ShareChat
click to see wallet page
search
शिष्याने गुरूंना विचारले, गुरुदेव, नामस्मरण करायचे ठरवतो… पण मन स्थिर राहत नाही. नामस्मरण करण्याचा सोपा मार्ग कोणता? गुरु शांतपणे म्हणाले, तू नामस्मरण कठीण केले आहेस म्हणून ते कठीण वाटते. नाम म्हणजे श्वासासारखे असावे सहज, अखंड, प्रयत्नरहित. शिष्य गोंधळला. ते कसे? गुरुदेव म्हणाले, पहिला मार्ग श्वासाशी नाम जोडा. श्वास आत घेताना ‘दत्त’, बाहेर सोडताना ‘महाराज’ म्हण. कोणी पाहिले किंवा नाही, वेळ मिळाला किंवा नाही श्वास चालू आहे तोपर्यंत नाम चालू राहील. दुसरा मार्ग नित्यकर्माशी नाम जोडा. स्नान, भोजन, चालणे, प्रवास… जिथे मन रिकामे होते तिथे नाम भरा. वेळ काढू नकोस, वेळेत नाम भर. तिसरा मार्ग भावाने नाम घ्या. संख्या मोजण्यात अडकू नकोस. एका हाकेतील आर्तता हजार जपांपेक्षा मोठी असते. शिष्य विचारतो, गुरुदेव, मन भरकटले तर? गुरु हसले. भरकटणे हे मनाचे काम. परत आणणे हे तुझे काम. रागावू नकोस. जसे आई लहान मुलाला अलगद हात धरून परत आणते, तसे मनाला नामाकडे आण. शेवटी गुरु म्हणाले, नामस्मरणाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते करायचे काम समजू नकोस, तर जगायची पद्धत बनव. मग नाम ओठांवरून हृदयात जाईल… आणि एक दिवस हृदयातूनच सतत घुमत राहील. शिष्याच्या मुखी हसू उमटले. त्याला कळले मार्ग कठीण नव्हता, मनच गुंतागुंतीचे होते. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll श्री दत्तरुप ll #श्री गुरुदेव दत्त #गुरुदेव दत्त