JKK_Weekly_News_Bulletin

Jagdish Kashikar
358 views
7 days ago
#JKK_Weekly_News_Bulletin https://whatsapp.com/channel/0029Vb64N5p9sBI16v1P001d/433
Jagdish Kashikar
373 views
21 days ago
#JKK_Weekly_News_Bulletin रुपाली चाकणकर ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. माझाच एक मित्र आहे, रुपाली चाकणकरच्या पोस्टवर त्यांनी वात्रट कमेंट केली होती.तर या बाईने त्याला लॉकडाऊन काळात पुणे पोलीस पाठवून जालन्यातून उचलून शिवाजीनगर कोर्टात हजर केले होते. त्याचा नवाच मोबाईल पोलीसांनी जप्त केला. अशा कित्येक जणांवर रूपाली चाकणकरने पक्षाची आणि पदाची ताकद वापरून कारवाई केली आहे. क्षुल्लक गोष्टीही या बाईने कधी दुर्लक्षित केल्या नाहीत. अजित पवार होते तोपर्यंत सगळं चालून जात होतं.सगळे लाड पुरवले जात होते. वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांनीच या बाईला पाठीशी घालून वाचवले होते. आज वाचवायला कुणी नाहीतर चौकशीला सामोरे जायची भिती वाटत आहे.आणि जेव्हा खरातचे कांड बाहेर आले तेव्हा याच बाईने आपण खरातला शिक्षेपर्यंत पोहचण्यासाठी संपूर्ण सहकार्य करू अशी थाप मारली होती. एवढं लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांवर येते, सगळ्यांचे दिवस पालटतात.निसर्गाचा नियम हा आहे की सावली एकाच जागी कधीच टिकून राहत नाही.आपल्या चलतीच्या, सत्तेच्या काळात माज केलेली लोकं जेलमध्ये सडत आहेत. रुपाली चाकणकर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की ताकदीचा वापर कसा करू नये.
Jagdish Kashikar
539 views
1 months ago
#JKK_Weekly_News_Bulletin इराणी शिया राजवटीची रचना, पर्शियन शिया राष्ट्रवाद आणि अंतर्गत बंडाळीच्या शक्यतांची "रिजिम चेंज विंडो" (ICRR Shia Sunni Conflict) ज्येष्ठ पत्रकार विनय जोशी यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. इराण एक विचित्र प्रकरण आहे. अमेरिकन, इस्रायली योजनेनुसार "डीकॅपीटेटिंग स्ट्राईक्स" करून शीर्ष नेतृत्व मारून देशात बंडाळी घडवायची आणि शिया राजवटीला उखडून लोकशाही आणायची ही योजना यशस्वी होईल का हे कळण्यासाठी आधी या राजवटीची रचना जाणून घ्यावी लागेल. इराणी राजवट "शिया धार्मिक नेतृत्वाच्या" घट्ट चौकटीत बांधलेली एक लोकतांत्रिक रचना आहे. कट्टर शिया मुस्लिम मौलवी आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेले अध्यक्ष, मंत्रिमंडळ अशी बहुधा जगातील एकमेव व्यवस्था असावी. या सगळ्याच्या वर असलेल्या सर्वोच्च धर्मगुरूला "राहबर" म्हणजे "दिशादर्शक" म्हणतात, नुकताच मारला गेलेला आयातुल्ला खामेनी राहबर होता. शिया धर्मगुरुच्या नेतृत्वाखाली ८८ जणांची तज्ञ समिती ज्यात सदस्याला ८ वर्षांचा कार्यकाळ मिळतो. त्याच्यासोबत एक १२ जणांची पालक परिषद ज्यात ६ मौलवी आणि ६ न्यायाधीश असतात. याच्या खाली सर्वोच्च