#राज्यसभेची उमेदवारी कोणाला?
सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकासआघाडीत राज्यसभेच्या एका जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावरुन सध्या चर्चा सुरु आहेत. आता याच चर्चेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वादावरही भाष्य केले आहे. यासोबतच इराण-इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी आणि शोक व्यक्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.एका जागेवरुन तीन पक्षात सातत्याने चर्चा सुरु
महाविकासआघाडी हा तीन तिघाडा आहे, पण काम बिघाडा नक्कीच नाही. महायुतीतही तीन चाकी रिक्षा आहे. या गोष्टी अशा निवडणुकांमध्ये होत असतात. एक जागा आहे, एका जागेवरुन तीन पक्षात सातत्याने चर्चा सुरु आहे. शेवटच्या मिनिटांपर्यंत ती सुरुच राहिलं. त्यामुळे आता पाहू, असे संजय राऊत म्हणाले.
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰


