.डी.) पुणे येथे केली आहे. एक टप्पा पदोन्नतीने पोलीस उपअधीक्षक म्हणून ते आता राज्यस्तरीय गुन्ह्यांच्या तपासाची धुरा सांभाळणार आहेत. #rashtrabhaktinews #viralreelsfacebook #महाराष्ट्र #मार्डी #सोलापूर #सोलापूरशहर #सोलापूरकर #पोलिस #बाणेगाव #solapur #SolapurNews #MARDI #police #🎭Whatsapp status
राष्ट्रभक्ती न्यूज .
525 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
केवळ काँक्रीट नव्हे, तर पर्यावरणपूरक विकास! उपसभापती इंद्रजीत पवारांचा ऐतिहासिक निर्णय." सोलापूर जिल्हा परिषद: विकासकामांना वेग अन् पर्यावरण संवर्धनाचा 'सक्तीचा' संकल्प; बांधकाम समितीची मासिक सभा संपन्न ​सोलापूर: ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष ताळेबंद मांडण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची अत्यंत महत्त्वाची व बहुप्रतीक्षित अशी बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज दिनांक २६ मे २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांच्या कामांचा धारदार आढावा घेण्यात आला, तर दुसरीकडे केवळ सिमेंट-काँक्रीटचे जंगल उभे न करता पर्यावरणपूरक विकासाचा एक ऐतिहासिक संदेशही या सभेतून देण्यात आला आहे. ​सभेच्या सुरुवातीला २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मागील बैठकीच्या कार्यवृत्ताचे वाचन करून ते कायम करण्यात आले, तसेच त्यातील ठराव पूर्ततेची सविस्तर नोंद घेण्यात आली. त्यानंतर प्रशासनाकडून प्राप्त झालेली महत्त्वाची शासकीय पत्रे, परिपत्रके आणि थेट शासन निर्णयांचे (GR) वाचन करून धोरणात्मक चर्चा करण्यात आली. ​या महत्त्वपूर्ण बैठकीत बांधकाम विभाग क्रमांक १ व २ च्या अखत्यारितील निरनिराळ्या विकासकामांच्या एप्रिल २०२६ अखेरपर्यंतच्या खर्चाचा विषयवार ताळेबंद मांडण्यात आला. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती आणि एप्रिल महिन्यात मंजूर झालेल्या नवीन कामांच्या निविदा प्रक्रियांचा सखोल आढावा घेऊन ही कामे विहित मुदतीत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच, ग्रामीण भागातील बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाडी बांधकामांचा तालुकावार आढावा घेऊन प्रशासकीय यंत्रणेला गती देण्याच्या सूचना केल्या गेल्या. ​या सभेचे सर्वात मोठे आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी घेतलेला पर्यावरणपूरक आणि धडक निर्णय! केवळ इमारती उभ्या करून विकास होत नाही, तर निसर्गाचा समतोल राखणेही तितकेच गरजेचे आहे, ही दूरदृष्टी ठेवून सभापती इंद्रजीत पवार यांनी थेट आदेशच जारी केले आहेत. या आदेशानुसार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या-ज्या ठिकाणी सरकारी कामे मंजूर झाली आहेत— मग ती शाळा असो, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, किंवा पशुवैद्यकीय दवाखाना— ही सर्व बांधकामे पूर्ण झाल्यानंतर त्या प्रत्येक इमारतीच्या परिसरात किमान १० झाडे लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. सभापतींच्या या कडक व पर्यावरणपूरक भूमिकेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूणच कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. ​तसेच, आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्यापूर्वीच्या नियोजनाबाबतही सभेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, जिल्हा प्रशासनाने ग्रामीण विकासाचा गाडा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा निर्धार या सभेतून व्यक्त केला आहे. #rashtrabhaktinews #viralreelsfacebook #BJPNEWS #सोलापूरकर #सोलापूर #सोलापूरशहर #जिल्हापरिषद #इंद्रजितपावर #मार्डी #राष्ट्रभक्ती #महाराष्ट्र #maharshatra #BJPGovernment #🎭Whatsapp status
राष्ट्रभक्ती न्यूज .
