जळगाव

सनातन सारथी न्युज
879 views
8 days ago
मराठवाड्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ राजकीय नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या जीवनप्रवासावर लवकरच लघुपट; सुरज पवार यांची निर्मिती #breaking news #SanataSarthiNews #Jalgaon District
सनातन सारथी न्युज
571 views
9 days ago
शेठ ला. ना. सा.विद्यालयात शासन निर्देशित "सखी सावित्री" व विशाखा(महिला तक्रार निवारण) समितीची स्थापना. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 शासन निर्देशित "सखी सावित्री" व "विशाखा समितीची"(महिला तक्रार निवारण )स्थापना शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांच्या हस्ते आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्थापना करण्यात आली. या समितीद्वारे मुला - मुलींना सुरक्षितता, निकोप व समाजपूरक वातावरण निर्मिती, दिव्यांग विद्यार्थांची पटनोंदणी व उपस्थिती याकडे लक्ष देणे,शाळाबाह्य विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे,विद्यार्थांच्या भावनिक,बौद्धिक व शारीरिक क्षमताविकास तसेच ताणतणाव मुक्तीसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांचे व पालकांचे समुपदेशन करणे,शासकीय योजनांची माहिती देऊन अंमलबजावणी करणे,विद्यार्थांचे करिअर व कौशल्य विकास,स्वसंरक्षण यासाठी कार्यक्रम आयोजित करणे,आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे,आरोग्य शिबिर,समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन महिलांच्या समस्या सोडविणे, तसेच विद्यार्थांनी , महिला कर्मचारी यासाठी शाळेतील व शाळाबाह्य वातावरण सुरक्षित,निकोप व मैत्रीपूर्ण प्रस्थापित करणे यासारखे उपक्रम आयोजित केले जातील याबाबत मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ रमा तारे मॅडम यांनी मुलींना वयात येताना बदलणारी मानसिक व भावनिक स्थिती यावर मार्गदर्शन केले तर ज्येष्ठ शिक्षिका सौ स्मिता करे यांनी मुलींना येणाऱ्या विविध समस्या याबाबत माहिती दिली. तसेच ज्येष्ठ शिक्षिका तथा "विशाखा समिती प्रमुख" सौ प्राजक्ता गोहिल यांनी विद्यार्थनींना शारीरिक,मानसिक बदलांना सामोरे जाताना येणाऱ्या विविध समस्या यावर समुपदेशन केले. या वेळेस शाळेतील विद्यार्थिनी तसेच महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन "सखी सावित्री समिती प्रमुख" सौ रोहिणी प्रचंड यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका सौ पद्मजा जोशी यांनी केले. या शासन निर्देशित समिती स्थापन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडेसर ,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे सर, पर्यवेक्षिका सौ रमा तारे मॅडम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ संगीता पानट व सर्व महिला कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. #breaking news #SanataSarthiNews #news #Jalgaon District
सनातन सारथी न्युज
687 views
10 days ago
महात्मा फुले हायस्कूल मध्ये जेष्ठ लिपीक जे एस महाजन यांचा सेवापुर्ति सोहळा ! कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिकपणा, अचूक कार्य करणारे लिपीक : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) धरणगांव :शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेतील ज्येष्ठ लिपिक जयराम शिवराम महाजन यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच डी माळी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते.सत्कारमूर्ती जयराम शिवराम महाजन यांच्या समवेत धर्मपत्नी कविता महाजन, मुलगा चेतन महाजन ,भगिनी जिजाबाई महाजन (तळई ) , जनाबाई महाजन ( बामणे ) ,जावई चारुदत्त उमाळे ( पाचोरा ) ,अजिंक्य ,मेव्हणे घनश्याम माळी ( जाधव ) ,वैशाली माळी ( पातोंडे ),साहेबराव देवरे , आशाबाई देवरे ( एरंडोल )उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.शाळेच्या वतीने सत्कारमूर्ती जे एस महाजन यांचा शाल , पुष्पगुच्छ व महात्मा फुले लिखित गुलामगिरी , शिवजयंती चे जनक महात्मा फुले व महात्मा बळीराजा हे अनमोल ग्रंथ व पंढरपूरचे दैवत विठ्ठल - रुक्माई मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली.जयेश महाजन यांनी आपली 35 वर्षे सेवा पूर्ण करून ते शासकीय वयोमानानुसार 31 जुलैला सेवानिवृत्त झाले.