नेत्याने नेमलेली एक लवाद समिती आहे ती पालक परिषद आणि संसद यांच्यातील मतभेद सोडवते, याचा अध्यक्ष सादिक अर्दशीर लार्जियानी सध्या एक मजबूत इराणी नेतृत्व म्हणून पुढे आला आहे. हा अमेरिकेच्या मदतीने बंड करून सत्ता ताब्यात घेऊ शकतो अशी चर्चा आहे. इराणी लोकशाही रचना! यात जनतेतून निवडून आलेला राष्ट्रपती आणि संसद येते, दोन्हींची मुदत ४ वर्षांची असते आणि १८ वर्षांवरील इराणी यात मतदान करतात. राष्ट्रपती देशाचा दैनंदिन कारभार, संरक्षण आणि विदेश नीती बघतो. आणि सैन्याचा ताबा त्याच्याकडेच असतो अर्थात यात "राहबर" खूप मोठी भूमिका बजावतो. राष्ट्रपती इराणी सैन्य आणि अन्य सशस्त्र संघटनांचा संचालक असला तरी इथेही राहबरची भूमिका मोठी आहे. यात १९७९ च्या आधीपासूनची इराणी सेना जिला "अर्तेश" म्हणतात अशी सुमारे सव्वा चार लाख सैनिकांची खडी सेना आहे. या व्यतिरिक्त "इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर" आयआरजीसी ही १९७९ नंतर इस्लामी क्रांतीच्या रक्षणासाठी विशेषत्वाने तयार केलेली विशेष सेना आहे, यांची संख्या सुमारे २ लाख आहे. या गार्ड्सच्या हातात इराणी आण्विक, मिसाईल आणि ड्रोन प्रोग्राम आहे, पारंपरिक सैन्याच्या पेक्षा गार्ड्स सर्वोच्च नेत्याच्या जवळचे आणि घातक आहेत. यांच्याच हातात दोन स्पेशल फोर्सेस संघटना आहेत; देशांतर्गत होणाऱ्या बंडाळ्या, आंदोलने, असंतोष यांना दाबून ठेवणं याच्यासाठी "बासीज मिलिशिया फोर्सेस" आहेत आणि इराणच्या बाहेरील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी "कुदस् फोर्सेस"! कुदस् फोर्सेसची प्रादेशिक भूमिका... कुदस् फोर्सेस इराणी शिया राजवटीच्या प्रादेशिक, भौगोलिक नीतीला प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचा माजी प्रमुख जनरल कासीम सुलेमानी याने कुदस् फोर्सेसना एक मोठी ओळख निर्माण करून दिली होती आणि त्यामुळे त्याचा येमेन, पर्शियन गल्फ ते इस्रायल असा मोठा दरारा होता. सुलेमानीच्या काळात कुदस् फोर्सेसनी गाझा, पॅलेस्टिनी हम्मास आणि लेबनॉन मधील हिजबुल्ला यांचा प्रचंड विस्तार निर्माण करून दिला. शिवाय सुलेमानीमुळे सिरिया आणि इराक मधील शियांना एक धार आली. इराण आणि खामेनीच्या जियोपॉलिटिकल आशा- आकांक्षा जनरल सुलेमानीने कुदस् फोर्सेसच्या माध्यमातून येमेन, इराण ते गाझा, लेबनॉन प्रदेशात पसरवल्या. त्यामुळेच जानेवारी २०२० मध्ये जनरल कासीम सुलेमानी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेला तेव्हा अख्खा इराण हादरला आणि त्याच्या दफनाला दहा लाखापेक्षा जास्त लोक जमले होते. अशाप्रकारे इराणी शिया राजवट ही बहुस्तरीय आहे, त्यामुळे तिच्या नेतृत्वाला संपवुन अख्खी राजवट पत्त्याच्या बंगल्यासाठी कोसळण्याची शक्यता धूसर आहे. इराणी धार्मिक प्रभावक्षेत्र, शिया पर्शियन इस्लामी राष्ट्रवाद आणि सत्ताबदलाचे अमेरिकन इस्रायली दिशाहीन