532 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
धर्म टिकून राहण्यासाठी आर्थिक सक्षमता महत्त्वाची! - विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड (दिनांक : २५ मे २०२६) अशोकजी सिंघल यांनी आपल्या समर्पित योगदानातून हिंदू धर्माचा स्वाभिमान जागृत केला; पण धर्म टिकून राहण्यासाठी आर्थिक सक्षमता महत्त्वाची असते!' असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी कामशेत येथे व्यक्त केले. श्री अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट, मुंबई संचालित कामशेत येथील ग्रामदूत प्रकल्पा अंतर्गत आर्थिक साक्षरता व महिलांचे आर्थिक सबलीकरण या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मिलिंद परांडे बोलत होते. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद अध्यक्ष प्रा. गजानन धारणे, अनिरुद्ध पंडित, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, संस्थेचे विश्वस्त सुरेश पसारिया, मनमोहन गोयंका, पवन पोदार, बालकिशन अगरवाल, अमोल पगडे, श्याम गुजरपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, 'अजूनही ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्योत्तर काळातही बरेचसे भारतीय वावरताना दिसतात. वास्तविक साधूसंत आणि देशभक्तांनी समाजाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. अशोकजी सिंघल यांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू समाजात चैतन्य निर्माण केले. धर्म आणि संस्कृतीशिवाय समाज एकसंध राहू शकत नाही. आदरणीय अशोकजींच्या नावाने कार्यरत असलेल्या या संस्थेचे आर्थिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रांसह शिक्षण, आरोग्य, पाणी या मूलभूत सुविधांसाठी असलेले कार्य अतिशय स्तुत्य आहे. या अंदर मावळ परिसरातील सुमारे छप्पन गावे आणि तीन वस्त्यांमधील सर्वांगीण विकासासाठी ही संस्था सातत्याने तीन वर्षांपासून कार्यरत आहे. या कामाची व्याप्ती सर्वदूर पोहोचली पाहिजे. हिंदू समाजाचा जन्मदर कमी होतो आहे, ही गंभीर बाब आहे. जनगणनेत धर्माचा उल्लेख 'हिंदू' करायला विसरू नका!' मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गवळी यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पसारिया यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कांचन राळे (संगणक), पूजा जाधव (शिवणकाम), वर्षा चव्हाण, अश्विनी केंगले, अर्चना इंगळे, सायली शिंदे (गृह उद्योजिका), संध्या शिंदे (स्वविकास केंद्र) आणि स्तनदा माता श्रद्धा जाधव यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. सोनम राणे यांनी सूत्रसंचालन केले. #IndiaNews #महाराष्ट्र #rashtrabhaktinews #🎭Whatsapp status
राष्ट्रभक्ती न्यूज .
578 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
वरिष्ठांकडे शहाजी बापू पवारांना डावलण्यासाठी सबळ कारणच नाही; सोलापूर विधानपरिषदेसाठी भाजपकडे पवारांशिवाय दुसरा पर्यायच नाही! सोलापूर भाजपचे पडद्यामागचे सूत्रधार: शहाजी बापू पवार; ३२ वर्षांच्या निष्ठेला आता विधानपरिषदेचा 'राजयोग' मिळणार का? सोलापूर जिल्हा विशेष राजकीय विश्लेषण: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा जो 'अश्वमेध' सध्या विजयाची नवनवी शिखरे सर करत आहे, त्या रथाच्या चाकाखाली हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांचे श्रम आणि रक्त सांडले आहे. मात्र, या सर्व राजकीय गणितांचे मुख्य केंद्रबिंदू, पडद्यामागचे खंबीर सूत्रधार आणि भाजपच्या विजयाचे खरे 'चाणक्य' म्हणजेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी बापू पवार! ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी 'पाया' बनून स्वतःला गाडून घेतले, आज त्यांच्याच नावाच्या 'कलशाची' आणि सन्मानाची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत तीव्रतेने रंगू लागली आहे. अनेकांना आमदारकीची स्वप्ने दाखवणारे शहाजी बापू आता स्वतः आमदारकीच्या उंबरठ्यावर उभे आहेत का? आणि "जयाभाऊ (जयकुमार गोरे) म्हणतील अन् देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) करतील..." हे समीकरण आता प्रत्यक्षात उतरणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकारणात सत्ता आणि पद मिळवण्यासाठी जिथे सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी होतात, तिथे शहाजी बापू पवारांनी 'संयमाचा' एक नवा आदर्श उभा केला. गेल्या ३२ वर्षांपासून त्यांनी स्वतःसाठी कोणत्याही सत्तेची किंवा पदाची लालसा न धरता, केवळ 'कमळ' फुलवण्यासाठी रक्ताचे पाणी केले. ३२ वर्षे हा केवळ आकडा नाही, तर तो एका निष्ठावंत तपस्व्याचा 'वनवास' आहे, जो केवळ संघटनेच्या वाढीसाठी आणि विचारधारेसाठी सोसला गेला. सत्ता येते आणि जाते, पण निष्ठा आणि दिलेला शब्द कधीच पुसला जात नाही,"या उक्तीप्रमाणे पवारांनी आजवर आपली राजकीय कारकीर्द पक्षाच्या चरणी निस्सीमपणे झिजवली आहे. राजकारणाच्या रणांगणात शहाजी बापू पवार यांची भूमिका ही नेहमीच पडद्यामागून अचूक सूत्रे हलवणाऱ्या मार्गदर्शकासारखी राहिली आहे. स्वतः कधीही सत्तापदाच्या शर्यतीत न उतरता केवळ आपल्या बुद्धीचा, मुत्सद्देगिरीचा आणि रणनीतीचा वापर करून त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले. बूथपासून ते विधानसभेपर्यंत जिल्ह्यातील आमदार ,खासदार, यांच्या निवडणुकीच्या वेळी सोलापूर शहरातील नगरसेवकाचा पक्षप्रवेश,आमदार देवेंद्र कोठे यांच्या साठी खूप महत्वाचा मार्ग ठरला व आमदार सचिन कल्याणशेट्टी असोत व जिल्ह्यातील विविध मतदार संघातील आमदार असोत या सर्वांच्या विजयाचा रथ गतीमान करण्याचे 'सारथ्य' शहाजी बापूंनी अत्यंत चिकाटीने केले. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत प्रत्येक जागा जिंकण्यासाठी त्यांनी जी अचूक 'फील्डिंग' लावली, त्यामुळेच आज सोलापूरच्या सत्तेवर भाजपचा झेंडा दिमाखात फडकत आहे. शिंदेंच्या अभेद्य बालेकिल्ल्याला सुरुंग लावत 'काँग्रेस-राष्ट्रवादी' भुईसपाट करत शहाजी पवारांचा राजकीय प्रवास हा संघर्षाचा आणि संयमाचा जिवंत आदर्श आहे. २०१३ साली जेव्हा त्यांच्याकडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आली, तेव्हा सोलापूर जिल्हा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेचा अजरामर बालेकिल्ला होता. विशेषतः, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांचा या जिल्ह्यावर एकछत्री अंमल होता. अशा अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत शहाजी बापूंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या अभेद्य गढ्याला सुरुंग लावण्याचे ऐतिहासिक कार्य केले. कोणतेही सत्तापद नसताना केवळ पक्ष संघटनेच्या बळावर, खेडोपाड्यात फिरून त्यांनी भाजपचा विचार रुजवला. ज्या काळात जिल्ह्यात भाजपचे नाव घ्यायला लोक कसरत करत होते, त्या सोसाट्याच्या वाऱ्यात बापूंनी विचारधारेची मशाल केवळ तेवतच ठेवली नाही, तर शिंदेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत संपूर्ण सोलापूर जिल्हा 'भाजपमय' करून सोडला. आज जिल्हा परिषद, महापालिका आणि अनेक मतदारसंघांवर भाजपचा जो झेंडा फडकत आहे, त्याचा पाया २०१३ च्या त्या ऐतिहासिक संघर्षात शहाजी पवारांनीच रचला होता. जिल्ह्यात राजेंद्र राऊत, राजन पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, पवारांच्या कार्याची उंची आणि वजन काही वेगळीच ठरते. राजेंद्र राऊत,राम सातपुते,प्रशांत परिचारक, राजन पाटील, या सर्वांच्या नावामागे 'आमदार' ही पदवी लागली आहे. परिचारक व पाटील यांनी स्वतःची सत्ताकेंद्रे, कारखाने आणि यंत्रणा उभी केली. याउलट, पवारांनी कधीही स्वतःला 'मोठे' करण्यापेक्षा पक्षाला 'मोठे' करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. राजन पाटील आणि त्यांच्या पुत्रांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मोहोळमध्ये त्यांच्या प्रवेशानंतर भाजपची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र तिथे आमदार निवडून आणण्यात त्यांना अपयश आले; केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. परंतु, शहाजी बापूंनी संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर जिल्ह्यात अनेक आमदार आणि खासदार यशस्वीरीत्या निवडून आणण्याचा चमत्कार करून दाखवला आहे. घराणेशाही' विरुद्ध 'निष्ठा': रोहन देशमुखांची चर्चा आणि भाजपचा पेच! सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या आणखी एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांची. रोहन देशमुख यांनाही आगामी काळात मोठी संधी देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, इथेच भाजपसमोर एक मोठा नैतिक आणि राजकीय पेच निर्माण होतो. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीपासून ते गल्लीपर्यंत नेहमीच घराणेशाही'ला कडाडून विरोध करत आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर टीका करूनच भाजपने आपली राजकीय जागा निर्माण केली आहे. अशा स्थितीत, सुभाष देशमुख हे स्वतः आधीच आमदार म्हणून सत्तेच्या मुख्य प्रवाहात असताना, त्यांचे पुत्र रोहन देशमुख यांना पक्ष पुन्हा कशी आणि कोणती संधी देणार? एकाच घरात दोन सत्तापदे दिल्यास भाजपच्या 'घराणेशाही विरोधी' भूमिकेचे काय? हा मोठा प्रश्न आहे. हाच मुद्दा शहाजी बापू पवारांच्या बाजूने अधिक मजबूत ठरतो. कारण एका बाजूला राजकीय घराणी स्वतःच्याच पुत्रांसाठी फिल्डिंग लावत असताना, दुसरीकडे शहाजी बापूंसारखा ३२ वर्षे पक्षासाठी झिजलेला, कोणताही कौटुंबिक वारसा नसलेला निस्वार्थ नेता विधीमंडळाची पायरी चढण्यासाठी वाट पाहत आहे. शहाजी बापू पवारांना डावलण्यासाठी वरिष्ठांकडे कारणच नाही! आता सोलापूरच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मुखातून एकच आर्त हाक उमटत आहे: "सगळे आमदार झाले, आता शहाजी बापूंची बारी!" हा केवळ नारा नाही, तर तो हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अंतःकरणातील भावनांचा तीव्र उद्रेक आहे. विश्वासाचे नेतृत्व करत असताना संकटकाळात पक्ष सोडून गेलेल्यांची गर्दी मोठी असताना, 'तटस्थ' आणि 'एकनिष्ठ' राहून संघटनेचा किल्ला लढवणाऱ्या या नेतृत्वाचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. ज्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही, पण दुसऱ्यांच्या कपाळावर विजयाचा गुलाल लावण्यासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांच्या कपाळावर आता विधीमंडळाचा 'राजयोग' पाहण्याची ओढ सर्वांना लागली आहे. ३२ वर्षांचा त्याग, २०१३ पासून उभी केलेली पक्ष संघटना, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या बालेकिल्ल्याला लावलेला सुरुंग, संकटात दिलेली साथ आणि 'काँग्रेसमुक्त सोलापूर'चा घेतलेला ध्यास... या सर्व पार्श्वभूमीवर शहाजी बापू पवार यांना विधानपरिषदेवर संधी न देण्यासाठी किंवा त्यांना डावलण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आता कोणतेही सबळ कारण उरलेले नाही!जर अशा प्रामाणिक आणि निस्वार्थ नेत्याला डावलले गेले, तर तो निष्ठावंतांच्या घामाचा अपमान ठरेल. जयाभाऊ यांचा शब्द आणि देवाभाऊंचा निर्णय" ही समीकरणे जर जुळून आली, तर शहाजी बापूंचे विधानभवनात जाणे आता काळ्या दगडावरची रेघ मानली जात आहे. शहाजी पवारांच्या कष्टाचे चीज करून पक्ष त्यांना 'विधीमंडळाच्या पायऱ्या' चढवणार का? याचे उत्तर काळच देईल; पण सध्या तरी सोलापूरच्या राजकारणात 'हवा', 'चर्चा' आणि 'प्रतीक्षा' फक्त आणि फक्त शहाजी बापू पवारांच्या न्यायाचीच आहे! कार्यकर्त्यांची एकच हाक आता सगळे आमदार झाले, आता बापूंची बारी"; शहाजी बापू पवारांना विधीमंडळात पाठवण्याशिवाय सोलापूर भाजपकडे दुसरा सक्षम चेहराच नाही! राष्ट्रभक्ती न्यूज संपादक : सागर मुडके.✍️✍️✍️✍️✍️✍️ #भाजपासरकार #भाजपापरिवार #devendrafadnavisformaharashtra #भाजपाई #maharashtra #rashtrabhaktinews #india #शहाजीराजे #शहाजीपावर #इंद्रजितपावर #राजेंद्रराउत #राजनपाटील #रामसतपुते #सुभाषदेशमुख #मार्डी #MARDI #सोलापूरशहर #सोलापूर #सोलापूरकर #विधानपरिषद #solapurnews #solapur #solapurkar #BJPGovernment #BJPNEWS #bjp #🎭Whatsapp status
राष्ट्रभक्ती न्यूज .
