#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*युध्दाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केंद्र सरकार मार्ग काढेल - केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले*
*युध्दाच्या जागतिक संकटावरुन कॉग्रेसने राजकारण खेळु नये.*
मुंबई दि.. 12 - ईराण , अमेरिका - इस्त्राईल मधील युध्द हे जागतिक संकट आहे. संकटाच्या काळात देशात सर्वांनी एकजुटीने संयम बाळगला पाहिजे. मात्र युध्दाच्या जागतिक संकटावरुन राजकारणात कॉग्रेस पक्ष हीन राजकारण खेळत आहे. पेट्रोल, गॅस याची टंचाई होवून दरवाढ होवु नये हा युध्दाचा दुष्परिणाम आहे. या युध्दाच्या दुष्परिणामावर केंद्र सरकार निश्चित मार्ग काढेल. तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगला पाहिजे. कॉग्रेसने मात्र युध्दाच्या जागतिक संकटावरुन हीन प्रकारचे राजकारण खेळु नये. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले आहे.
सद्या अमेरिका - इस्त्राईल, ईराण यांच्यामध्ये युध्द चालु असल्यामुळे गॅस सिलेंडर आणि तेलाच्या किंमती हया वाढलेल्या आहेत. या युध्दामुळे भारतातील लोकांवर महागाईचा परिणाम होवू नये यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे सुध्दा ना. रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच सामान्य जनतेसाठी यामधुन लवकरच मार्ग निघेल. ज्यावेळी अमेरिका - इस्त्राईल, ईराण यांच्यामधील युध्द थांबेल तेव्हा सर्वकाही सुरळीत होईल असे ना.रामदास आठवले म्हणाले.
सद्या अमेरिका - इस्त्राईल, ईराण यांच्यामध्ये युध्द चालु असल्यामुळे त्याची झळ ही भारताला सुध्दा बसत आहे. कारण ईराण इस्त्राईल येथुन गॅस, पेट्रोल डिझेलचा पुरवठा केल्या जातो. याठिकाणी युध्दजन्य परिस्थिती असल्यामुळे त्याची झळ ही आता भारतातील लोकांना सुध्दा बसत आहे. सामान्य लोक हे आपल्या घरातील गॅस भरण्याकरीता गॅसच्या बाटल्याच्या लाईनमध्ये लागत असून त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाहीत. गॅस सिलेंडर मिळण्याकरीता 1 महिना आधी बुकींग करावी लागत आहे. आधी गॅस बाटला हा 15 दिवसामध्येच मिळत होता. त्यामुळे सामान्य व्यक्तीला अमेरिका - इस्त्राईल, ईराण यांच्यामध्ये युध्द सुरु असल्यामुळे गॅस दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.
अमेरिका - इस्त्राईल, ईराण यांच्यामध्ये जे युध्द चालु आहे त्यामुळे त्या ठिकाणीवरुन गॅस आणि पेट्रोल डिझेल येते. अमेरिका - इस्त्राईल, ईराण या देशामध्ये युध्द चालु असल्यामुळे गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होवून महागाई वाढली आहे. अमेरिका - इस्त्राईल, ईराण यांच्यामधील युध्द समाप्त होईल तेव्हा सर्व व्यवस्थित होईल. या युध्दामुळे भारतातील सामान्य लोकांवर महागाईचा परिणाम होवू नये यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे सुध्दा ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #Politics.... #RAMDASATHAWALE #follow ###Politics ##Breakingnews