प्रयत्न! इराण हा शियांचा सगळ्यात मोठा देश आहे. पर्शियन आखाताच्या पलीकडे असलेल्या सुन्नी अरबांच्या तुलनेत शिया इराणी स्वतःला श्रेष्ठ मानतात आणि आम्ही अरब नव्हे तर पर्शियन आहोत हे आवर्जून सांगतात. सांस्कृतिक बाबतीत पर्शियन संस्कृती हिंदूंसारखीच प्राचीन आहे, त्याचाही इराणी समाजाला अभिमान वाटतो. याचा एकत्रित परिणाम म्हणून इराणमध्ये आपण प्राचीन पर्शियन संस्कृतीचे घटक आहोत हे मानणारा पर्शियन राष्ट्रवाद आणि जगातील सगळ्यात मोठे शिया राष्ट्र आहोत हा इस्लामी धर्मवाद अशा दोन घट्ट बंधनांनी इराणी राष्ट्र बांधलेलं आहे. थोडक्यात काय तर इराणी समाज एकाचवेळी पर्शियन आणि शिया राष्ट्रवाद मानतो. इराणी शिया राजवटीच्या कट्टर इस्लामी उपद्व्यापामुळे त्रस्त प्रजा बऱ्यापैकी असली तरी त्यात काही बदल करण्यासाठी सुन्नी अरब देशांच्या मदतीने यहूदी इस्रायल, ख्रिश्चन अमेरिका असे येणार असतील तर त्यांच्याशी हातमिळवणी करून शिया राजवट पाडायला मदत करायला सामान्य इराणी तयार नाही. मागच्या काही वर्षात दोनदा झालेल्या सामाजिक आंदोलनात इराणी जनता रस्त्यावर आल्याची दृष्य दिसत होती त्यापैकी जानेवारी मध्ये झालेल्या आंदोलनात मोसाद, सीआयए यांनी आणलेले पाकिस्तानी, कुर्द आणि अझेरी यांचाच भरणा जास्त होता. त्यामुळे त्याच्या आधारावर सत्ताबदल शक्य झाला नाही. यावेळी सत्ताबदलाच्या प्रयत्नात पहिल्याच दिवशी एका मुलींच्या शाळेवर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात दोनशे कोवळ्या मुली मारल्या गेल्याने आणि आता अमेरिकन, इस्रायली सैन्य सरसकट नागरी वस्त्यांवर मोठे हवाई हल्ले करत असल्याने शिया राजवटीच्या विरोधात उघडू पाहत असलेली छोटी "विंडो" सुद्धा बंद होत आहे. शिया राजवटीचे प्रखर विरोधक, विदेशात राहणारे जे इराणी अमेरिकन कारवाईला समर्थन देत होते, ते ही पहिल्याच दिवशी शाळकरी मुलींच्या कत्तलीने अचानक आपली दिशा बदलते झाले. इतक्या महत्त्वाचा उद्देश घेऊन युद्धात उतरलेल्या इस्रायल, अमेरिकेने इतकी मोठी चूक का केली असेल हा प्रश्न आहे. काल झालेल्या हवाई हल्ल्यात मध्य पूर्वेतील काही मोठ्या स्टेडियम पैकी एक तेहरान मधील १४,००० प्रेक्षक क्षमतेचं आझादी स्टेडियम भुईसपाट झालं आहे. या दोन घटना इराणी राजवटीने जगभर हातोहात पसरवून प्रोपगंडा फ्रंट वर मोठी आघाडी घेतली आहे. यात भर म्हणून खामेनीच्या हत्येची घटना! खामेनी सर्वोच्च इराणी शिया नेता होता तरी इस्लामी कोडची सक्ती करताना तिथले बासीज मिलिशिया, मोरॅलिटी पोलिस जे अत्याचार नेहमी करतात (अश्या बातम्या आपण वाचतो) त्याबद्दल थेट खामेनीला दोष देणारी प्रजा किती असेल हा एक प्रश्न आहे. यामुळे खामेनीच्या हत्येचा इराणी उठाव घडवून आणायला उपयोग होण्याऐवजी शिया पर्शियन इस्लामी राष्ट्रवाद अजून मजबूत होण्यासाठी त्याचा इराणी राजवटीला उपयोग झाल्याचं चित्र आहे. इराणी शिया राजवट