#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा विकास होत आहे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
दिल्ली/मुंबई दि.15- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार सर्व समाज घटकांना साथ देत सर्वांचा विकास घडवित आहे. भारत सरकारने नुकताच युरोपिय संघासोबत केलेला भारत - युरोप व्यापार करार हा भारतातील शेतक-यांना नफा मिळवुन देणारा आहे. कृषी उत्पादनांवर टॅरिफ कमी होणार असल्याने शेतक-यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतक-यांच्या हितासाठी, कृषी मालावर शेतक-यांना फायदा मिळवुन देण्यासाठी केंद्र सरकार शेतक-यांच्या बाजुने उभे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेतक-यांचा विकास होत आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
आज हरियाणातील झज्जर येथील माजरी (तहसील बादली) येथील मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष रवि कुंडली, शेतकरी मोर्चाचे अध्यक्ष प्रदिप बल्यांण आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हे शेतकरी आणि कष्टक-यांच्या पाठिशी उभे आहे. युरोपीय संघाशी भारत सरकारने केलेला मुक्त व्यापार करार हा ऐतिहासीक व्यापार करार ठरला आहे. हा व्यापार करार मदर ऑफ डील्स म्हणुन गौरविला जात आहे. या करारानुसार भारतीय आयटी निर्यात क्षेत्र 45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची क्षमता आहे. 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी महत्वपुर्ण ठरणारा हा व्यापार करार आहे असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.
माजरी या गावात प्रदिप बल्यांण यांनी 5 एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी देण्यात आल्याचे जाहीर केले. या जागेवर भव्य प्रमाणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवुन निधी मिळवुन देणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख ##Breakingnews #RAMDASATHAWALE #Politics # #follow ###Politics