993 जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
"जाग उठा है हिंदु हृदय मे..." कोपरगावात विहिंपच्या १० दिवसीय 'परिषद शिक्षा वर्गा'चा थाटात समारोप लव्ह जिहाद, धर्मांतराच्या संकटांवर मात करण्यासाठी 'घरवापसी' आणि कार्यविस्तार काळाची गरज! महाराष्ट्र : दि. ३ मे ते १३ मे या १० दिवसाचा वर्ग कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, कोकमठाण, शिर्डी रोड येथे संपन्न झाला. वर्गाचे आयोजन विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, उत्तर अहिल्यानगर जिल्हा यांनी केले होते. पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि कोकण प्रांत आणि गोवा येथील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमास क्षेत्र मंत्री रामचंद्र रामुका, आत्मा मालिक ध्यानपीठाचे श्री. प.पू. परमानंदजी महाराज महाराज, प्रांत अध्यक्ष, वर्ग प्रमुख प्रा. गजानन धरणे, वर्ग पालक तथा समरसता क्षेत्र प्रमुख नरेशजी पाटील, क्षेत्र संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, विहिंप केन्दीय विश्वस्त प्रभाकरराव शिंदे, प्रांत विधि प्रकोष्ठ प्रमुख ॲड.शैलेश भावसार, प्रांत धर्मप्रसार प्रमुख तथा बौद्धीक प्रमुख ॲड. मृणालिनी पडवळ, प्रांत निधी प्रमुख धनाजी शिंदे, प्रांत सेवा सहप्रमुख शर्वरीताई एरगट्टीकर, विभाग मंत्री विजयकुमार पिसे, विभाग सहमंत्री विशाल वाकचौरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी शिबीराथींचे अनुभव कथन झाले. त्यानंतर वर्ग प्रमुख तथा प्रांत अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे, वर्ग पालक तथा क्षेत्र समरसता आयाम प्रमुख नरेश पाटील यांनी संबोधन केले. या दहा दिवसात संपूर्ण देशभरातील केन्द्रीय पदाधिकारी यात केन्द्रीय संघटन महामंत्री मा. मिलींद जी परांडे, मा. अमरीशजी, मा. विवेक कुलकर्णी, प्रा. संजय मुदराळे, मा. मोहनजी सालेकर इ. विविध मान्यवर अनुभवी पदाधिकारी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. वर्गार्थींनी विविध बौद्धिक सत्र, कृती सत्र, चर्चासत्र, संवाद सत्र यामध्ये सहभाग घेतला. सर्वांचे अनुभव ज्ञान आणि संघटन कौशल्य याचा सर्व विद्यार्थ्यांना आपले कार्य विस्तार करण्यासाठी व्हावा, यासाठी उत्तम मार्गदर्शन केले. हिंदू समाजातील उच्च-नीच भेदभाव, असमानता या कारणामुळे धर्मांतरणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि आता हिंदू बंधूंना घरवापसी किंवा परावर्तन याबद्दल कार्यविस्तार करणे गरजेचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. लव जिहाद, लँड जिहाद या वर्तमान काळातील समस्या हिंदू समाजापुढे आहेत. भारत मातेला परम वैभवाला नेताना आपले संघटन महत्त्वपूर्ण कार्य करत आहे, यामध्ये व्यक्ती विकास होऊन कार्यकर्ता निर्माण होतो हीच त्याची ओळख आहे. जुने नवीन कार्यकर्ता सर्वांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. महिला, दुर्गा, युवा, बजरंग दल अशा वेगवेगळ्या आयामातील कामाची माहिती विद्यार्थ्यांना या वर्गातून मिळाली. यानंतर रामचंद्रजी रामुका यांनी समारोप भाषणामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आपल्या राहत्या ठिकाणची माहिती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्राम, प्रखंड, जिल्हा, विभाग अशी भौगोलिक माहिती घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी सर्वव्यापी सर्वस्पर्शी असे हिंदुत्वाचे कार्य करावे, असे आवाहन केले आपल्या कामामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक सर्वांना सामावून घ्यावे. सामाजिक समरसता टिकवावी जेणेकरून महापुरुषांची जयंती, जन्मोत्सव समाजातील सर्वांनी एकत्रित साजरे करावे. वस्ती वस्तीमध्ये जाऊन हिंदुत्व जागरणाचे कार्यक्रम घ्यावेत.