*🌈 देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान देणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी आदर्श राजकारण आणि समाजकारण कसं असावं याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्या कार्यातून घालून दिलं. ग्रामीण आणि शहरी विकासाची सांगड घालत त्यांनी कृषी, अर्थ, सहकार, शिक्षण, उद्योग, संरक्षण, प्रशासन, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रांना नवी दिशा दिली. ज्यामुळे आधुनिक महाराष्ट्राचा भक्कम पाया घातला गेला.*
*त्यांनी कला, साहित्य, संगीत, खेळ आणि नाट्य अशा विविध क्षेत्रांत रसिक म्हणून मुक्त संचार केला. एवढंच नव्हे तर आपल्या अमोघ वाणीतून आणि सिद्धहस्त लेखणीतून त्यांनी समाजमनाला समृद्ध केलं. कृष्णाकाठचं ग्रामीण भागातील राजकारण असो वा यमुनाकाठचं दिल्लीतील राजकारण या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपल्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. आजही जेव्हा राजकारण आणि समाजकारणाची पातळी खालावताना दिसते आणि मतभेदांची सीमा ओलांडून मनभेद निर्माण होताना दिसतात, तेव्हा सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श घालून देणाऱ्या चव्हाण साहेबांची प्रकर्षाने आठवण येते.*
*देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.🌹🙏🌈*
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🎭Whatsapp status #😊ओरिजिनल शुभेच्छा #🙏यशवंतराव चव्हाण जयंती #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎


