"जाग उठा है हिंदु हृदय मे..." कोपरगावात विहिंपच्या १० दिवसीय 'परिषद शिक्षा वर्गा'चा थाटात समारोप
लव्ह जिहाद, धर्मांतराच्या संकटांवर मात करण्यासाठी 'घरवापसी' आणि कार्यविस्तार काळाची गरज!
महाराष्ट्र :
दि. ३ मे ते १३ मे या १० दिवसाचा वर्ग कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, कोकमठाण, शिर्डी रोड येथे संपन्न झाला. वर्गाचे आयोजन विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, उत्तर अहिल्यानगर जिल्हा यांनी केले होते. पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि कोकण प्रांत आणि गोवा येथील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमास क्षेत्र मंत्री रामचंद्र रामुका, आत्मा मालिक ध्यानपीठाचे श्री. प.पू. परमानंदजी महाराज महाराज, प्रांत अध्यक्ष, वर्ग प्रमुख प्रा. गजानन धरणे, वर्ग पालक तथा समरसता क्षेत्र प्रमुख नरेशजी पाटील, क्षेत्र संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, विहिंप केन्दीय विश्वस्त प्रभाकरराव शिंदे, प्रांत विधि प्रकोष्ठ प्रमुख ॲड.शैलेश भावसार, प्रांत धर्मप्रसार प्रमुख तथा बौद्धीक प्रमुख ॲड. मृणालिनी पडवळ, प्रांत निधी प्रमुख धनाजी शिंदे, प्रांत सेवा सहप्रमुख शर्वरीताई एरगट्टीकर, विभाग मंत्री विजयकुमार पिसे, विभाग सहमंत्री विशाल वाकचौरे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी शिबीराथींचे अनुभव कथन झाले. त्यानंतर वर्ग प्रमुख तथा प्रांत अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे, वर्ग पालक तथा क्षेत्र समरसता आयाम प्रमुख नरेश पाटील यांनी संबोधन केले.
या दहा दिवसात संपूर्ण देशभरातील केन्द्रीय पदाधिकारी यात केन्द्रीय संघटन महामंत्री मा. मिलींद जी परांडे, मा. अमरीशजी, मा. विवेक कुलकर्णी, प्रा. संजय मुदराळे, मा. मोहनजी सालेकर इ. विविध मान्यवर अनुभवी पदाधिकारी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. वर्गार्थींनी विविध बौद्धिक सत्र, कृती सत्र, चर्चासत्र, संवाद सत्र यामध्ये सहभाग घेतला.
सर्वांचे अनुभव ज्ञान आणि संघटन कौशल्य याचा सर्व विद्यार्थ्यांना आपले कार्य विस्तार करण्यासाठी व्हावा, यासाठी उत्तम मार्गदर्शन केले. हिंदू समाजातील उच्च-नीच भेदभाव, असमानता या कारणामुळे धर्मांतरणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि आता हिंदू बंधूंना घरवापसी किंवा परावर्तन याबद्दल कार्यविस्तार करणे गरजेचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. लव जिहाद, लँड जिहाद या वर्तमान काळातील समस्या हिंदू समाजापुढे आहेत. भारत मातेला परम वैभवाला नेताना आपले संघटन महत्त्वपूर्ण कार्य करत आहे, यामध्ये व्यक्ती विकास होऊन कार्यकर्ता निर्माण होतो हीच त्याची ओळख आहे. जुने नवीन कार्यकर्ता सर्वांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. महिला, दुर्गा, युवा, बजरंग दल अशा वेगवेगळ्या आयामातील कामाची माहिती विद्यार्थ्यांना या वर्गातून मिळाली.