जुलमी नाही असं म्हणायचं काही कारण नाही पण जागतिक राजकीय, सांस्कृतिक विरोधकांना बदनाम करण्यासाठी पाश्चिमात्य बुद्धिजीवी आणि मिडिया काय पातळीचा अपप्रचार करतो हे आपल्याला माहीत आहे, जसा कंबोडियन हुकूमशहा पॉलपॉट चष्मा लावणाऱ्या कंबोडियन माणसांना पकडून गोळ्या घालायचा; उत्तर कोरियाचा किम जोंग ऊन नाराज झाला की स्वतःच्या सैन्य अधिकाऱ्यांना सरळ मगरीने भरलेल्या तळ्यात टाकून मारतो. किंवा ब्रिटिशांनी भारताची केलेली अर्धनग्न गारुड्यांचा देश ही तयार केलेली प्रतिमा किंवा गुजरातच्या दंगलीत हजारो मुस्लिम महिलांवर हिंदुत्ववाद्यांनी बलात्कार केले वगैरे पेरलेल्या बातम्या! शिया क्रेसेंट आणि मध्य पूर्वेतील इराणच्या बाहेरील इराणी प्रभावक्षेत्र! येमेन पासून इस्रायल पर्यंत पसरलेल्या सर्व शियांना आपल्या राजकीय, धार्मिक आणि सैनिकी प्रभावात आणून इस्रायल आणि अमेरिकेला आणि त्यांच्या सुन्नी अरब साथीदारांना दाबात ठेवायचं अशी इराणची महत्त्वाकांक्षा आहे. त्याला ॲक्सिस ऑफ रेजिस्टन्स म्हटलं जातं. हे शिया प्रभावक्षेत्र येमेन, बहारीन, इराण, इराक, सिरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन या भागात पसरलेलं आहे आणि ते नकाशात साधारण चंद्रकोरीच्या आकाराचं दिसतं म्हणून त्याला शिया क्रेसेंट नावाने ओळखलं जातं. इराणी शिया राजवटीच्या जियोपॉलिटिकल महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्यामुळे विविध शत्रु त्यांनी निर्माण केलेले आहेत. या महत्त्वाकांक्षांमुळे इराणचे इस्रायल, येमेन, सौदी, अमिरात, अमेरिका यांच्याशी वितुष्ट आहे. त्याचा आढावा घेतल्याशिवाय सध्याच्या युद्धाची कारणे आणि इराणी रिजिम चेंज सामोरी आव्हाने याचा अंदाज लागणार नाही. १) येमेनी शिया हौती बंडखोर! बाब अल मांदेबच्या म्हणजे एडनच्या आखाताच्या उजव्या बाजूला येमेन आहे. इथून रेड सी मधून सुवेझ कालव्यातून येणारीं जहाजे अरबी समुद्रात येतात. येमेनच्या लोकसंख्येत ६५% सुन्नी आणि ३५% शिया हौती आहेत. या भांडणात इराणने हौती बंडखोरांना रसद पुरवून तिथल्या सुन्नी सरकार विरोधात बंडखोरी केली आहे. सुन्नी सरकारच्या बाजूला सौदी, अमिरात, अमेरिका आणि इस्राएल आहेत पण त्यातून नंतर अमिरात बाहेर पडली. इराणी शिया राजवट संकटात आली की हे हौती बंडखोर रेड सी मधून जाणाऱ्या जहाजांवर रॉकेट डागतात त्यामुळे इस्रायल, अमेरिका आणि युरोपियन जहाजांना इथे विशेष त्रास दिला जातो. आत्ता इराण युद्ध सुरू झाल्यावर जशी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करून अरब देशांची नाकाबंदी केली तशीच बाब अल मांदेब मध्ये इराणसाठी हे शिया हौती बंडखोर करतात. २) हम्मास! पॅलेस्टिनी अतिरेकी गट हम्मास हा सुन्नी असला तरी त्याला इराण समर्थन देतो. इस्रायल विरोधात शस्त्र, प्रशिक्षण, पैसा आणि नैतिक समर्थन देऊन देऊन इराणने ७ ऑक्टोबरचा हल्ला घडवला असा आरोप आहे. त्या हल्ल्यामुळे इराण इस्रायल दरम्यान असलेलं शीतयुद्ध थेट युद्धापर्यंत पोचायचा मार्ग मोकळा झाला होता. ३) हिजबुल्ला! इराणचा शेजारी असलेल्या लेबनॉन मधील एक राजकीय पार्टी हिजबुल्ला ही एकाचवेळी राजकारण करते आणि इस्राएल सोबत सैनिकी संघर्ष सुद्धा करते.