कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका. कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते.
वाईट कर्म करावे लागत नाहीत, तर ते आपोआप घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात.
जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात.
आयुष्यात कशीही वेळ येवो, कुटुंबाची साथ कधीच सोडू नका. सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील.
#🙏 प्रेरणादायक बॅनर #जय श्री कृष्ण