यानंतर रामचंद्रजी रामुका यांनी समारोप भाषणामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आपल्या राहत्या ठिकाणची माहिती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्राम, प्रखंड, जिल्हा, विभाग अशी भौगोलिक माहिती घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी सर्वव्यापी सर्वस्पर्शी असे हिंदुत्वाचे कार्य करावे, असे आवाहन केले आपल्या कामामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक सर्वांना सामावून घ्यावे. सामाजिक समरसता टिकवावी जेणेकरून महापुरुषांची जयंती, जन्मोत्सव समाजातील सर्वांनी एकत्रित साजरे करावे. वस्ती वस्तीमध्ये जाऊन हिंदुत्व जागरणाचे कार्यक्रम घ्यावेत.माधवराव काणे (कल्याण महानगरपालिका अध्यक्ष) यांनी तलासरी मुंबई येथे वसतिगृह आणि शाळा असे सेवा केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे धर्मांतरणास आळा बसला, मुले प्रशिक्षित होतात, सुसंस्कारित होता असे देखील उदाहरण दिले.
अशोकजी सिंघल यांनी राजस्थानमध्ये बांसवाडा क्षेत्रामध्ये एका वेळेस ७०,००० हिंदू बांधवांची घरवापसी केली, हे देखील मोठे कार्य आहे. मातृछाया प्रकल्प गोवा येथे देखील एक जनजातीय कल्याण केंद्र आहे. सेवा वस्तीमध्ये जाऊन संस्कार शाळा घेणे आणि समाजामध्ये सांस्कृतिक जागरण घडवणे असे त्यांचे कार्य आहे असे सांगितले.
आशीर्वचन देण्यासाठी आत्मा मालिक अध्यात्मिक ध्यानपीठ संत सद्गुरू परमानंदजी महाराज देखील उपस्थिती राहिले. आत्मा मालिक ज्ञानपीठ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने उपस्थित सर्व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. आणि येत्या काळात हिंदुत्वासाठी समाजामध्ये जाऊन काम करण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. मुंबई क्षेत्रातील दोन्ही प्रांतात सर्व दूर हिंदुत्वाचे कार्य घडावे, यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहा दिवसाचे भोजन, निवास सेवा आत्मा मालिक ध्यानपीठ, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम येथे देण्यामध्ये आमची धन्यता आहे. असे गौरवद्गार काढले. १२ मे रोजी संध्याकाळी उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यातील ८ गावांमध्ये जाऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सत्संग घेतला, यासाठी देखील स्वामी परमानंदजी महाराज यांनी अनुमोदन दिले.
आत्मा मालिक ध्यानपीठ परमानंदजी महाराज यांचे आगमन होताच, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने माननीय रामचंद्रजी रामुका (मुंबई क्षेत्रीय सहमंत्री) यांच्या हस्ते श्रीफळ आणि मंगल वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. आत्मा मालिक ध्यानपीठ, विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट मार्फत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह चालविले जाते ते देखील विद्यार्थ्यांना संस्कारीत आणि सक्षम नागरिक करण्यासाठी. हिच मुले-मुली म्हणजे पुढच्या पिढीचे भविष्य आहे आणि ते उज्वल व्हावे म्हणून आपण प्रयत्न करतो असे देखील स्वामीजींनी सांगितले.
येत्या काळामध्ये हिंदुत्वाचे जागरण होवो आणि सर्व समस्या निराकरण होवो असे आपल्या हातून कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. समारोप सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग मंत्री विजयकुमार पिसे यांनी केले.
वर्गाची व्यवस्था प्रांत सहमंत्री तथा पालक ॲड सतिश गोरडे, महाव्यवस्था प्रमुख विभाग सहमंत्री विशाल वाकचौरे, जिल्हा मंत्री सुरेंद्र महाले यांच्या नेतृत्वात योगेश मखाना, तुषार ठाकूर, दीपक शिनगर, शुभम मुर्तडक, राकेश भोकरे, प्रशांत बहिरट, मुकेश दायमा, दीपक भोसले, गीता परदेशी, आशा महाले, ज्ञानेश्वरी ठाकूर आदि कार्यकर्त्यांनी केली.
...........
#maharashtra #राष्ट्रभक्ती #NewsUpdate #rashtrabhaktinews #मार्डी #सोलापूरकर #जिहाद #हिंदू #हिंदूसंस्कृती #लव्हजिहाद
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