शेतात साचले गुडघाभर पाणी, सोयाबीनसह इतर पीकंही गेली वायाला; शेतकरी संकटात
शेतात पाणी साचल्याने वाशिम जिल्ह्यात शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र, शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. त्यामुळे सोयाबीनची काढणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातमध्येच हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिल्यामुळे, पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.