माधवराव काणे (कल्याण महानगरपालिका अध्यक्ष) यांनी तलासरी मुंबई येथे वसतिगृह आणि शाळा असे सेवा केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे धर्मांतरणास आळा बसला, मुले प्रशिक्षित होतात, सुसंस्कारित होता असे देखील उदाहरण दिले. अशोकजी सिंघल यांनी राजस्थानमध्ये बांसवाडा क्षेत्रामध्ये एका वेळेस ७०,००० हिंदू बांधवांची घरवापसी केली, हे देखील मोठे कार्य आहे. मातृछाया प्रकल्प गोवा येथे देखील एक जनजातीय कल्याण केंद्र आहे. सेवा वस्तीमध्ये जाऊन संस्कार शाळा घेणे आणि समाजामध्ये सांस्कृतिक जागरण घडवणे असे त्यांचे कार्य आहे असे सांगितले. आशीर्वचन देण्यासाठी आत्मा मालिक अध्यात्मिक ध्यानपीठ संत सद्गुरू परमानंदजी महाराज देखील उपस्थिती राहिले. आत्मा मालिक ज्ञानपीठ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने उपस्थित सर्व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. आणि येत्या काळात हिंदुत्वासाठी समाजामध्ये जाऊन काम करण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. मुंबई क्षेत्रातील दोन्ही प्रांतात सर्व दूर हिंदुत्वाचे कार्य घडावे, यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहा दिवसाचे भोजन, निवास सेवा आत्मा मालिक ध्यानपीठ, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम येथे देण्यामध्ये आमची धन्यता आहे. असे गौरवद्गार काढले. १२ मे रोजी संध्याकाळी उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यातील ८ गावांमध्ये जाऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सत्संग घेतला, यासाठी देखील स्वामी परमानंदजी महाराज यांनी अनुमोदन दिले. आत्मा मालिक ध्यानपीठ परमानंदजी महाराज यांचे आगमन होताच, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने माननीय रामचंद्रजी रामुका (मुंबई क्षेत्रीय सहमंत्री) यांच्या हस्ते श्रीफळ आणि मंगल वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. आत्मा मालिक ध्यानपीठ, विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट मार्फत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह चालविले जाते ते देखील विद्यार्थ्यांना संस्कारीत आणि सक्षम नागरिक करण्यासाठी. हिच मुले-मुली म्हणजे पुढच्या पिढीचे भविष्य आहे आणि ते उज्वल व्हावे म्हणून आपण प्रयत्न करतो असे देखील स्वामीजींनी सांगितले. येत्या काळामध्ये हिंदुत्वाचे जागरण होवो आणि सर्व समस्या निराकरण होवो असे आपल्या हातून कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. समारोप सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग मंत्री विजयकुमार पिसे यांनी केले. वर्गाची व्यवस्था प्रांत सहमंत्री तथा पालक ॲड सतिश गोरडे, महाव्यवस्था प्रमुख विभाग सहमंत्री विशाल वाकचौरे, जिल्हा मंत्री सुरेंद्र महाले यांच्या नेतृत्वात योगेश मखाना, तुषार ठाकूर, दीपक शिनगर, शुभम मुर्तडक, राकेश भोकरे, प्रशांत बहिरट, मुकेश दायमा, दीपक भोसले, गीता परदेशी, आशा महाले, ज्ञानेश्वरी ठाकूर आदि कार्यकर्त्यांनी केली. ........... #maharashtra #राष्ट्रभक्ती #NewsUpdate #rashtrabhaktinews #मार्डी #सोलापूरकर #जिहाद #हिंदू #हिंदूसंस्कृती #लव्हजिहाद #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
राष्ट्रभक्ती न्यूज .
