ShareChat
click to see wallet page
search
#युद्ध इराणमध्ये, धग भारताला 😮 युद्धाचे बॉम्ब जरी पश्चिम आशियात फुटत असले तरी त्याची धग मात्र भारतात जाणवू लागली आहे. भारताच्या आयात आणि निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. इस्त्रायल आणि इराण युद्धाचे चटके आता फक्त पश्चिम आशियालाच नव्हे तर जगभरात बसताना दिसून येत आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशाला त्याचे अधिकच नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. युद्धाला तोंड फुटून चारच दिवस झालेत तर त्याची झळ आता देशातील सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसताना दिसत आहे.भारत आणि इराण हे जुने मित्र. प्राचीन काळापासून या दोन देशांमध्ये व्यापारी संबंध आहेत, आताही ते सुरू आहेत. परंतु इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि त्याचा परिणाम आता जगाला बसताना दिसतोय. भारतासारख्या अनेक देशांचा काहीही संबंध नसताना त्याचा फटका बसतोय. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स
युद्ध इराणमध्ये, धग भारताला 😮 - युद्ध इराणमध्ये  फटका भारतीय शेतकऱ्यांना Vaibhav Kukade युद्ध इराणमध्ये  फटका भारतीय शेतकऱ्यांना Vaibhav Kukade - ShareChat