कार्यक्रमाला उपस्थित आप्तेष्ट नातलग यांनी देखील सत्कारमूर्ती महाजन यांचा शाल पुष्पगुच्छ कपडे देऊन सत्कार केला. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील, एम बी मोरे, एस व्ही आढावे, एच डी माळी, व्ही टी माळी, ग्रंथपाल गोपाल महाजन, जेष्ठ शिक्षिका एम के कापडणे, कनिष्ठ लिपिक पी डी बडगुजर, मुलगा चेतन महाजन यांनी मनोगतात भाऊसाहेबांचे 35 वर्षातील सेवेचे विविध अनुभव / प्रसंग विस्तृतपणे सांगितले.सत्कारमूर्ती जे एस महाजन यांनी मनोगतात सर्व शिक्षक वृंद हे माझे कुटुंब होते व राहणार, आपल्या जीवनातील विविध प्रसंग सांगून सर्वांचे आभार मानले. कर्तव्यनिष्ठ प्रामाणिकपणा अचूक कार्य करणारे लिपिक आज सेवानिवृत्त होत आहेत असे प्रतिपादन शाळेतील मुख्याध्यापक पवार यांनी केले. जे एस महाजन यांनी संपूर्ण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व स्टाफला मिष्टान्न भोजन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन कोळी तर आभार पी डी पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ लिपिक पी डी बडगुजर, जीवन भोई , अशोक पाटील यांनी अनमोल सहकार्य केले. #SanataSarthiNews #news #breaking news #Jalgaon District
सनातन सारथी न्युज
523 views
10 days ago
पाळधी तरसोद नॅशनल हायवे पावसामुळे एका वर्षातच तो खचला. सामाजिक कार्यकर्ते श्री शिवराम पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करता त्या ठिकाणी दिलेली प्रतिक्रिया. #Jalgaon District #breaking news #SanataSarthiNews
सनातन सारथी न्युज
564 views
10 days ago
भवरखेडे येथे मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी शेतात शिरले; कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात धरणगाव : तालुक्यातील भवरखेडे येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे भवरखेडे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला असून नदी काठावर शेत असलेले शेतकरी युवराज बन्सी माळी व रमेश धुडकू पाटील यांच्या शेतात नदीचे पाणी थेट शेतांमध्ये शिरल्याने या शेतकऱ्यांच्या उभ्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके अनेक तास पाण्याखाली राहिल्याने कापूस झाडांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात लक्षणीय घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर्षी चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच स्वतःची बचत खर्च करून बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, पेरणी व तणनियंत्रण यावर मोठा खर्च केला होता. वेळोवेळी शेतीची निगा राखून पीक जोमात आणले होते. मात्र, अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन पाणी शेतात घुसल्याने काही तासांतच मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पूराचे पाणी ओसरल्यानंतर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून अनेक ठिकाणी कापसाची झाडे आडवी पडली आहेत. काही ठिकाणी मुळे कुजण्यास सुरुवात झाली असून दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास पिकांवर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित तलाठी जीवन कुमार खोकले व कोतवाल महेंद्र पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली असून पुढील आदेश आल्यावर तात्काळ पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. शासनाच्या निकषांनुसार नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचा संपूर्ण अहवाल शासनाचे आदेश आल्यानंतर तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी युवराज बन्सी माळी व रमेश धुडकू पाटील यांनी आपल्या झालेल्या नुकसानीची व्यथा तलाठी जीवन कुमार खोकले यांच्यासमोर मांडली. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी शिरल्याने केवळ कापूसच नव्हे तर इतर खरीप पिकांनाही फटका बसल्याचे चित्र आहे. आधीच वाढलेला शेतीचा खर्च आणि आता झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई जाहीर करावी, पीकविमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई लवकर मिळावी तसेच विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. #SanataSarthiNews #news #breaking news #Jalgaon District #🌾शेती आणि व्यवसाय⚙