शिया मुस्लिम हिजबुल्ला इस्रायल विरोधात सतत आतंकी कारवाया करत असते. गोळीबार, इस्रायली सैनिकांच्या हत्या, रॉकेट हल्ले हे नित्याचेच आहेत. यांना इराण उघड मदत देतं. जनरल कासीम सुलेमानी याने आपल्या अफाट नेटवर्कच्या आधारावर ह्या आतंकी प्रॉक्सीज एक घातक मिलिटरी फोर्स म्हणून उदयाला आणलेल्या आहेत. ४) हषद् अल शाबी आणि कतइब अल हिजबुल्ला! या सगळ्या गटांना पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस आणि इस्लामिक रेजिस्टन्स इराक म्हणतात. इराक आणि सिरिया मधील या आतंकी संघटना इराणी हितांसाठी आणि इराणी प्रभावाच्या रक्षणासाठी या भागात अफाट उपद्रव निर्माण करतात. खामेनी यांच्या हत्येनंतर इराकमधील अमेरिकन एम्बसी, उत्तर इराक मधील एर्बिल येथील अमेरिकन बेस आणि अमेरिकन कंपन्या यांच्यावर जे भीषण हल्ले झाले ते या गटांनी केले. या सर्व संघटना शिया क्रेसेंट भागात आणि उत्तर अरबी समुद्र, रेड सी ते इस्रायल या भागात इराणी प्रभावक्षेत्र वाढवायला सक्रिय सशस्त्र भूमिका बजावतात. त्यामुळे "डीकॅपीटेटिंग स्ट्राईक्स" च्या योजनेचा फोलपणा इथे उघडा पडतो! अमेरिका, इस्रायलला सध्या उपलब्ध रिजिम चेंज विंडो! आपण वर बघितल्याप्रमाणे खुद्द इराणमध्ये गुंतागुंतीची बहुस्तरीय धार्मिक, राजकीय हायब्रीड अशी शासनव्यवस्था आहे. ती थिओक्रॅटिक पण आहे आणि डेमोक्रेटिक पण आहे, शिवाय एक देश म्हणून इराण प्राचीन पर्शियन राष्ट्रवादाच्या पायावर उभा आहे आणि त्याला आता शिया इस्लामी अस्मितेची मजबूत धार आहे. शिवाय अमेरिकन, यहुदी आणि सुन्नी अरब हे पर्शियन शिया राष्ट्राला संपविण्यासाठी एकत्र आले आहेत हे त्यांनी देशाला पटवून देण्यात यश मिळवलेलं आहे आणि इराणच्या बाहेरच्या विविध वांशिक, भाषिक शिया समुदायांना ख्रिश्चन, यहूदी, सुन्नी युती शियांना संपवायला एकत्र आली आहे हे पटवून देण्यात यश मिळवलं आहे. यामुळे काही डझन इराणी धार्मिक, राजकीय, सैनिकी नेते मारून तिथे सत्ता पालट करणं आजघडीला अवघड आहे. त्यातून गार्ड्स मधील एखादा ताकदवान नेता अमेरिकेच्या हातास लागला आणि तो सैन्याच्या मोठ्या भागाला आपल्यासोबत घेऊन येऊ शकला तरच इराणमध्ये सध्याच्या घडीला रिजिम चेंज होऊ शकते. पण सध्या ही शक्यता धूसर दिसते. त्यामुळे, "रिजिम चेंज विंडो" इथे बंद झालेली आहे. पण.... पूर्व इराण मधील सिस्तान बलुचिस्तान मधील जैश अल अदल सारखे सुन्नी बलुच गट आणि उत्तर पश्चिम इराणच्या इराक सीमेवरील कुर्द पेशमर्गा गट हातास लागले तर ही "रिजिम चेंज विंडो" परत उघडू शकते, ती कशी हे पुढच्या भागात बघूया...