1K जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
३०१ व्या अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मार्डीत विविध कार्यक्रमांचे आयोजन; ‘जय मल्हार तरुण मंडळा’च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा मार्डी दिनांक : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी गावातील ‘जय मल्हार तरुण मंडळ’ व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक मंडळाचे अध्यक्ष शाम भोगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या वर्षीच्या उत्सव नियोजनाची धुरा सांभाळण्यासाठी ‘जय मल्हार तरुण मंडळा’च्या वतीने नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे: उत्सव अध्यक्ष: प्रमोल गिरे उपाध्यक्ष: विजय मिसाळ खजिनदार: महेश गुड्ड, प्रकाश बनसोडे लेझिम प्रमुख: किरण बनसोडे, रोहित नवगिरे "राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मार्डी गावामध्ये अत्यंत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरी करण्याचा आमचा मानस आहे. ग्रामस्थांनी आणि ‘जय मल्हार तरुण मंडळा’ने माझ्यावर जी उत्सव अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे, ती मी सर्वांना सोबत घेऊन अत्यंत निष्ठेने पार पाडेन. अहिल्यादेवींचे समाजकारण, त्यांचे विचार आणि त्यांचे जनकल्याणाचे कार्य घराघरांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या जयंती सोहळ्यात पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम राबवले जातील. मार्डी आणि परिसरातील सर्व शिव-मल्हार भक्तांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव अध्यक्ष प्रमोल गिरे यांनी केले आहे. मंडळाचे अध्यक्ष शाम भोगे बोलताना म्हणाले "‘जय मल्हार तरुण मंडळ’ हे नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. या वर्षी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. जयंती उत्सवाचे नियोजन चोख आणि शिस्तबद्ध व्हावे, यासाठी आम्ही सर्वानुमते नवीन उत्सव समितीची घोषणा केली आहे. यंदाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या पारंपरिक लेझिम पथकाची आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी आतापासूनच जोमाने सुरू झाली आहे. गावातील तरुण रयत आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्तर सोलापूर तालुक्यात आदर्श ठरेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. यंदाच्या जयंती उत्सवात पारंपरिक लेझिम पथक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे मुख्य आकर्षण असणार आहेत. या बैठकीला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मार्डी परिसरामध्ये कौतुक होत आहे. #maharashtra #सोलापूरकर #NewsUpdate #rashtrabhaktinews #मार्डी #mardi #राष्ट्रभक्ती #होळकर #अहिल्यादेवी #अहिल्यादेवीहोळकर #राजमाता #राजमाता
राष्ट्रभक्ती न्यूज .
657 जणांनी पाहिले
19 दिवसांपूर्वी
बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल राहणार; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन. ​नियोजन भवनात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक; पहिल्या टप्प्यात वादमुक्त रस्त्यांचे सीमांकन करण्याचे निर्देश ​सोलापूर: मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना ही शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारी शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूर जिल्हा राज्यात आदर्श ठरेल, अशा पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने सकारात्मक भावनेतून काम करावे," असे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री यांनी आज येथे केले. जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित या योजनेच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. ​यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ​बैठकीत मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, शेतमाल वाहतुकीसाठी सुलभ रस्ते उपलब्ध करून देणे हा या योजनेचा पाया आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन टप्प्यांचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या रस्त्यांवर कोणतेही वाद नाहीत, अशा रस्त्यांचे तातडीने सीमांकन पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाद असलेल्या रस्त्यांचे वर्गीकरण करून समन्वयाने तोडगा काढावा. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून स्थानिक आमदारांनी यंत्रणेला सोबत घेऊन कामाचा वेग वाढवावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. ​या योजनेसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे स्पष्ट करत, प्रति किलोमीटर १५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चर खोदून, मुरुम टाकून आणि आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट पाईप बसवून रस्ते मजबूत केले जाणार आहेत. तांत्रिक अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडवल्या जातील, असेही यावेळी ग्वाही देण्यात आली. ​उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी योजनेच्या संरचनेची माहिती दिली, तर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक श्री. घोडके यांनी जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ९११ रस्त्यांची यादी प्राप्त झाली असून ३७२ रस्त्यांचे सीमांकन पूर्ण झाल्याचे सांगितले. उर्वरित रस्त्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #DevendraFadnavis #सोलापूर #सोलापूरकर #NewsUpdate #rashtrabhaktinews #maharashtra #जिल्हापरिषद #जयकुमारगोरे #पाणंद #रस्तेविकास #रस्ते #🗞देवेंद्र फडणवीस #🎭Whatsapp status #🔺भाजपा #🏛️राजकारण #💥राज ठाकरे