कोकणच्या चेडूचो दिल्लीक सत्कार!
'प्रोजेक्ट वीर गाथा 5.0' या केंद्र सरकारच्या शालेय उपक्रमात भारतातील तब्बल 2 कोटी विद्यार्थ्यांमधून 100 विजेत्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये कणकवलीतील कोकणकन्या सावी मुद्राळे हिचा समावेश आहे. येत्या 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे मा. केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते तिचा सत्कार होणार असून दिल्लीची परेड पाहण्यासाठी तिला 'विशेष अतिथी' म्हणून निमंत्रणही आहे!
या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सावी तुझे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
#महाराष्ट्र #शुभेच्छा
00:49