Jagdish Kashikar
533 views
2 months ago
#JKK_Weekly_News_Bulletin https://whatsapp.com/channel/0029Vb64N5p9sBI16v1P001d/433
Jagdish Kashikar
540 views
2 months ago
#JKK_Weekly_News_Bulletin *माझ्या व्यथा मी सांगू कोणाला* *फुलांनीच माझा घात केला* *ज्यांना मी काटे समजलो तेच आले मदतीला!* *ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !* https://manganga.in/?p=18620+++++++++ https://www.shirdiexpress.com/2026/02/blog-post_17.html++++++++++ आयुष्यातले सांगाती ४६ – नीतिन केळकर ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत https://manganga.in/?p=18618+++++++++ https://whatsapp.com/channel/0029Vb64N5p9sBI16v1P001d/433
Jagdish Kashikar
565 views
2 months ago
https://whatsapp.com/channel/0029Vb64N5p9sBI16v1P001d/433 #JKK_Weekly_News_Bulletin
Jagdish Kashikar
583 views
2 months ago
https://whatsapp.com/channel/0029Vb64N5p9sBI16v1P001d/433 #JKK_Weekly_News_Bulletin
Jagdish Kashikar
516 views
2 months ago
#JKK_Weekly_News_Bulletin ... असा साजरा झाला पहिला प्रजासत्ताक दिन उमेश काशीकर यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी भारत सर्वार्थाने स्वतंत्र व आत्मनिर्भर झाला. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी देखील संविधान तयार होईपर्यंत भारत ब्रिटनचे स्वतंत्र अधिराज्य (dominion) होता. दिनांक २४ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना समितीची शेवटची बैठक झाली. बैठकीत डॉ राजेंद्र प्रसाद यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून सर्वसंमतीने निवड झाली. दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी सकाळी साडेदहा वाजता 'गव्हर्मेंट हाऊस' नवी दिल्ली (कालांतराने त्याचे नाव 'राष्ट्रपती भवन' झाले) येथील दरबार हॉल येथे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश न्या. सर हरिलाल कानिया यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. राष्ट्रपतींना यावेळी ३१ बंदुकींची सलामी देण्यात आली. आपली शपथ झाल्यावर राष्ट्रपतींनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, ज्यांनी राष्ट्रपतींना शपथ दिली ते सरन्यायाधीश न्या. कानिया आणि लोकसभेचे अध्यक्ष यांना प्रजासत्ताक शपथ दिली. *मुंबईतील प्रजासत्ताक दिन* भारत प्रजासत्ताक झाला त्यावेळी मुंबई प्रांताचे राज्यपाल होते राजा महाराज सिंह. देशाने राज्यघटना स्वीकारल्यामुळे राज्यपाल हे सार्वभौम अश्या प्रजासत्ताकाचे प्रतिनिधी झाले होते. त्यामुळे सर्वच राज्यपालांना शपथ घेण्याचे सांगण्यात आले होते. दिनांक ७ जानेवारी १९५० रोजी केंद्र शासनातर्फे 'द कॉन्स्टिट्यूशन : रिमुव्हल ऑफ डिफिकल्टीज ऑर्डर' हा आदेश विशेषत्वाने जारी करण्यात आला. त्यानुसार मुख्य न्यायमूर्तींना राज्यपालांना पदाची शपथ देण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले. दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी 'टाऊन हॉल' म्हणजे आजचे एशियाटिक सोसायटीचे सभागृह येथे सकाळी दहा वाजता झालेल्या या पहिल्या प्रजासत्ताक शपथविधी सोहळ्यात सुरुवातीला राज्यपालांनी राज्यघटनेची उद्देशिका वाचली. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती न्या. एम सी छगला यांनी राज्यपाल राजा महाराज सिंह यांना राज्यघटनेनुसार नवी शपथ दिली. राज्यपालांना त्यावेळी १७ बंदुकीची सलामी देण्यात आली. याच सोहळ्यात राज्यपालांनी मुख्यमंत्री बी जी खेर, त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना व न्या. छगला यांना राज्यघटनेनुसार शपथ दिली. *मुंबईत जल्लोष* त्यावेळच्या वृत्तपत्रानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी प्रभातफेऱ्या काढण्यात आल्या, सर्वत्र राष्ट्रभक्तीपर गाणे वाजवण्यात येत होते. रस्त्यांवर गर्दी होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत लोकांचा जल्लोष सुरु होत्या. लोक गाड्यांचे हॉर्न वाजवत होते. *ब्रेबॉर्न स्टेडियम येथे परेड आणि संचलन* प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी राज्यपाल राजा महाराज सिंह आणि राणी महाराज सिंह यांना मिलिटरी कॉन्व्हॉयने राजभवन येथून ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या समारंभीय परेडसाठी नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांनी परेडचे निरीक्षण केले व मानवंदना स्वीकारली. अश्या प्रकारे पहिलावहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि प्रजासत्ताकाची वाटचाल सुरु झाली. भारतीय राज्यघटनेने देशाला आणि जनतेला लोकशाही मूल्यांवर आधारित एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळख दिली. राज्यघटनेने नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांची हमी दिली. राज्यघटनेने मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि शासनव्यवस्थेची रचना प्रदान करून देशाला एकसंध राखण्यात मोलाचे योगदान दिले आहे. https://whatsapp.com/channel/0029Vb64N5p9sBI16v1P001d
Jagdish Kashikar
550 views
3 months ago
#JKK_Weekly_News_Bulletin मुंबईत काँग्रेसला मिळालेले यश समाधानकारक, विपरित परिस्थितीतही कार्यकर्ते निर्धाराने लढले व जिंकले - सचिन सावंत ऑपरेशन कमळची भिती आता भाजपाच्या मित्रपक्षांना, विजयी नगरसेवक लपवण्याची शिंदेसेनेवर वेळ.. जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर साम, दाम, दंड, भेद नितीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतानाही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निर्धाराने व न डगमगता लढले व विजय मिळवला. अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत मिळालेले यश मोठे नसले तरी समाधानकारक आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देऊ, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. राजीव गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांना संपवण्याचे काम करत आहे. विरोधी पक्षातील उमेदवार पळवणे, पक्ष फोडणे, विरोधी पक्षाला कोणतीच मदत मिळू नये, निधी मिळू नये असे सर्व प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले. अनैतिक वातावरणातही काँग्रेस पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते तग धरून उभे राहिले, निकराने लढले. काँग्रेसने १५२ उमेदवार उभे केले होते त्यातील २४ निवडून आले आहेत. महानगरपालिका निवडणुकीतील या निकालाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हुरुप ढलेलेला नाही, हा विजय ऊर्जा देणारा आहे, पुन्हा नव्या ताकदीने व जिद्दीने लढू, आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू तसेच निकालाचे विश्लेषण करु. लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई यापुढेही लढत राहू. ऑपरेशन कमळ करुन भाजपाने विरोधी पक्ष फोडले पण आता या ऑपरेशन कमळची भिती भाजपाच्या मित्रपक्षांनाही वाटू लागली आहे. ऑपरेशन कमळच्या भितीनेच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे विजयी नगरसेवक लपवावे लागत आहेत, असेही सचिन सावंत म्हणाले.. एका प्रश्नाला उत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी संदर्भात जो आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे, त्यांना हव्या असेलल्या जागा दिल्या, त्यांना उमेदवार मिळाले नाहीत, काही जागांवर मैत्रिपूर्ण लढावे लागले. दोन्ही बाजूकडून अधिक चांगल्या प्रकारे नियोजन झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे सचिन सावंत म्हणाले.
Jagdish Kashikar
672 views
3 months ago
#JKK_Weekly_News_Bulletin *आणि सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी झाले मुंबईचे पहिले ऍक्टिंग गव्हर्नर* उमेश काशीकर यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी - आणि त्यानंतर तब्बल पाच महिने - मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते जॉन कॉलव्हिल ! कॉलव्हिल हे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर होते. त्यांनाच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुंबई राज्यासाठी भारतीय गव्हर्नरची नियुक्ती होईपर्यंत पदभार सांभाळण्यास सांगण्यात आले होते. आजचे 'लोकभवन' त्यावेळी 'राजभवन' देखील झाले नव्हते. तर ते होते 'गव्हर्मेंट हाऊस' ऑफ बॉम्बे ! ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर १९४७ मध्ये गव्हर्नर जॉन कॉलव्हिल यांना तातडीची इंग्लंडला जाणे आवश्यक झाले. कॉलव्हिल यांची बहीण लेडी अरस्किन - हिल हिची प्रकृती गंभीर असल्याचा निरोप आला आणि त्यामुळे कॉलव्हिल यांना इंग्लंडला लगेचच जाणे भाग पडले. कॉलव्हिल यांनी गव्हर्नर - जनरल लॉर्ड माऊंटबॅटन (स्वातंत्र्यानंतर काही महिने ते देखील होतेच !!) यांचेकडे रजेची विनंती पाठवली व त्यांनी देखील ती लगेच मान्य केली. दहा दिवसांची रजा होती व कॉलव्हिल यांना कराची मार्गे लंडनला जायचे होते. ही रजा कदाचित वाढू देखील शकते असा विचार करून रजेच्या कालावधीत मुंबईसाठी हंगामी गव्हर्नर (ऍक्टिंग गव्हर्नर) नेमणे सरकारला आवश्यक वाटले. *नियुक्ती करावी कुणी !* ब्रिटिश शासनकाळात गव्हर्नरची नियुक्ती ब्रिटिश 'क्राऊन' म्हणजे सम्राटांकडून (त्यावेळी जॉर्ज सहावे) होत असे. परंतु भारत स्वतंत्र झाल्यामुळे आता हंगामी गव्हर्नरची नियुक्ती करणे राजे जॉर्ज सहावे यांना शक्य नव्हते. त्यामुळे ऍक्टिंग गव्हर्नरच्या नियुक्तीचा चेंडू पुन्हा गव्हर्नर - जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या कोर्टात येऊन पडला ! कुणाला ऍक्टिंग गव्हर्नर नेमायचे ते तुम्हीच ठरवा !! लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेशी सल्लामसलत केली व कॉलव्हिल यांच्या रजेच्या कालावधीत उद्योगपती व टाटा समूहाचे संचालक सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी (Sir Hormasji Peroshaw Mody) यांना मुंबई प्रांताचे हंगामी गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्याचे ठरले. *शपथ कोणती घ्यावी !* नियुक्ती कुणाची करावी हे ठरले. पण लगेच दुसरा प्रश्न उद्भवला. शपथ घ्यायची कोणती ? राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया सुरु होती. भारत अजूनही इंग्रजांचे 'स्वतंत्र अधिराज्य' (Independent Dominion) होते. केंद्र सरकारकडे लगोलग विचारणा केली गेली. केंद्र सरकारच्या विधी विभागाने ऍक्टिंग गव्हर्नरच्या शपथेचा एक मसुदा तयार करून मुंबईला पाठवून दिला. त्यानुसार सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी यांनी मुंबईच्या हंगामी गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारला. ही शपथ एकदा वाचावी ! *शपथेचे प्रारूप :* 'I, Hormasji Peroshaw Mody, do swear that in the office of Governor of Bombay I will be faithful and bear true allegiance to His Majesty King George The Sixth, His Heirs and Successors and to the Constitution of India as by law established and that I will do right to all manner of people after the laws and usages of India without fear or favour, affection or ill - will. So help me God.' म्हणजे शपथेमध्ये एकाच वेळी जॉर्ज सहावे यांच्याप्रती आणि भारताच्या राज्यघटनेप्रती - तोवर राज्यघटना तयार झाली नव्हती तरीही - निष्ठा व्यक्त करण्यात आली. या शपथेनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एम सी छगला यांनी दिनांक ७ सप्टेंबर १९४७ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी यांना गणेशखिंड पुणे येथील 'गव्हर्मेंट हाऊस' येथे ऍक्टिंग गव्हर्नर पदाची शपथ दिली. शपथविधीला मुंबईचे मुख्यमंत्री बी जी खेर व इतर मान्यवर उपस्थित होते. *जॉन कॉलव्हिल यांच्या बहिणीचे निधन; सुटी लांबली !!* दरम्यान ज्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी गव्हर्नर जॉन कॉलव्हिल हे इंग्लंडला रजेवर गेले होते त्या लेडी अरस्किन-हिल यांचे निधन झाले व जॉन कॉलव्हिल यांना रजा वाढवणे आवश्यक झाले ! वाढीव रजा आटोपून जॉन कॉलव्हिल दिनांक २४ सप्टेंबर १९४७ रोजी मुंबईला परत आले व त्यांनी मुंबईच्या गव्हर्नर पदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारला. दिनांक ६ जानेवारी १९४८ रोजी कपूरथाला राजघराण्याचे सदस्य राजा महाराज सिंह यांची मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आणि कॉलव्हिल मायदेशी रवाना झाले. दरम्यान सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी यांची युनायटेड प्रोव्हिन्सचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाल्यावर सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी - त्यांना लोक 'होमी' मोदी म्हणत ) यांना उत्तर प्रदेशचे पहिले राज्यपाल बनवण्यात आले व ते त्यापदावर १९५२ पर्यंत कार्यरत होते.