Follow
sunita joge
@sunita5552
818
Posts
3,518
Followers
sunita joge
413 views
11 days ago
*माझी (म्हातार्‍याची) फजीती* 👴👴👴👴👴👴👴 रिटायर्ड झालो म्हणजे मी म्हातारा झालो की काय?" 🤔 म्हणजे काय झालं बघा... आज मंडईत भाजी आणायला गेलो. भाजी घेऊन बाहेर पडलो आणि खिसा चाचपला... छातीत धस्स झालं! एक्टिव्हाची चावी खिशात नव्हती.. ! लगेच परत मंडईत शिरलो. जिथं-जिथं गेलो होतो, परत त्या सगळ्या दुकानांत, टोमॅटोंच्या ढिगात, बटाट्यांच्या पोत्यात, सगळी कडे शोधलं… हाती काहीच नाही लागलं. चावी मिळाली नाही.. एकदम मनात वीज चमकली … "अरे ही चावी एक्टिव्हाच्या इग्निशनमध्येच राहून गेली असेल... आणि दुसऱ्यानं सुरू करून नेली तर?" लगेच धावत-धावत पार्किंगकडे गेलो… तर खरंच! एक्टिव्हाची सावलीसुद्धा जागेवर नव्हती! आता पार घाबरलो... पोलिसांना फोन लावला. "साहेब, माझी एक्टिव्हा….. गाडीचा नंबर, कलर, मेक... मॉडेल नंबर… सगळं सांगितलं... आणि कबुलीही दिली, "हो, साहेब, चावी गाडीलाच विसरलो. माझ्या विसरभोळेपणा मुळे ही चोरी झाली." पोलिस म्हणाले, "घाबरू नका, तुमची तक्रार लिहून घेतली.. गाडी शोधून देऊ."... मग केलं सगळ्यात मोठे आणि कठीण काम… म्हणजे बायकोला फोन... सांगताना माझा आवाज कापरा, घसा बसल्यासारखा आणि अंग थरथरत होते... दुसऱ्या बाजूला काही सेकंद एकदम शांतता… आणि मग मोठा भडका ! "अरे देवा! तुम्ही तर पूर्ण वेडे झालात! अरे मीच तुम्हाला एक्टिव्हावरूनच मंडईत सोडलं होतं आणि ब्युटी पार्लरला गेले..! पार सगळं विसरलात????? मी म्हटलं, "अगं, अगं.. साॅरी बाबा... आता बडबड नको... गाडी चोरीला गेली नाही... हे एक बरं झालं... चल, आता येऊन मला इथून घेऊन जा." ती परत भडकली! "तुम्ही कसल्या काय भानगडी करून ठेवल्यात..! आता मी पोलिस ठाण्यात बसलेय! तुमच्या तक्रारीवरून पोलिसांनी मला एक्टिव्हा चोरल्याबद्दल अटक केलीय! तुम्ही लगेच इकडे येऊन यांना सांगा की ही माझी बायको आहे, हिने चोरी केलेली नाही!" मग काय गुपचुप ठाणं गाठलं, पोलिसांची माफी मागून समजावलं, बायकोची सोडवणूक केली अन् सोबत घरी गेलो. 🤗🤗🤗 हम्म आताशा या वयात असे अनुभव यायचेच. तुमचं कस काय बाबांनो, म्हातारपणात अशी "मजा" येतेच! तुमच्याकडेही असेल असच काही गम्मतीचं, तर मग कळवा! आपली ख्याली खुशाली...! *आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका....* 😂🤣😂🤣😂🤣🤣😂😂 *अशाच गमतीशीर गोष्टींसाठी ग्रुप अवश्य जॉईन करा....* #💑कपल कॉमेडी 😜
sunita joge
516 views
1 months ago
माता रमाई माता रमाईच्या जयंती दिनी / स्मृतिदिनी माता रमाईचे जीवनपट त्यांचे कष्टमय व त्यागमय जीवनाचा लेखाजोगा मांडला जातो. त्यामुळे माता रमाईला त्यांच्या लेकरांप्रती अभिमान वाटत असावा. परंतु माता रमाईला याचेही दुःख वाटत असावे की, त्यांनी त्यांच्या लेकरांना संदेशपर महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या नाहीत. त्यांना वाटत असावे की ,मी बाई अडाणी ,माझ्या या शिकल्या सवरल्या लेकरांना काय संदेश देणार? ज्या प्रज्ञासूर्याला, युगंधर युगप्रवर्तकाला, संविधानाच्या निर्मात्याला, बोधिसत्वाला, नव कोटी लेकरांच्या उद्धार करता बाबासाहेबांना घडविण्यासाठी मी एवढे कष्ट सोसले एवढा त्याग केला. त्या महामानवाचेही हे लेकरे ऐकित नाही. आम्हा दोघांना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेऊन नाचतात. माता रमाईच्या त्याग्याची कष्टाची केवढी मोठी ही विटंबना? असेही माता रमाईला वाटत असावे. नाही का? कष्टमय ,त्यागमय जीवन आम्हा लेकरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी तर