ShareChat
click to see wallet page
search
!! श्री स्वामी समर्थ!! *खग्रास चंद्रग्रहण-* दि. 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमा या दिवशी 'खग्रास चंद्रग्रहण' आहे.हे ग्रहण भारतात काही ठिकाणी दिसणार आहे. *ग्रहण स्पर्श-* दुपारी 3.20 वाजता *ग्रहण मध्य-* दुपारी 05.04 वाजता *ग्रहण मोक्ष-* सायंकाळी 06.48 वाजता *ग्रहण कालावधी-* 3 तास 28 मिनिटे आहे. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयाला आलेले दिसेल.भारतात कुठेही ह्या ग्रहणाचा स्पर्श, मध्य दिसणार नाही.गुजरात मधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागढ, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 06.48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पळू नयेत. *ग्रहण पुण्यकाळ-* चंद्रोदयापासून (आपल्या गाव आणि शहरातील सूर्यास्तापासून) ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे. *ग्रहण वेध-* ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे मंगळवार दिनांक 3 मार्च #⏳ज्योतिष #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 2026 च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत (संध्यकाळी 06.48 पर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत.बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी मंगळवारी सकाळी 11 पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत.वेधकालात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्मे इत्यादी करू शकता.वेदामध्ये जेवण निषिद्ध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत.पण वेध काळात इतर आवश्यक कार्ये जसे कि पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन करणे,झोप घेणे हे करू शकता. ग्रहणपर्व काळात सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत पाणी पिणे आणि मलमूत्र विसर्जन हि कर्मे करू नयेत. *ग्रहांचे राशीनुसार फळ-* *शुभफळ-* मिथुन, तूळ, वृश्चिक, आणि मीन या राशींना शुभफळ मिळेल. *मिश्रफळ-* मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना मिश्र फळ मिळेल. *अनिष्ट फळ-* वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फळ मिळेल.ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण अजिबात पाहू नये. *ग्रहणात करायची कामे-* सूर्यास्त झाल्यावर लगेच आंघोळ करावी.पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान ह्यापैकी जे शक्य असेल ते करावे.आधीच घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे.ज्यांना नवीन साधना सुरु करायच्या असतील तर त्यांनी ग्रहणकाळात सुरुवात करावी.मासिक अडचण असणाऱ्या महिलांनी ग्रहणाचे वेध आणि ग्रहण काळात करायची कामे करू नयेत. *गर्भवती स्त्रियांसाठी ग्रहण काळात पाळावयाचे नियम पुढीलप्रमाणे-* 1) ग्रहण काळात कापणे, चिरणे, पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे. 2) पायाची अढी घालून बसू नये. 3) पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे. 4) ग्रहणकाळात झोपू नये. 5) ग्रहणकाळात शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे. *टिप-* वरील माहिती दाते आणि रूईकर पंचांग अभ्यासून लिहलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी. #🏝 स्वर्ग आमचों गोयानं 🏝