follow kara

Dr Ramdas Athawale
587 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 02 - आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चार उमेद‌वार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित 122 जागांवर भाजप प्रणित एनडीएला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला असल्याचे अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. गुवाहाटी येथे ईशान्य भारतातील 7 राज्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ना. रामदास आठवले यांनी आसाम विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टीकोन देशभरातील जनतेला आणि आसाममधील जनतेलाही पटलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात मुख्यमंत्री हिमंता बिसवा यानी आसामचा सर्वांगीण विकास केला आहे. पायाभूत सुविधा उभारुन आसामचा वेगवान विकास होत आहे. त्यामुळे आसामची जनता भाजप प्रणित एनडीएला बहुमताने विजयी करेल. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनीही भाजप उमेद‌वाराना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. आसाममधील धींग या विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाचे हिरक ज्योती बोरा तसेच किंगसुकीया विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे इजराईल नंदा, मोरीगाव विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे चेनीराम कोनवार, आणि गौरीपुर विधानसभा मतदारसंघात सैदुर रहमान सरकार हे रिपब्लिकन पक्षाचे चारही उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या गन्ना किसान या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढत आहेत. या चार उमेद‌वारामधुन जे उमेदवार निवडून येतील ते रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा भाजपप्रणित एनडीएला देतील. रिपब्लिकन पक्षाचे जिंकून येणारे उमेदवार सरकार स्थापन करण्यास भाजपला समर्थन देतील अशी अधिकृत घोषणा ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली. ना. रामदास आठवले हे आसामच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणा-या रिपब्लिकन पक्षाच्या चारही उमेद‌वारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. तसेच भाजपच्याही उमेदवारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. आज त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ईशान्य भारतातील पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, त्रिपरा, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपुर या सातही राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. | हेमत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #☸️जय भीम #follow ##Breakingnews ###Politics #RAMDASATHAWALE
Dr Ramdas Athawale
712 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट* नवि दिल्ली दि. 24 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सलग तिस-यांदा आपली राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार मानले. यावेळी ना.रामदास आठवले यांनी निळी शाल आणि पुष्पगुच्छ देवुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. आपल्याला सलग तिस-यांदा राज्यसभेवर संधी देवुन केंद्रीयमंत्रिमंडळात सामाजिक न्यायराज्यमंत्री पदाची संधी कायम ठेवल्याबद्दल देशभरातील आंबेडकरी जनतेत, बहुजन समाजात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. राज्यसभेवर तिस-यांदा आपली निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आणि देशभरातील आंबेडकरी जनतेत आनंद साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी यावेळी अनेक विषयांवर ना.रामदास आठवले चर्चा केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ना.रामदास आठवले यांना आता आपण राज्यसभेत 6 वर्ष रहा आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. देशात जणगणना सुरु आहे त्यात धर्मांतरीत बौध्दांच्या जनगणनेविषयी ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. दिवंगत प्रधानमंत्री व्हि पी सिंग यांच्या काळात महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांना सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. बौध्दांच्या धर्म या रकान्यात बौद्ध आणि जात या रकान्यामध्ये पुर्वाश्रमीच्या जातीच्या अनुक्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. पुर्वाश्रमीच्या महार जातीने महाराष्ट्रात बौध्द धम्मात धर्मांतर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांच्या जनगणनेचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ जातीचा उल्लेख न करता धर्माच्या रकान्यात बौध्द आणि जातीच्या रकान्यात पुर्वाश्रमीच्या अनुसूचित जातीचा अनुक्रमांक 59 हा क्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अनुसुचित जातीच्या यादीत महाराष्ट्रातील महार ही जात 59 क्रमांकावर आहे. जातीचे नाव न लिहीता जातीचा अनुक्रमांक जातीच्या रकान्यात लिहीला पाहिजे अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव आहे. पूर्वी या स्कॉलरशिपमध्ये केवळ भारत सरकारची 10 टक्के रक्कम आणि राज्य सरकारची 90 टक्के रक्कम दिली जात होती. 10 टक्के केंद्र सरकारचा निधी असताना या स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव दिले होते. त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करुन भारत सरकारच्या वतींने देण्यात येणारी स्कॉलरशिप मधील 10 टक्के रक्कम वाढवून 60 टक्के करण्यातआली . त्या स्कॉलरशिप मध्ये आता भारत सरकारचा वाटा 60 टक्के आणि राज्य सरकारचा वाटा 40 टक्के या अशा पध्दतीने भारत सरकार च्या स्कॉलरशिपची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मागील 15 वर्षापासुन या स्कॉलरशिपच्या रक्कम मध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तेव्हा अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या स्कॉलरशिपमध्ये महागाईच्या निर्देशाप्रमाणे वाढ झाली पाहिजे. त्यामुळे स्कॉलरशिपच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर आपण विचार करु असे आश्वासन ना.रामदास आठवले यांना दिले. प्रधानमंत्र्यांनी सदाबहार असा माझा संसदेत गौरवाने उल्लेख केला. तुम्ही मला म्हणत आहात सदाबहार, कारण मी करतो कॉग्रेसवर प्रहार अशी ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्र्यांना आपली शिघ्र कविता यावेळी ऐकवली. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE ##Breakingnews #Politics.... #☸️जय भीम #follow