ShareChat
click to see wallet page
search
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत.. काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत, ते फक्त हळूहळू बदलत जातात आणि त्य़ा बदलामध्येच सगळं उत्तर दडलेलं असतं. आधी तासन् तास बोलणारे अचानक बिझी होतात , आधी काळजी करणारे अचानक थंड होतात , आधी प्रत्येक गोष्ट सांगणारे अचानक काहीच शेअर करत नाहीत. ते सरळ " नातं संपवूया " असं बोलत नाहीत, पण अशी परिस्थिती तयार करतात की शेवटी आपणच थकतो , आपणच शांत होतो , आपणच दूर जातो. आणि मग गोष्ट अशी वळवली जाते की आपणच बदललो , आपणच नातं तोडलं, आपणच चुकीचे ठरलो. खरं पाहिलं तर नातं त्य़ा दिवशी संपत नाही जेव्हा  दोन लोक बोलणं बंद करतात , नातं त्या दिवशी संपायला सुरुवात होते जेव्हा एकजण मनाने दूर जायला लागतो. 7 कोणत्याही दुर्लक्ष हे  शब्दापेक्षा जास्त दुखावणारं असतं , कारण शब्दांवर वाद होतो , राग येतो आणि नंतर सॅगळं ठीकही होतं , पण दुर्लक्ष माणसाला आतून तोडतं. माणूस स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो , माझी चूक काय होती, मी कमी पडलो का, मी जास्त प्रेम केलं का. आणि हळूहळू तो व्यक्ती समोरच्यापासून नाही तर स्वतःपासूनच दूर जायला लागतो. নীলুন? नातं संपवणं दुखावतं, पण ते सत्य असतं; पण कोणाला C निघून २ हळूहळू दूर ढकलणं, त्याला स्वतःहून जायला भाग पाडणं, हे जास्त वेदनादायक असतं. कारण तिथे नातं एकदाच तुटत नाही, तिथे माणूस रोज थोडा थोडा तुटत असतो. Nita Thakare काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत.. काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत, ते फक्त हळूहळू बदलत जातात आणि त्य़ा बदलामध्येच सगळं उत्तर दडलेलं असतं. आधी तासन् तास बोलणारे अचानक बिझी होतात , आधी काळजी करणारे अचानक थंड होतात , आधी प्रत्येक गोष्ट सांगणारे अचानक काहीच शेअर करत नाहीत. ते सरळ " नातं संपवूया " असं बोलत नाहीत, पण अशी परिस्थिती तयार करतात की शेवटी आपणच थकतो , आपणच शांत होतो , आपणच दूर जातो. आणि मग गोष्ट अशी वळवली जाते की आपणच बदललो , आपणच नातं तोडलं, आपणच चुकीचे ठरलो. खरं पाहिलं तर नातं त्य़ा दिवशी संपत नाही जेव्हा  दोन लोक बोलणं बंद करतात , नातं त्या दिवशी संपायला सुरुवात होते जेव्हा एकजण मनाने दूर जायला लागतो. 7 कोणत्याही दुर्लक्ष हे  शब्दापेक्षा जास्त दुखावणारं असतं , कारण शब्दांवर वाद होतो , राग येतो आणि नंतर सॅगळं ठीकही होतं , पण दुर्लक्ष माणसाला आतून तोडतं. माणूस स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो , माझी चूक काय होती, मी कमी पडलो का, मी जास्त प्रेम केलं का. आणि हळूहळू तो व्यक्ती समोरच्यापासून नाही तर स्वतःपासूनच दूर जायला लागतो. নীলুন? नातं संपवणं दुखावतं, पण ते सत्य असतं; पण कोणाला C निघून २ हळूहळू दूर ढकलणं, त्याला स्वतःहून जायला भाग पाडणं, हे जास्त वेदनादायक असतं. कारण तिथे नातं एकदाच तुटत नाही, तिथे माणूस रोज थोडा थोडा तुटत असतो. Nita Thakare - ShareChat