माता रमाईने बाबासाहेबांना घडवण्यासाठी त्यांची सावली बनून कष्ट सोसले, त्याग केला. "कष्टlशिवाय फळ नाही आणि त्यागाशिवाय मोल नाही". हे रमाईच्या जीवनातील ब्रीदवाक्य. माता रमाईने ज्या गुणांच्या आधारे कष्टमय त्यागमय जीवन जगून बाबासाहेबांना घडविले. ही गुण माझ्या शिकल्या सवरल्या लेकराने समजून स्वतःमध्ये त्या गुणांचा विकास करावा हीच अपेक्षा माता रमाई तिच्या लेकराकडून या जयंतीदिनी/ स्मृतिदिनी करत असावी. प्रतिकूल व कठीण परिस्थितीपुढे लाचारी न पत्करता, खचून न जाता, धैर्य, अप्रमाद, संयम, दृढ संकल्प ,अधिष्ठान, वीर्य, शिल, व्यवहारचतुर्य, ,काटकसर, जाज्वल स्वाभिमान, विश्वास, कारुण्य, दान, क्षमाशिल, कष्ट आणि त्याग या सदगुणांच्या आधारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिला अनुकूलतेत परावर्तित करणाऱ्या मातेचे नाव रमाई आहे. रमाईतील हे गुण अंगीकारून तसे आचरण करणे हेच आजच्या दिनी माता रमाईला खरी आदरांजली ठरेल . हे गुण असे आहेत की त्यांची प्रासंगिकता कधी संपत नाही .काळ वेळ मात्र बदलतो, परिस्थितीत बदल होतो. हे गुण प्रत्येक व्यक्तीत आहेत ;तुमच्या आमच्यात आहेत. त्यांच्या विकास करून जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर या गुणांचे आधारे मात करता येते . माता रमाई बालपण जगल्याच नाही. तारुण्यातील स्वप्नेही रंगविले नाही. परिस्थिती पुढे लाचारी पत्करली नाही. खचून गेल्या नाही. मोठा धैर्याने, संयमाने व अप्रमादने ,शील संपन्नता, दृढ संकल्प, अधिष्ठान, वीर्य, कारुण्य, क्षमाशील ,दान, विश्वास ,शील संपन्नता, व्यवहार चातुर्य, काटकसर, जाजवल स्वाभिमान, कष्ट आणि त्याग . रमाईच्या सद्गुनामुळे प्रज्ञासूर्य, युगंधर युगप्रवर्तक, संविधान निर्माते ,बोधिसत्व, नऊ कोटी लेकरांचे उद्धार करते बाबासाहेब घडू शकले. आम्हा लेकरांच्या प्रतिष्ठेच्या जीवनासाठी व सुखासाठी ज्या मातेने कष्ट सोसले, सुखाचा त्याग केला त्या मातेकडून आम्हा लेकरांकडून काय अपेक्षा असेल? आम्ही देखील सुखाचा त्याग करावा का? की सदगुणांचा विकास करावा? आमच्या जीवनाचे उद्देश काय आहे? आम्हाला जीवनात काय हव आहे? प्रत्येकाला त्याच्या जीवनात सुख हव आहे. आम्हा लेकरांच्या प्रतिष्ठेच्या जीवनासाठी व सुखासाठीच माता रमाईने कष्टमय/ त्यागमय जीवन जगून बाबासाहेबांना घडविले. बाबासाहेबांनी आम्हा लेकरांच्या प्रतिष्ठेसाठी व सुखासाठी संपूर्ण आयुष्य चंदनापरी झिजून आमच्या जीवनाला सुगंधित केले. या भारत देशाला सर्वोत्कृष्ट असा संविधान आणि आम्हा लेकरांना; श्रेष्ठतम व सर्वोत्तम जीवन मार्गाची शिकवण असलेला बौद्ध धम्म दिला. व माता रमाईला दिलेला शब्द पाळला. एक नवीन पंढरपूर निर्माण केले व आमच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्यात. श्रेष्ठतम व सर्वोत्तम बौद्ध जीवन मार्गाने सुखप्राप्तीसाठी आम्ही सदाचाराचे अनुसरण केले पाहिजे व काही गोष्टींचा /दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे. जसे :- अज्ञान, मिथ्या संकल्प, मिथ्याधारणा, मिथ्या समजुती, विकार ( काम तृष्णा, भव तृष्णा ,विभव तृष्णा), आश्रवे (दहा प्रकार ). आळस, दारिद्र्य ,लाचारी, दैन्यवसता हे देखील आमच्या सुखासाठी बाधा आहेत. कष्टाशिवाय फळ नाही .त्यामुळे या बाधांवरती मात करून दारिद्र्य, लाचारी ,दैन्यवस्था घालविण्यासाठी कोणतेही कष्ट सोसण्याची आमची तयारी असली पाहिजे. शेवटी कष्टविना फळ नाही त्यागविना मोल नाही एवढे लक्षात असू द्यावे . माता रमाई यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. #☸️जय भीम
See other profiles for amazing content